शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

हिरवा निसर्ग हा भवतीने....गीत गा रे...

By admin | Updated: July 28, 2014 05:29 IST

पावसाळ्याच्या दिवसांतील एक नयनरम्य आणि सर्व पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केलेल्या माळशेज घाट परिसरात आल्यानंतर वरील गाण्याच्या ओळी आपोआप ओठांवर आल्या नाही तर नवलच...!

अशोक खरात, खोडदहिरवा निसर्ग हा भवतीने...जीवन सफर करा मस्तीने...मन सरगम छेडा रे... गीत गा रे जीवनाचे...धुंद व्हा रे...!पावसाळ्याच्या दिवसांतील एक नयनरम्य आणि सर्व पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केलेल्या माळशेज घाट परिसरात आल्यानंतर वरील गाण्याच्या ओळी आपोआप ओठांवर आल्या नाही तर नवलच...! सर्वत्र पसरलेली हिरवीगार हिरवळ... हिरवळीत अधूनमधून डोकं वर काढून वाऱ्याच्या तालावर डोलणारी रंगीबेरंगी रानफुले... उंचचउंच काळ्याभिन्न कड्यांवरून फेसाळत वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे... स्वर्गरूपी निसर्गाच्या सौंदर्याला बाधा पोहोचविणारे काही विकृत पर्यटक... असे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, अशा सौंदर्यप्राप्त माळशेज घाटाचा इतिहास किंवा त्याची भौगोलिक व नैसर्गिक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.माळशेज घाटाच्या इतिहासाविषयी माहिती देताना खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक म्हणाले, की माळशेज घाटाला शेकडो वर्षांचा इतिहास असून, प्राचीन महामार्गातील एक महत्त्वाचा घाटमार्ग म्हणून माळशेजचे महत्त्व आहे. सातवाहनकाळात पैठण (प्रतिष्ठाण) ही राजधानी भरभराटीला येत होती. त्याचबरोबर बाहेरील देशांबरोबरच्या व्यापारातही वाढ होत होती. दोन हजार वर्षांपूर्वीची ही व्यापारी पद्धत अभ्यासनीय आहे. पश्चिमेकडून रोम, भूमध्य समुद्र प्रदेशातील व्यापारी आपली जहाजे घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरावर आपापला विविध प्रकारचा माल घेऊन उतरत असत. चौल, सोफारा, कल्याण, दाभोळ व वरच्या बाजूला भडोच येथील बंदरावरून अशा व्यापाऱ्यांची गर्दी असायची, मग तेथून हा माल बैलगाड्या, खेचरे, घोडे यावर लावून देशाच्या विविध भागांत पोहोचविला जायचा. पण कोकणातून देशावर येण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडाव्या लागत. पण तरीही त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी सह्याद्रीमध्ये अनेक घाट प्रचलित केले. त्यापैकीच हा आपला आवडता माळशेज घाट...!