शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विरागदर्शनाजी महाराज यांचे महानिर्वाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST

पुणे : ज्येष्ठ जैन साध्वी विरागदर्शनाजी महाराज (वय, ६३) यांचे आज अहमदनगर येथे महानिर्वाण झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी, शेकडो ...

पुणे : ज्येष्ठ जैन साध्वी विरागदर्शनाजी महाराज (वय, ६३) यांचे आज अहमदनगर येथे महानिर्वाण झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी, शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन दिवसापुर्वी मेदूंतील रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्यांनी संथारा व्रत धारण केले. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना समाधीमरण प्राप्त झाले.

आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज आणि प्रमोदसुधाजी महाराज यांच्या प्रेरणेने त्यांनी ३ फेब्रुवारी १९८२ रोजी पुणे येथे जैन भगवती दीक्षा ग्रहण केली होती. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. प्रसिध्द व्यापारी हरकचंद ताथेड आणि प्यारीबाई हे त्यांचे मातापिता. साध्वी दिव्यदर्शनाजी या त्यांच्या मोठ्या भगिनी होत. विनयकंवरजी महाराज, किरणप्रभाजी महाराज, आदर्शऋषीजी महाराज यांच्या उपदेशाने त्यांना दीक्षेसाठी प्रेरणा मिळाली.

गेल्या ३८ वर्षात त्यांनी महाराष्टृ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये पायी फिरुन भगवान महावीरांचा संदेश जनतेपर्यंत पोहचवला. पुण्यातही त्यांचे चार चातुर्मास झाले. प्रभावी प्रवचनकार, शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य, या गुणवैशिष्ट्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीत श्रमण संघामध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती.