शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

ग्राहकांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:00 IST

महाराष्ट्र राज्य सरकार ग्राहक सुरक्षा कायद्यासंदर्भात जागृत आहे; परंतु कायदा जन्माला आला की पळवाट जन्माला येते.

पुणे : महाराष्ट्र राज्य सरकार ग्राहक सुरक्षा कायद्यासंदर्भात जागृत आहे; परंतु कायदा जन्माला आला की पळवाट जन्माला येते. कायदा अंमलात आणून ग्राहकांच्या समस्यांची पाहणी होत नाही. ग्राहकांच्या अनेक अडचणी समोर येत असून, याकडे निधी पुरवण्यापासून सर्व सुख- सोयीपर्यंत सरकारचे दुर्लक्ष होत आहे असे मत महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे व ग्राहक पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्ष अरुण देशपांडे, कमिशनर नीलिमा धायगुडे, ग्राहक पंचायत सभासद सूर्यकांत पाठक, विलास लेले आदी उपस्थित होते.बापट म्हणाले की, सरकारला व्यावहारिक अडचणी खूपच असतात. तरीही सरकार जागृत आहे. महापालिकेकडे ग्राहकांशी निगडित मतदार कामे आहेत. त्यांच्या पलीकडे हे ग्राहक संरक्षण कायद्याचे वेगळेच जग आहे. पुणे आणि पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या ५० लाख आहे; पण ग्राहक संरक्षणाबाबतीत न्याय देण्याच्या विषयाला फक्त ५० लोकच पुढाकार घेतात. सामान्य जनतेने एकत्र येऊन या समस्या सोडविल्या पाहिजेत. समाजविघातक काम करणाऱ्या लोकांसाठी कायदा अपुरा पडतो. सरकारने अंमलात आणलेल्या कायद्यात आपण सक्रिय सहभाग नोंदविला पाहिजे. पुणे शहराला आपले घर म्हणूनच पाहा. वाईट कामे करणाºया लोकांना थांबविण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा. अनेक वर्षे भारतीय ग्राहक पंचायत सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवित आहे. सरकारने आतापासूनच ग्राहक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.तब्बल ९२ लाख बनावट रेशनकार्ड रद्दअरुण देशपांडे म्हणाले की, अखिल भारतीय पंचायत समिती देशातील ३५० जिल्ह्यांत कार्यरत आहे. भारतातील उत्तर-पूर्वेचा भाग सोडला तर सर्व राज्यांत काम चालू आहे. बापट साहेबांच्या नेतृत्वाखाली ग्राहक संरक्षणसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. ९२ लाख बोगस रेशनकार्ड रद्द झाले. त्यामुळे नागरिकांना लाभ झाला आहे. महापालिकेकडे ग्राहक चळवळीतले सदस्य जोडले आहेत. न्यायालयाने ग्राहकांसाठी नवीन कायद्यात आणलेल्या तरतुदी अफलातून आहेत. समाजात जे व्यापारी कायद्याचे उल्लंघन करून भेसळयुक्त वस्तूंची विक्री करतात. त्या उत्पादकाला नुकसानभरपाई करण्याची तरतूद कायद्यात देण्यात आली आहे.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटGovernmentसरकार