शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

हिरवा निसर्ग हा भवतीने....गीत गा रे...

By admin | Updated: July 28, 2014 05:29 IST

पावसाळ्याच्या दिवसांतील एक नयनरम्य आणि सर्व पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केलेल्या माळशेज घाट परिसरात आल्यानंतर वरील गाण्याच्या ओळी आपोआप ओठांवर आल्या नाही तर नवलच...!

अशोक खरात, खोडदहिरवा निसर्ग हा भवतीने...जीवन सफर करा मस्तीने...मन सरगम छेडा रे... गीत गा रे जीवनाचे...धुंद व्हा रे...!पावसाळ्याच्या दिवसांतील एक नयनरम्य आणि सर्व पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केलेल्या माळशेज घाट परिसरात आल्यानंतर वरील गाण्याच्या ओळी आपोआप ओठांवर आल्या नाही तर नवलच...! सर्वत्र पसरलेली हिरवीगार हिरवळ... हिरवळीत अधूनमधून डोकं वर काढून वाऱ्याच्या तालावर डोलणारी रंगीबेरंगी रानफुले... उंचचउंच काळ्याभिन्न कड्यांवरून फेसाळत वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे... स्वर्गरूपी निसर्गाच्या सौंदर्याला बाधा पोहोचविणारे काही विकृत पर्यटक... असे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, अशा सौंदर्यप्राप्त माळशेज घाटाचा इतिहास किंवा त्याची भौगोलिक व नैसर्गिक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.माळशेज घाटाच्या इतिहासाविषयी माहिती देताना खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक म्हणाले, की माळशेज घाटाला शेकडो वर्षांचा इतिहास असून, प्राचीन महामार्गातील एक महत्त्वाचा घाटमार्ग म्हणून माळशेजचे महत्त्व आहे. सातवाहनकाळात पैठण (प्रतिष्ठाण) ही राजधानी भरभराटीला येत होती. त्याचबरोबर बाहेरील देशांबरोबरच्या व्यापारातही वाढ होत होती. दोन हजार वर्षांपूर्वीची ही व्यापारी पद्धत अभ्यासनीय आहे. पश्चिमेकडून रोम, भूमध्य समुद्र प्रदेशातील व्यापारी आपली जहाजे घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरावर आपापला विविध प्रकारचा माल घेऊन उतरत असत. चौल, सोफारा, कल्याण, दाभोळ व वरच्या बाजूला भडोच येथील बंदरावरून अशा व्यापाऱ्यांची गर्दी असायची, मग तेथून हा माल बैलगाड्या, खेचरे, घोडे यावर लावून देशाच्या विविध भागांत पोहोचविला जायचा. पण कोकणातून देशावर येण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडाव्या लागत. पण तरीही त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी सह्याद्रीमध्ये अनेक घाट प्रचलित केले. त्यापैकीच हा आपला आवडता माळशेज घाट...!