शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

सरकारने सचिन वाझेंची वकिली केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST

पुणे : राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय ...

पुणे : राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलीसच अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत असतील तर राज्यातील कायदा-सुव्यवस्था कशी टिकणार? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईमधील घरासमोर स्फोटके असलेली मोटार आढळून आल्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा खाडीमध्ये मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. एनआयएकडून शनिवारी रात्री उशिरा सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी माध्यमांशी पुण्यात संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, वाझे यांना वाचविण्यासाठी ‘ते काय ओसामा बिन लादेन आहेत की काय?’ अशी विधाने केली. परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे होते. त्यामुळेच मला प्राप्त झालेले पुरावे सभागृहात मांडले. पोलीस अधिकारीच असे काम करू लागले तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. एनआयएला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. गुन्हा नेमका कशा प्रकारे घडला हे आता समोर आले आहे. या प्रकरणाचा एकच भाग समोर आला आहे. आणखी बरीचसी माहिती समोर येणे बाकी आहे. ही माहितीही समोर येईलच असे सूचक विधान फडणवीस यांनी केलं आहे.

मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, मी तज्ज्ञांची या विषयावर चर्चा केली. वाझे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित असल्याचे मला सांगण्यात आले होते. परंतु, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे निमित्त करून सचिन वाझे यांच्यासह काही निलंबित अधिकाऱ्यांना रुजू करून घेतले. वाझे यांना सेवेते घेण्याची, त्यांना मुंबईतील महत्त्वाच्या पदावर नेमण्याची सरकारला घाई का झाली होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आरोपींना संरक्षण देणाऱ्यांना जाब विचारायला हवा

सचिन वाझे यांच्यापुरतेच हे प्रकरण मर्यादित नाही. कोण कोण यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांची चौकशी केली जावी. जे आज अटकेत आहेत तेच या प्रकरणाचे तपास अधिकारी होते ही गंभीर बाब आहे. त्यामुळे, त्यांच्या तपासावर विश्वास कसा ठेवणार? एवढे पुरावे समोर आल्यानंतरही जे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविला जातोय, महाराष्ट्र द्रोह वगैरे शब्दप्रयोग करणाऱ्यांनी एकदा आरशात पाहिले पाहिजे. एवढं भयानक कोणी वागत असेल तर त्यामधून मुंबई पोलिसांची प्रतिमा उजळते का, असा सवाल त्यांनी केला. राज्य खिळखिळे करण्याचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य दूधखुळेपणाचे आणि हास्यास्पद असून आरोपींना संरक्षण देणाऱ्यांना याबाबत जाब विचारायला हवा असे फडणवीस म्हणाले.