शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

कोरेगाव-भीमाची दंगल सरकारनेच घडवून आणली! पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:31 IST

दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी हजारो लोक येतात. यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्याने लाखो लोक येथे येणार, याची सरकार आणि प्रशासनाला माहिती होती. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते.

पुणे : दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी हजारो लोक येतात. यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्याने लाखो लोक येथे येणार, याची सरकार आणि प्रशासनाला माहिती होती. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, समाजात जातीय तणाव आणि वितुष्ट निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारनेच ही दंगल घडवून आणल्याची दाट शक्यता आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.पुण्यात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, दादरला दर वर्षी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी पाच-सहा लाख लोक एकत्र येतात. यावेळी कोणताही गोंधळ किंवा वाहतूक कोंडीही होत नाही. कोरेगाव भीमा येथेही अशा प्रकारचे नियोजन करायला हवे होते. मात्र, सरकारने कोणतेही नियोजन केले नाही. दगडफेक कशी सुरू झाली, पहिला दगड कोणी फेकला, त्यामागील सूत्रधार कोण, याबाबत सरकार काहीही बोलायला तयार नाही. दंगलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकार सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे. याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात न आल्याने हा पूर्वनियोजित कट असल्याचे उघड झाले आहे.२०१४ मध्ये सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, सरकारच्या धोरणामुळे दलित, मुस्लिम मतदार दुरावला आहे. यामुळे निवडणुकीआधीच हार पत्करावी लागू नये, यासाठी, दलितांना एकटे पाडण्यासाठी आणि दोन समाजांमध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी भाजप सरकारने हा कट रचला. आपापसात वितुष्ट, वैमनस्य निर्माण झाल्यास दोन्ही समाज एका व्यासपीठावर येणार नाहीत, असे नियोजन करण्यात आले. मूळ प्रकरणापासून लक्ष वळवण्यासाठी अनेक नावे गोवून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. खºया सूत्रधाराना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोवर समाजाला सावध राहावे लागणार आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.कॉँग्रेस, राष्टÑवादीने एकत्र यावे : ‘सहकारी चळवळ, आर्थिक संस्थाचे नेतृत्व यातून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला. मात्र, सध्याचे वैचारिक आक्रमण मोडून काढायचे असेल तर हेवेदावे बाजूला ठेवून विषारी शक्तींचा सामना केला पाहिजे. एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले तर भाजपला घरी बसवण्याची ही चांगली संधी आहे, असेही चव्हाण म्हणाले.फटांगडे कुटुंबीयांना १० लाखांची मदतकोरेगाव भीमा (पुणे) : कोरेगाव भीमा येथील दंगलीत मृत्यू झालेल्या राहुल फटांगडे याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० लाखांची शासकीय मदत जाहीर केली होती. संबंधित धनादेश त्याच्या कुटुंबीयांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले व प्रांताधिकारी भाऊ गलंडे यांनी मंगळवारी सुपूर्द केला. मूळचा कान्हुर मेसाई (ता. शिरुर) येथील व सध्या सणसवाडी येथे राहणा-या राहुलचा चंदननगर येथे गॅरज होते.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण