शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

ग्रामपंंचायत निवडणुकीचे पडघम

By admin | Updated: July 4, 2017 03:18 IST

गतवर्षीच्या दिवाळीदरम्यान सुरू होणारा निवडणुकांचा हंगाम यंदा वर्षअखेरपर्यंत चालणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कडोर्लेवाडी : गतवर्षीच्या दिवाळीदरम्यान सुरू होणारा निवडणुकांचा हंगाम यंदा वर्षअखेरपर्यंत चालणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर आता जिल्ह्याला ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागलेत. वर्षअखेरीस जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती निवडणुकीतही विधान परिषदेपासून निवडणुकीचा मोसम सुरू झाला. चार महिने हा मोसम होता. त्यानंतर सहा महिन्यांची वेळ आहे; मात्र आतापासूनच ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सुरू झाली. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय पातळीवर लढल्या जात नाहीत. मात्र, येथे कोणत्या गटाची किंवा पक्षाच्या नेत्यांची सत्ता आहे, हे सहजपणे ओळखता येते. तसेच आता या वर्षी जरा वेगळ्या प्रमाणे निवडणूक आयोगाने आरक्षण केले आहे. पुणे जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ग्लोबल इन्फॉर्मेशन मॅप (जीआयएस) आणि गुगल अर्थच्या नकाशांवरून प्रभागरचना केली गेली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या नकाशांचा आधार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखेकडून प्रभागरचना आणि आरक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी) आणि गुगल अर्थच्या नकाशांची समांतरजुळणी (सुपर इम्पोज) करून लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभागरचना केली आहे. गुगल नकाशांनुसार तहसीलदारांनी एमआरएसएसी नकाशांची समांतर जुळणी केली आहे. हे करताना नकाशांमध्ये रस्ते, नदी, ठळकपणे दर्शविण्यात आले. २०११ च्या जनगणनेनुसार होणार रचना 1 ग्रामपंचयात क्षेत्रातील वाडी, वस्ती, पाडे वगळणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभागरचना करताना ग्रामपंचायतींची २०११मध्ये झालेल्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या भागिले ग्रामपंचायतींची एकूण सदस्यसंख्या, या सूत्रानुसार प्रभागांची लोकसंख्या निश्चित करू, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. 2यंदा प्रथमच जीआयएस आणि गुगल अर्थच्या नकाशांवर आधारित प्रभागरचना केली. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तलाठी कार्यालय स्तर नकाशांवर प्रभागरचना केली जात होती. त्यामुळे प्रभागरचनेत लोकसंख्या, क्षेत्रफळानुसार अचूकता येत नव्हती. प्रभागरचनेवर अनेक आक्षेप नोंदविले जात होते. गुगल अर्थ व जीआयएस नकाशांद्वारे प्रभागरचना केल्याने अचूकता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागरचनेनंतर जातीनिहाय आरक्षणदेखील जाहीर केले आहे. ग्लोबल इन्फॉर्मेशन मॅप (जीआयएस)च्याच साह्याने डोर्लेवाडीमध्येही मॅपिंग केले गेले व प्रभागरचनेनंतर जातीनिहाय आरक्षण सोडत काढली गेली.