शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

हिरवा निसर्ग हा भवतीने....गीत गा रे...

By admin | Updated: July 28, 2014 05:29 IST

पावसाळ्याच्या दिवसांतील एक नयनरम्य आणि सर्व पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केलेल्या माळशेज घाट परिसरात आल्यानंतर वरील गाण्याच्या ओळी आपोआप ओठांवर आल्या नाही तर नवलच...!

अशोक खरात, खोडदहिरवा निसर्ग हा भवतीने...जीवन सफर करा मस्तीने...मन सरगम छेडा रे... गीत गा रे जीवनाचे...धुंद व्हा रे...!पावसाळ्याच्या दिवसांतील एक नयनरम्य आणि सर्व पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केलेल्या माळशेज घाट परिसरात आल्यानंतर वरील गाण्याच्या ओळी आपोआप ओठांवर आल्या नाही तर नवलच...! सर्वत्र पसरलेली हिरवीगार हिरवळ... हिरवळीत अधूनमधून डोकं वर काढून वाऱ्याच्या तालावर डोलणारी रंगीबेरंगी रानफुले... उंचचउंच काळ्याभिन्न कड्यांवरून फेसाळत वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे... स्वर्गरूपी निसर्गाच्या सौंदर्याला बाधा पोहोचविणारे काही विकृत पर्यटक... असे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, अशा सौंदर्यप्राप्त माळशेज घाटाचा इतिहास किंवा त्याची भौगोलिक व नैसर्गिक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.माळशेज घाटाच्या इतिहासाविषयी माहिती देताना खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक म्हणाले, की माळशेज घाटाला शेकडो वर्षांचा इतिहास असून, प्राचीन महामार्गातील एक महत्त्वाचा घाटमार्ग म्हणून माळशेजचे महत्त्व आहे. सातवाहनकाळात पैठण (प्रतिष्ठाण) ही राजधानी भरभराटीला येत होती. त्याचबरोबर बाहेरील देशांबरोबरच्या व्यापारातही वाढ होत होती. दोन हजार वर्षांपूर्वीची ही व्यापारी पद्धत अभ्यासनीय आहे. पश्चिमेकडून रोम, भूमध्य समुद्र प्रदेशातील व्यापारी आपली जहाजे घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरावर आपापला विविध प्रकारचा माल घेऊन उतरत असत. चौल, सोफारा, कल्याण, दाभोळ व वरच्या बाजूला भडोच येथील बंदरावरून अशा व्यापाऱ्यांची गर्दी असायची, मग तेथून हा माल बैलगाड्या, खेचरे, घोडे यावर लावून देशाच्या विविध भागांत पोहोचविला जायचा. पण कोकणातून देशावर येण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडाव्या लागत. पण तरीही त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी सह्याद्रीमध्ये अनेक घाट प्रचलित केले. त्यापैकीच हा आपला आवडता माळशेज घाट...!