शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

उच्च शिक्षणाच्या सरकारीकरणाचा हेतू नाही; प्रकाश जावडेकर यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:22 IST

व्याने उच्च शिक्षण आयोग स्थापन करताना त्याचे सरकारीकरण करण्याचा केंद्र शासनाचा कुठलाही हेतू नाही, असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

पुणे : केंद्रीय अनुदान आयोगाच्या (यूजीसी) जागी नव्याने उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्याबाबतच्या मसुद्यावर सूचना मागविण्यात आल्या होत्या. यावर आतापर्यंत २० हजार सूचना प्राप्त झाल्या आहेत. सोमवारी या विषयावर संसदेत चर्चा होणार आहे. हा आयोग स्थापन करताना त्याचे सरकारीकरण करण्याचा केंद्र शासनाचा कुठलाही हेतू नाही, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी स्पष्ट केले.स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्या वतीने प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत कोथरूड परिसरातील १६३ महिलांना एलपीजी गॅसचे विनामूल्य वाटप करण्यात आले. जावडेकर यांनी या वेळी पत्रकारांशी संवाद साधला.जावडेकर यांनी सांगितले, विरोधकांची दुरवस्था झाली आहे. देशात मोदीद्वेषाचे राजकारण सुरू आहे. द्वेषावर राजकारण चालत नाही. अविश्वास ठराव फेटाळला गेल्याने सरकारने जनतेचा विश्वास, मन आणि हृदय जिंकले आहे.विद्यार्थ्यांनी काय अभ्यास करावा याची पालकांना माहिती व्हावी यासाठी पहिले ते आठवीच्या पालकांना माहितीपत्रके देणार आहोत. पाचवी व आठवीत दोन वेळा परीक्षा घेण्याचा किंवा न घेण्याचा अधिकार राज्य शासनाला देण्यात आला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवायचे की नाही याचा निर्णय आता राज्य शासनाकडून घेतला जाईल.मध्यान्ह भोजनाचे स्वरूप काय असावे, याचे प्रयोग राज्य सरकारने करावेत. प्रत्येक विद्यार्थ्याला दरडोई ९ रुपये अनुदान दिले जाते. या योजनेसाठी शासनाने १७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दहा कोटी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.विद्यापीठातील भरतीच्या निर्णयासाठी थोडे दिवस थांबावे लागेल, आरक्षण कायम राहील. संस्थेचे एकत्र रोस्टर असेल विभागवार नसेल. सर्वांच्या अधिकारांचे संरक्षण होईल, असे जावडेकर यांनी सांगितले.भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, सुशील मेंगडे, दीपक पोटे, माधुरी सहस्रबुद्धे, श्रद्धा प्रभुणे, मंजूश्री खर्डेकर, वासंती जाधव, छाया मारणे, अल्पना वरपे, किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, प्रकाश बालवडकर उपस्थित होते. स्मार्ट पुणे फाऊंडेशनचे डॉ. संदीप बुटाला यांनी संयोजन केले.दहा कोटी महिलांना गॅस कनेक्शनप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कोथरूड परिसरातील १६३ महिलांना एलपीजी गॅसचे विनामूल्य वाटप करण्यात आले. देशभरात या योजनेअंतर्गत आतापर्यंत १० कोटी महिलांना विनामूल्य गॅस कनेक्शन देण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी या वेळी दिली.महिलांना स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करावा लागतो. त्यासाठी झाडे तोडावी लागतात, पर्यावरणाचा ºहास होतो, धुरामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. देशातील या गरीब महिलांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी मोदींनी उज्ज्वला योजना सुरू केली.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरEducationशिक्षण