शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कोरेगाव-भीमाची दंगल सरकारनेच घडवून आणली! पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:31 IST

दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी हजारो लोक येतात. यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्याने लाखो लोक येथे येणार, याची सरकार आणि प्रशासनाला माहिती होती. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते.

पुणे : दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी हजारो लोक येतात. यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्याने लाखो लोक येथे येणार, याची सरकार आणि प्रशासनाला माहिती होती. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, समाजात जातीय तणाव आणि वितुष्ट निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारनेच ही दंगल घडवून आणल्याची दाट शक्यता आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.पुण्यात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, दादरला दर वर्षी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी पाच-सहा लाख लोक एकत्र येतात. यावेळी कोणताही गोंधळ किंवा वाहतूक कोंडीही होत नाही. कोरेगाव भीमा येथेही अशा प्रकारचे नियोजन करायला हवे होते. मात्र, सरकारने कोणतेही नियोजन केले नाही. दगडफेक कशी सुरू झाली, पहिला दगड कोणी फेकला, त्यामागील सूत्रधार कोण, याबाबत सरकार काहीही बोलायला तयार नाही. दंगलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकार सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे. याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात न आल्याने हा पूर्वनियोजित कट असल्याचे उघड झाले आहे.२०१४ मध्ये सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, सरकारच्या धोरणामुळे दलित, मुस्लिम मतदार दुरावला आहे. यामुळे निवडणुकीआधीच हार पत्करावी लागू नये, यासाठी, दलितांना एकटे पाडण्यासाठी आणि दोन समाजांमध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी भाजप सरकारने हा कट रचला. आपापसात वितुष्ट, वैमनस्य निर्माण झाल्यास दोन्ही समाज एका व्यासपीठावर येणार नाहीत, असे नियोजन करण्यात आले. मूळ प्रकरणापासून लक्ष वळवण्यासाठी अनेक नावे गोवून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. खºया सूत्रधाराना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोवर समाजाला सावध राहावे लागणार आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.कॉँग्रेस, राष्टÑवादीने एकत्र यावे : ‘सहकारी चळवळ, आर्थिक संस्थाचे नेतृत्व यातून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला. मात्र, सध्याचे वैचारिक आक्रमण मोडून काढायचे असेल तर हेवेदावे बाजूला ठेवून विषारी शक्तींचा सामना केला पाहिजे. एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले तर भाजपला घरी बसवण्याची ही चांगली संधी आहे, असेही चव्हाण म्हणाले.फटांगडे कुटुंबीयांना १० लाखांची मदतकोरेगाव भीमा (पुणे) : कोरेगाव भीमा येथील दंगलीत मृत्यू झालेल्या राहुल फटांगडे याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० लाखांची शासकीय मदत जाहीर केली होती. संबंधित धनादेश त्याच्या कुटुंबीयांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले व प्रांताधिकारी भाऊ गलंडे यांनी मंगळवारी सुपूर्द केला. मूळचा कान्हुर मेसाई (ता. शिरुर) येथील व सध्या सणसवाडी येथे राहणा-या राहुलचा चंदननगर येथे गॅरज होते.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण