शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून रखडले ‘ठिबक’चे अनुदान

By admin | Updated: January 5, 2016 02:33 IST

ठिबक सिंचन करा, अशी सक्ती एकीकडे शासन शेतकऱ्यांना करीत आहे; मात्र ठिबकसाठी दिले जाणारे अनुदान तीन-तीन वर्षे रखडवत आहे.

सोमेश्वरनगर : ठिबक सिंचन करा, अशी सक्ती एकीकडे शासन शेतकऱ्यांना करीत आहे; मात्र ठिबकसाठी दिले जाणारे अनुदान तीन-तीन वर्षे रखडवत आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात सन २०१२-१३ व २०१४-१५मध्ये ठिबक केलेल्या ३ हजार शेतकऱ्यांचे ९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना राज्य सरकार ठिबक करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. शेतकरी मात्र, पदरचे पैसे गुंतवून शेतामध्ये ठिबक सिंचन योजना राबवीत आहे. राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांना तीन-तीन वर्षे अनुदानच दिले २२जात नाही. एकट्या बारामती तालुक्यात सन २०१२-१३मधील ४३६ शेतकऱ्यांचे १ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान थकीत आहे. तर, सन २०१३-१४चे ३०० शेतकऱ्यांचे ७० लाख व सन २०१४- १५चे ३४० शेतकऱ्यांचे ७२ लाख रुपये अनुदान देणे थकीत आहे. हा आकडा जिल्हास्तरावर तब्बल ९ कोटींच्या घरात जातो. जिल्ह्यातील सन २०१२-१३ या वर्षात ठिबक सिंचन राबविलेल्या शेतकऱ्यांपैकी १,२०० शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत. त्यांचे ३ कोटी ६५ लाख रुपये देणे बाकी आहे. तर, सन २०१४-१५मधील ठिबक केलेल्या शेतकऱ्यांपैकी १,८०० शेतकरी ५ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानापासून वंचित आहेत. आघाडी सरकारच्या काळात ठिबकवरील ठरलेल्या अनुदानापैकी ८० टक्के केंद्र सरकार व २० टक्के राज्य सरकारने अदा करण्याचे सूत्र ठरलेले होते. मात्र, आता भाजपा सरकारच्या काळात हे सूत्र ५०-५० वर आले. (वार्ताहर)