शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने सचिन वाझेंची वकिली केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST

पुणे : राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय ...

पुणे : राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलीसच अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत असतील तर राज्यातील कायदा-सुव्यवस्था कशी टिकणार? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईमधील घरासमोर स्फोटके असलेली मोटार आढळून आल्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा खाडीमध्ये मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. एनआयएकडून शनिवारी रात्री उशिरा सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी माध्यमांशी पुण्यात संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, वाझे यांना वाचविण्यासाठी ‘ते काय ओसामा बिन लादेन आहेत की काय?’ अशी विधाने केली. परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे होते. त्यामुळेच मला प्राप्त झालेले पुरावे सभागृहात मांडले. पोलीस अधिकारीच असे काम करू लागले तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. एनआयएला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. गुन्हा नेमका कशा प्रकारे घडला हे आता समोर आले आहे. या प्रकरणाचा एकच भाग समोर आला आहे. आणखी बरीचसी माहिती समोर येणे बाकी आहे. ही माहितीही समोर येईलच असे सूचक विधान फडणवीस यांनी केलं आहे.

मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, मी तज्ज्ञांची या विषयावर चर्चा केली. वाझे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित असल्याचे मला सांगण्यात आले होते. परंतु, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे निमित्त करून सचिन वाझे यांच्यासह काही निलंबित अधिकाऱ्यांना रुजू करून घेतले. वाझे यांना सेवेते घेण्याची, त्यांना मुंबईतील महत्त्वाच्या पदावर नेमण्याची सरकारला घाई का झाली होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आरोपींना संरक्षण देणाऱ्यांना जाब विचारायला हवा

सचिन वाझे यांच्यापुरतेच हे प्रकरण मर्यादित नाही. कोण कोण यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांची चौकशी केली जावी. जे आज अटकेत आहेत तेच या प्रकरणाचे तपास अधिकारी होते ही गंभीर बाब आहे. त्यामुळे, त्यांच्या तपासावर विश्वास कसा ठेवणार? एवढे पुरावे समोर आल्यानंतरही जे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविला जातोय, महाराष्ट्र द्रोह वगैरे शब्दप्रयोग करणाऱ्यांनी एकदा आरशात पाहिले पाहिजे. एवढं भयानक कोणी वागत असेल तर त्यामधून मुंबई पोलिसांची प्रतिमा उजळते का, असा सवाल त्यांनी केला. राज्य खिळखिळे करण्याचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य दूधखुळेपणाचे आणि हास्यास्पद असून आरोपींना संरक्षण देणाऱ्यांना याबाबत जाब विचारायला हवा असे फडणवीस म्हणाले.