शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भोरच्या औद्योगिक वसाहतीला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:03 IST

गेल्या कित्येक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहितीचा प्रश्न अखेर मार्गी लागला.

भोर : तालुक्यातील गेल्या कित्येक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहितीचा प्रश्न अखेर मार्गी लागला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी या वसाहतीला मान्यता दिली असून, उत्रौली-वडगाव येथील शेतकऱ्यांची जमिनी संपादित करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने येथील तरुणांनी आनंद व्यक्त केला आहे.मागील अनेक वर्षे भोर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न प्रलंबित होता. त्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी मंत्रालयात उद्योेगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत बैठक घेतली होती. या वेळी औद्योगिक वसाहतीचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरे, महाव्यवस्थापक भूसंपादन गोपीनाथ ठोंबरे, तहसीलदार वर्षा शिंगण, शैलेश सोनवणे, नाना राऊत, दिनकर धरपाळे, दिनकर सरपाले, धनंजय वाडकर, अभिषेक येलगुडे, आकाश वाडघरे, प्रकाश रेणुसे, उत्तम थोपटे, विजय सरपाले, महेश भेलके, ओंकार शिवतरे उपस्थित होते. या जमिनी संपादित करण्यासाठी संबंधित शेतक-यांशी जमिनीच्या खरेदीबाबत वाटाघाटी घडवून जमिनीच्या पूर्वसंमत्ती मिळण्याबाबत शेतक-यांची बैठक आयोजित करून त्याचा अहवाल अधिका-यांनी राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश उद्योगमंत्री देसाई यांनी दिले आहेत.>बेरोजगारी होणार कमीभोर शहरातील व आसपासचे अनेक कारखाने बंद झाल्यामुळे तालुक्यात बेरोजगारी वाढत चालली होती. त्यातच भोर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. त्यामुळे शहर व तालुक्याच्या बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत होती. अनेक वर्षांनंतर औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लागत असून जमिनीला योग्य मोबदला मिळणार आहे; त्यामुळे शेतकºयांनी सकारात्मक विचार करून सहकार्य करण्याचे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे.भोर शहरातील प्रलंबित असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील भोर नगरपलिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर आयआयएच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार ही जागा अधिसूचित करावी, की त्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून त्या जागेवर चांगले उद्योेजक येतील, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर, वेल्हे तालुक्यात सुमारे २०० एकरांच्या वर जागा उपलब्ध होईल अशा गावातील जमिनीचा सर्व्हे करून त्याचाही अहवाल लवकर सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यामुळे भोरला या वसाहतीच्या माध्यमातून चांगले उद्योग येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. १९९३मध्ये भोर तालुक्यातील उत्रौली व वडगाव येथील जागेबाबत ३२(२) अन्वये शेतकºयांना जमीन संपादनाच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्या स्थानिक शेतकºयांच्या जमीन अधिग्रहणासाठी विरोध झाल्यामुळे भूसंपादनाची कार्यवाही झाली नव्हती.