शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

गुरुजी अधिवेशनाला, कुलूप शाळेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 01:32 IST

अधिवेशनाच्या नावाखाली सहा दिवसांच्या पगारी सुट्टीवर गेलेल्या प्राथमिक शिक्षकांमुळे जिल्ह्यातील ८० टक्के शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालक संताप व्यक्त करीत आहेत

अधिवेशनाच्या नावाखाली सहा दिवसांच्या पगारी सुट्टीवर गेलेल्या प्राथमिक शिक्षकांमुळे जिल्ह्यातील ८० टक्के शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालक संताप व्यक्त करीत आहेत.‘गुरुजी गेले अधिवेशनाला, कुलूप लागले शाळेला, अशी परिस्थिती जिल्ह्यातील शाळांची झाल्याचे चित्र आहे.मार्गासनी: वेल्हे तालुक्यात दुर्गम भागाचा अगोदरच येथील शिक्षकांनी फायदा घेत असून, शाळेत उशिरा येणे, वाहतुकीची सुविधा नसल्याचे सांगून वेळेअगोदर शाळेतून निघून जाणे आणि जोडून सुट्ट्यांच्या कालावधीत शाळांना दांड्या मारणे, असे प्रकार सुरू असतानादेखील आता अधिवेशनाच्या नावाखाली शिक्षकांनी आपली नैतिक जबाबदारी झटकत सहा दिवस शाळा बंद ठेवून कोणता आदर्श निर्माण करत आहेत, असा प्रश्न वेल्हे तालुक्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे. वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषद शाळांशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही. कारण या ठिकाणी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांना स्पर्धेसाठी इतर खासगी संस्था, इंग्रजी माध्यमाच्या संस्था अद्यापही स्पर्धेत नसल्याने तालुक्यातील प्राथमिक शाळेची पटसंख्या कित्येक शाळांत समाधानकारक आहे.वेल्हे तालुक्यातील कित्येक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय हा शेती असून, आर्थिक कुवत कमी असल्याने नसरापूर किंवा भोर या ठिकाणी इंग्रजी माध्यमांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. वेल्हे तालुक्यात एकूण १४६ प्राथमिक शाळा असून, ४६०० विद्यार्थी शिकत आहेत, तर या विद्यार्थ्यांना १६ केंद्रांमधून २९९ शिक्षक शिकवित आहेत. या १४६ शाळांपैकी फक्त ३० शाळा अधिवेशन काळात सुरू असल्याची माहिती वेल्ह्याचे गटशिक्षण अधिकारी आर. बी. अभिमाने यांनी दिली. (वार्ताहर)तालुक्यातील जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांनी शाळा सुरू ठेवणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? -सविता वाडघरे, सभापती, पंचायत समिती, वेल्हे शिरूर: तालुक्यातील निम्म्या शाळांमधील ५३१ शिक्षक अधिवेशनाला गेल्याने ८७ शाळा बंद आहेत. अनेक शाळांना कुलूप असून, इतर शाळा नावाला उघड्या असल्याचे वास्तव आहे. अधिवेशनाला गेलेल्या शिक्षकांची सहा दिवसांची रजा मांडली जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अर्जुन मिसाळ यांनी सांगितले.तालुक्यात २६४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण १२३४ शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांपैकी ५३१ शिक्षक अधिवेशनाला गेल्याचे (कागदोपत्री) गटशिक्षणाधिकारी मिसाळ यांनी सांगितले. मिसाळ यांच्या म्हणण्यानुसार कागदोपत्री जरी ही संख्या असली, तरी बरेचसे शिक्षक शाळेवर आहेत. अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. कागदोपत्री ३६४ पैकी ८७ शाळा बंद आहेत. मात्र, यापैकी केवळ सणसवाडी व आपटी शाळाच बंद असल्याचे मिसाळ यांचे म्हणणे आहे. मात्र, शाळांवर शिकवण्यास शिक्षकच नसतील, तर त्या शाळांना कुलूप असले काय अन् त्या उघड्या असल्या काय? त्या बंदच म्हणाव्या लागतील. गटशिक्षणाधिकारी मिसाळ एका बाजूला शाळा बंद नसल्याचे सांगत असताना एका केंद्रप्रमुखाने मात्र ८७ शाळा पूर्ण बंद असल्याचे सांगितले. पर्यायी व्यवस्था करायला माणसंच (शिक्षक) कुठे आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला. एकंदरीत शिक्षक अधिवेशनाला गेल्याने तालुक्यातील या शाळा सहा फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार, हे नक्की. मिसाळ यांच्या म्हणण्यानुसार केवळ आॅनरेकॉर्ड ५३१ शिक्षक अधिवेशनास गेले आहेत. ऐन परिक्षेच्या काळात अधिवेशन आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.प्रत्यक्षात बहुतांशी शिक्षक तालुक्यातच आहेत. काही शिक्षकांनी अनधिकृतपणे शाळांमध्ये तासही घेतल्याचे त्यांनी सांगितले. काही असले, तरी ५३१ शिक्षकांची सहा दिवसांची रजा मांडण्यात येणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)