शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आजीबाईंचा बटवा, कोरोनाला हटवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST

आयुर्वेद हा प्राचीन वारसा : ज्येष्ठ महिलांचे मत डमी 744 लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या संकटाशी गेल्या एक ...

आयुर्वेद हा प्राचीन वारसा : ज्येष्ठ महिलांचे मत

डमी 744

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या संकटाशी गेल्या एक वर्षापासून आपला सामना सुरू आहे. सध्या तरी कोरोनावर रामबाण उपाय असणारे औषध आपल्याकडे नाही. मात्र, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि कोरोनाच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी घरोघरी आजीबाईंच्या बटव्यातील उपायांचा अवलंब केला जात आहे. आयुर्वेद हा आपला प्राचीन वारसा असून, पूर्वीच्या काळी वैद्यकशास्त्र फारसे विकसित झाले नसताना अनेक आजारांवर घरगुती उपाय उपयुक्त ठरायचे. कोरोनाकाळातही घरगुती उपाय रामबाण ठरत असल्याचे मत ज्येष्ठ महिलांनी नोंदवले आहे.

शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण असेल तर कोणत्याही विषाणुजन्य आजाराची लागण लवकर होते, हे आजवरच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. कोरोना काळातही प्रतिकारशक्ती कमी असलेल्या वर्गामध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या काळात आजीबाईचा बटवा कामी येत आहे. कोरोना होऊ नये म्हणून आणि झाल्यास त्याची तीव्रता कमी रहावी यासाठी वाफ घेणे, हळद-दूध घेणे, आयुर्वेदिक काढे पिणे, तुळशीची पाने खाणे, कोमट पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या असे उपाय बहुतांश घरांमध्ये जात आहेत.

-----

शहरातील कोरोनाचे एकूण रुग्ण -४,६४,९१६

कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ४,४४,६१८

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -१२३३०

एकूण कोरोना मृत्यू - ७९६८

-----

ज्येष्ठ मध, २ लवंगा भाजून त्याची पूड बनवून घ्यावी. दररोज सकाळी एक कप पाण्यात अर्धा चमचा पूड घालून पाणी उकळून अर्धा कप करून घ्यावे आणि

चहासारखे प्यावे. यामुळे घसा मोकळा राहतो. गव्हाचे दाणे घरातील कुंडीत पेरावेत. सहा-सात दिवसांनी कोंब फुटले की तो पाला मिक्सर मधून काढून, गाळून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.

- नलिनी रतन घोडके

-----------------------

१.तीळ किंवा नारळाचं तेल किंवा देशी तुपाचे दोन थेंब नाकपुड्यांमध्ये टाकावे

2.लेंडीपिंपळी, बदाम,दूध,दालचिनी,लवंग,गूळ,याचा लोखंडी भांड्यात केलेला काढा प्यावा.

3.रोज घरात कापूरदाणीमध्ये कापूर लावून ठेवावा. घरातील हवेत कायम त्याचा वास राहतो. अथवा कापराचा नुसता वास घेतला तरी ते गुणकारी ठरते.

- शुभांगी रमेश कुलकर्णी

---------

कोमट पाण्यात हळद आणि मीठ घालून सकाळी आणि संध्याकाळी गुळण्या केल्यास संसर्ग फुफ्सापर्यंत जात नाही. किमान दोन वेळा गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यात ओवा, ठेचलेले दोन-तीन लसूण आणि कापूर घालावा. चहामध्ये लवंग, दालचिनी आणि गवती चहाची पाने घालावीत.

- बलजीत कौर