शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम

By admin | Updated: June 24, 2015 05:12 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्रमा सुरू होणार आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५दरम्यान मुदत

पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्रमा सुरू होणार आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५दरम्यान मुदत संपणाऱ्या तब्बल ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यामुळे आता ऐन पावसाळ्यात गावच्या चावडीवर पुन्हा एकदा निवडणुकीची चर्चा रंगणार आहे. जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा जिल्ह्यात हा सर्वांत मोठा टप्पा असतो. यामध्ये अनेक आमदार, खासदार व राजकीय नेत्यांच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच जुलै ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या; पंरतु सहा महिने आगोदरच निवडणुका घेण्यास विरोध झाल्याने जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तेव्हापासूनच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले होते. अखेर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामुळे आता ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने वातावरण तापणार आहे.