शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

ग्राहकांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:00 IST

महाराष्ट्र राज्य सरकार ग्राहक सुरक्षा कायद्यासंदर्भात जागृत आहे; परंतु कायदा जन्माला आला की पळवाट जन्माला येते.

पुणे : महाराष्ट्र राज्य सरकार ग्राहक सुरक्षा कायद्यासंदर्भात जागृत आहे; परंतु कायदा जन्माला आला की पळवाट जन्माला येते. कायदा अंमलात आणून ग्राहकांच्या समस्यांची पाहणी होत नाही. ग्राहकांच्या अनेक अडचणी समोर येत असून, याकडे निधी पुरवण्यापासून सर्व सुख- सोयीपर्यंत सरकारचे दुर्लक्ष होत आहे असे मत महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे व ग्राहक पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्ष अरुण देशपांडे, कमिशनर नीलिमा धायगुडे, ग्राहक पंचायत सभासद सूर्यकांत पाठक, विलास लेले आदी उपस्थित होते.बापट म्हणाले की, सरकारला व्यावहारिक अडचणी खूपच असतात. तरीही सरकार जागृत आहे. महापालिकेकडे ग्राहकांशी निगडित मतदार कामे आहेत. त्यांच्या पलीकडे हे ग्राहक संरक्षण कायद्याचे वेगळेच जग आहे. पुणे आणि पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या ५० लाख आहे; पण ग्राहक संरक्षणाबाबतीत न्याय देण्याच्या विषयाला फक्त ५० लोकच पुढाकार घेतात. सामान्य जनतेने एकत्र येऊन या समस्या सोडविल्या पाहिजेत. समाजविघातक काम करणाऱ्या लोकांसाठी कायदा अपुरा पडतो. सरकारने अंमलात आणलेल्या कायद्यात आपण सक्रिय सहभाग नोंदविला पाहिजे. पुणे शहराला आपले घर म्हणूनच पाहा. वाईट कामे करणाºया लोकांना थांबविण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा. अनेक वर्षे भारतीय ग्राहक पंचायत सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवित आहे. सरकारने आतापासूनच ग्राहक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.तब्बल ९२ लाख बनावट रेशनकार्ड रद्दअरुण देशपांडे म्हणाले की, अखिल भारतीय पंचायत समिती देशातील ३५० जिल्ह्यांत कार्यरत आहे. भारतातील उत्तर-पूर्वेचा भाग सोडला तर सर्व राज्यांत काम चालू आहे. बापट साहेबांच्या नेतृत्वाखाली ग्राहक संरक्षणसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. ९२ लाख बोगस रेशनकार्ड रद्द झाले. त्यामुळे नागरिकांना लाभ झाला आहे. महापालिकेकडे ग्राहक चळवळीतले सदस्य जोडले आहेत. न्यायालयाने ग्राहकांसाठी नवीन कायद्यात आणलेल्या तरतुदी अफलातून आहेत. समाजात जे व्यापारी कायद्याचे उल्लंघन करून भेसळयुक्त वस्तूंची विक्री करतात. त्या उत्पादकाला नुकसानभरपाई करण्याची तरतूद कायद्यात देण्यात आली आहे.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटGovernmentसरकार