शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दहावी फेरपरीक्षेला दीड लाख अर्ज

By admin | Updated: July 4, 2015 00:18 IST

पहिल्यांदाच जुलै व आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या दहावीच्या फेरपरीक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे दहावीच्या निकालानंतर अर्ज

पुणे : पहिल्यांदाच जुलै व आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या दहावीच्या फेरपरीक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे दहावीच्या निकालानंतर अर्ज करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळूनही अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या परीक्षेला विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचे दिसते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीची फेरपरीक्षा आॅक्टोबरऐवजी जुलै व आॅगस्ट महिन्यात घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत तयारी केली. दहावीचा निकाल ८ जूनला जाहीर झाला. तर फेरपरीक्षा दि. २१ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मंडळाला संपूर्ण तयारीसाठी केवळ दीड महिन्याचा कालावधी मिळाला आहे. फेरपरीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दि. १५ जूनपासून स्वीकारण्यास सुरुवात झाली. तर दि. २७ जूनपर्यत अंतिम मुदत देण्यात आली होती. सध्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, दि. २८ जूपर्यंत मंडळाकडे सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जाची संख्या खूप आहे, असे मंडळातील अधिकारीही सांगतात. (प्रतिनिधी)अभ्यासासाठी मिळाला कमी कालावधी फेरपरीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थी, श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठीही कमी कालावधी मिळाला आहे. आॅक्टोबरमधील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खूप वेळ मिळत होता. असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा आताच देण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी फेरपरीक्षेला २१ जुलैला सुरूवात होणार असून, दि. ५ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. परीक्षेच्या तयारीसाठीही मंडळाला कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे परीक्षेचे नियोजन वेगाने केले जात आहे, असे राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.