शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

वटहुकूम काढून बैलगाडा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:12 IST

शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील पाणीप्रश्न सोडविण्याबरोबरच खेड व आंबेगाव तालुक्यांतील काही गावांच्या पाणीप्रश्नाबाबत योग्य उपाययोजना कारणासाठी येत्या काळात ...

शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील पाणीप्रश्न सोडविण्याबरोबरच खेड व आंबेगाव तालुक्यांतील काही गावांच्या पाणीप्रश्नाबाबत योग्य उपाययोजना कारणासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचबरोबर बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्यासोबत बैठक झाली असून, वटहुकूम काढून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

पाबळ (ता. शिरूर) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार यार्डाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, बाजार समितीचे सभापती ॲड. वसंतराव कोरेकर, उपसभापती प्रवीण चोरडिया, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, ‘भीमाशंकर’चे संचालक प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, शंकर जांभळकर, मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, स्वाती पाचुंदकर, शेखर पाचूंदकर, दूध संघाच्या संचालिका केशर पवार, वर्षा शिवले, सदाशिव पवार, सुभाष उमाप, उपसभापती सविता पऱ्हाड, तालुकाध्यक्ष रवी काळे, नंदकुमार पिंगळे, राजेंद्र गावडे, शांताराम चौधरी, अरुण चौधरी, किशोर रत्नपारखी, सचिव अनिल ढोकले, आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

वळसे-पाटील म्हणाले, शिरूर भागातील शेतकरी बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. याबाबत मुंबईत बैठक घेण्यात आली. वटहुकूम काढून बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. मुख्य न्यायाधीशांना याबाबत न्यायाधीशांचा बेंच स्थापन करण्याबाबत अर्ज करण्यात आला आहे. पाच न्यायाधीशांच्या बेंच स्थापन झाल्यावर बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने उत्तम वकील दिले जातील, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षात बसण्याची आम्ही मानसिकता तयार केली असतानाच शरद पवारांनी जादू केली व आम्ही मंत्री झालो. परंतु कोरोना संकटामुळे राज्य आर्थिक अडचणीत आले आहे. महावितरणचे वीज बिलाचे कर्ज सुमारे ७२ हजार रुपये कोटींपर्यंत पोहोचले आहे. आपण ऊर्जामंत्री असताना ते १४ हजार कोटी रुपये होते. सवलतीचा निर्णय शासन घेईल; परंतु शेतकऱ्यांनी चालू वीज बिले भरून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आंबेगाव शिरूर खेड या तालुक्यातील सीमेवरील गावांमध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. नजीकच्या काळामध्ये येथील पिण्याच्या पाण्याची योजना मार्गी लागावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. पाबळ येथील बाजार समितीच्या ओसाड पडलेल्या माजी सभापती शंकर जांभळकर, विद्यमान सभापती वसंतराव कोरेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सुंदर इमारत व शेड उभारले आहे, असे वळसे-पाटील यांनी या वेळी सांगितले.

आमदार अशोक पवार म्हणाले की, मागील काळामध्ये बाजार समिती चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याने समिती तोट्यात गेली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात बाजार समिती आल्यानंतर सर्व सभापती व संचालक आणि चांगले काम करीत बाजार समिती फायद्यात आणली आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, या मताचा मी असून त्याबाबत कुठलाही प्रादेशिक भेदभाव करीत नाही. पाण्यासाठी शेतकरी महत्त्वाचा असून हेड, टेल असा कुठलाही भेदाभाव नाही. महाविकास आघाडी म्हणून तालुक्यामध्ये काँग्रेस व शिवसेना यांना बरोबर घेऊन काम करीत असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

२६ शिक्रापूर

पाबळ येथे बाजार समितीच्या उपबाजार यार्डाच्या उद्घाटनप्रसंगी दिलीप वळसे-पाटील, अशोक पवार, पोपटराव गावडे व इतर.

260921\20210926_135836.jpg

????? ?????? ???? ?????