शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

वटहुकूम काढून बैलगाडा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:12 IST

शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील पाणीप्रश्न सोडविण्याबरोबरच खेड व आंबेगाव तालुक्यांतील काही गावांच्या पाणीप्रश्नाबाबत योग्य उपाययोजना कारणासाठी येत्या काळात ...

शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील पाणीप्रश्न सोडविण्याबरोबरच खेड व आंबेगाव तालुक्यांतील काही गावांच्या पाणीप्रश्नाबाबत योग्य उपाययोजना कारणासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचबरोबर बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्यासोबत बैठक झाली असून, वटहुकूम काढून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

पाबळ (ता. शिरूर) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार यार्डाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, बाजार समितीचे सभापती ॲड. वसंतराव कोरेकर, उपसभापती प्रवीण चोरडिया, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, ‘भीमाशंकर’चे संचालक प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, शंकर जांभळकर, मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, स्वाती पाचुंदकर, शेखर पाचूंदकर, दूध संघाच्या संचालिका केशर पवार, वर्षा शिवले, सदाशिव पवार, सुभाष उमाप, उपसभापती सविता पऱ्हाड, तालुकाध्यक्ष रवी काळे, नंदकुमार पिंगळे, राजेंद्र गावडे, शांताराम चौधरी, अरुण चौधरी, किशोर रत्नपारखी, सचिव अनिल ढोकले, आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

वळसे-पाटील म्हणाले, शिरूर भागातील शेतकरी बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. याबाबत मुंबईत बैठक घेण्यात आली. वटहुकूम काढून बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. मुख्य न्यायाधीशांना याबाबत न्यायाधीशांचा बेंच स्थापन करण्याबाबत अर्ज करण्यात आला आहे. पाच न्यायाधीशांच्या बेंच स्थापन झाल्यावर बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने उत्तम वकील दिले जातील, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षात बसण्याची आम्ही मानसिकता तयार केली असतानाच शरद पवारांनी जादू केली व आम्ही मंत्री झालो. परंतु कोरोना संकटामुळे राज्य आर्थिक अडचणीत आले आहे. महावितरणचे वीज बिलाचे कर्ज सुमारे ७२ हजार रुपये कोटींपर्यंत पोहोचले आहे. आपण ऊर्जामंत्री असताना ते १४ हजार कोटी रुपये होते. सवलतीचा निर्णय शासन घेईल; परंतु शेतकऱ्यांनी चालू वीज बिले भरून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आंबेगाव शिरूर खेड या तालुक्यातील सीमेवरील गावांमध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. नजीकच्या काळामध्ये येथील पिण्याच्या पाण्याची योजना मार्गी लागावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. पाबळ येथील बाजार समितीच्या ओसाड पडलेल्या माजी सभापती शंकर जांभळकर, विद्यमान सभापती वसंतराव कोरेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सुंदर इमारत व शेड उभारले आहे, असे वळसे-पाटील यांनी या वेळी सांगितले.

आमदार अशोक पवार म्हणाले की, मागील काळामध्ये बाजार समिती चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याने समिती तोट्यात गेली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात बाजार समिती आल्यानंतर सर्व सभापती व संचालक आणि चांगले काम करीत बाजार समिती फायद्यात आणली आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, या मताचा मी असून त्याबाबत कुठलाही प्रादेशिक भेदभाव करीत नाही. पाण्यासाठी शेतकरी महत्त्वाचा असून हेड, टेल असा कुठलाही भेदाभाव नाही. महाविकास आघाडी म्हणून तालुक्यामध्ये काँग्रेस व शिवसेना यांना बरोबर घेऊन काम करीत असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

२६ शिक्रापूर

पाबळ येथे बाजार समितीच्या उपबाजार यार्डाच्या उद्घाटनप्रसंगी दिलीप वळसे-पाटील, अशोक पवार, पोपटराव गावडे व इतर.

260921\20210926_135836.jpg

????? ?????? ???? ?????