शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने सचिन वाझेंची वकिली केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST

पुणे : राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय ...

पुणे : राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलीसच अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत असतील तर राज्यातील कायदा-सुव्यवस्था कशी टिकणार? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईमधील घरासमोर स्फोटके असलेली मोटार आढळून आल्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा खाडीमध्ये मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. एनआयएकडून शनिवारी रात्री उशिरा सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी माध्यमांशी पुण्यात संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, वाझे यांना वाचविण्यासाठी ‘ते काय ओसामा बिन लादेन आहेत की काय?’ अशी विधाने केली. परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे होते. त्यामुळेच मला प्राप्त झालेले पुरावे सभागृहात मांडले. पोलीस अधिकारीच असे काम करू लागले तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. एनआयएला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. गुन्हा नेमका कशा प्रकारे घडला हे आता समोर आले आहे. या प्रकरणाचा एकच भाग समोर आला आहे. आणखी बरीचसी माहिती समोर येणे बाकी आहे. ही माहितीही समोर येईलच असे सूचक विधान फडणवीस यांनी केलं आहे.

मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, मी तज्ज्ञांची या विषयावर चर्चा केली. वाझे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित असल्याचे मला सांगण्यात आले होते. परंतु, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे निमित्त करून सचिन वाझे यांच्यासह काही निलंबित अधिकाऱ्यांना रुजू करून घेतले. वाझे यांना सेवेते घेण्याची, त्यांना मुंबईतील महत्त्वाच्या पदावर नेमण्याची सरकारला घाई का झाली होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आरोपींना संरक्षण देणाऱ्यांना जाब विचारायला हवा

सचिन वाझे यांच्यापुरतेच हे प्रकरण मर्यादित नाही. कोण कोण यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांची चौकशी केली जावी. जे आज अटकेत आहेत तेच या प्रकरणाचे तपास अधिकारी होते ही गंभीर बाब आहे. त्यामुळे, त्यांच्या तपासावर विश्वास कसा ठेवणार? एवढे पुरावे समोर आल्यानंतरही जे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविला जातोय, महाराष्ट्र द्रोह वगैरे शब्दप्रयोग करणाऱ्यांनी एकदा आरशात पाहिले पाहिजे. एवढं भयानक कोणी वागत असेल तर त्यामधून मुंबई पोलिसांची प्रतिमा उजळते का, असा सवाल त्यांनी केला. राज्य खिळखिळे करण्याचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य दूधखुळेपणाचे आणि हास्यास्पद असून आरोपींना संरक्षण देणाऱ्यांना याबाबत जाब विचारायला हवा असे फडणवीस म्हणाले.