शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

राजद्रोहाच्या गुन्ह्याचे गांभीर्यच सरकारने संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राजद्रोहाचा गुन्हा अतिशय गंभीर असतो. तो कोणावरही कोणत्याही कारणासाठी दाखल करून केंद्र सरकारने या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राजद्रोहाचा गुन्हा अतिशय गंभीर असतो. तो कोणावरही कोणत्याही कारणासाठी दाखल करून केंद्र सरकारने या गुन्ह्याचे गांभीर्यच संपवले आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब मारणे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त शहरातील ५ ज्येष्ठ काँग्रेसजनांचा गौरव देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. राजीव गांधी स्मारक समिती व गोपाळ तिवारी मित्र मंडळाच्या वतीने संभाजी पुलाजवळच्या विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम झाला. माजी खासदार अशोक मोहोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

मधुकर सणस, भगवान धुमाळ, रामचंद्र्र उर्फ भाऊ शेडगे, शेखर बर्वे, बुवा नलावडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहन जोशी व रमेश बागवे यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी आमदार उल्हास पवार, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप उपस्थित होते.

देसाई म्हणाले, नेहरू गांधी यांचे देशाच्या जडणघडणीतील योगदान फार मोठे आहे. त्यांचे नाव पुसून टाकण्यास निघालेले, त्यांच्यावर टीका करणारे विद्वेषाने पछाडलेले आहेत. मोहोळ यांनी तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या जगाला सामोरे जाणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी काँग्रेसने निर्माण करावी असे सांगितले. गोपाळ तिवारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बाळासाहेब मारणे, शेखर बर्वे,भगवान धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर यांची भाषणे झाली. कामगार नेते राजेंद्र खराडे यांनी आभार मानले.