शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

सरकारने दुधासाठी कॉर्पोरेट कंपनी स्थापावी- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 12:46 AM

केंद्र सरकारच्या मालकीच्या आॅईल कंपन्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाची कॉर्पोरेट कंपनी स्थापन करायला हवी. त्या माध्यमातून राज्याचा दूध ब्रँड विकसित करायला हवा.

पुणे : केंद्र सरकारच्या मालकीच्या आॅईल कंपन्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाची कॉर्पोरेट कंपनी स्थापन करायला हवी. त्या माध्यमातून राज्याचा दूध ब्रँड विकसित करायला हवा. त्यामुळे उत्पादकांना न्याय देता येईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे ही आमची अट मान्य झाली आहे. त्याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून होत आहे. जाहीर केलेला दर देण्यास टाळाटाळ झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल. यापूर्वी महानंदच्या माध्यमातून एक ब्रँड करण्याचा प्रयत्न झाला होता. महानंद राजकारण्यांच्या हातात सापडल्याने, या प्रयोगाचे वाटोळे झाले. मात्र, पुन्हा असा प्रयोग करण्यास हरकत नाही. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे तशी मागणी केली आहे. त्यात ५१ टक्के हिस्सा राज्याचा आणि उर्वरीत खासगी गुंतवणुकीतून उभारावा. महानंद आणि आरेची यंत्रणा संबंधित कंपनीकडे हस्तांतरीत करावी. त्यामुळे राज्याचा चांगला ब्रँड होईल. परिणामी आपणच गुजरातमध्ये दूध विकू शकू, असे शेट्टी म्हणाले. पाच वर्षांत नाबार्डच्या माध्यमातून गोदामे, शीतगृहे, पॉलिहाऊसला अनुदान दिले गेले नाही. त्यामुळे शेतमाल साठविण्याचे काम ठप्प पडले आहे. केंद्र सरकार आॅनलाईनचा पुरस्कार करीत आहे. त्यासाठी शीतकरण, ड्रायर हाऊस, प्रतवारी करण्याची सुविधा निर्माण करीत नाही. अशा पायाभूत सुविधाच न दिल्यास शेतमालाला भाव कसा मिळेल, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.हमीभावाचे खासगी विधेयक मांडणारशेतकºयांना कर्जमुक्ती, हमीभाव मिळविण्याचा अधिकार आहे. त्यासाठी उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि न देणाºयावर १० ते १५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करावी अशा मागणीसाठी संसदेत खासगी विधेयक मांडणार असून, त्याला २२ पक्षांनी पाठिंबा दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी