शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

आदिवासी आश्रमशाळांतही दर्जेदार शिक्षण - आयुष प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:14 IST

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शाळांप्रमाणे चांगले गुण मिळावेत, त्यांची गुणवत्ता वाढावी, तसेच यासाठी प्रकल्पाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. घोडेगाव प्रकल्पातील ३१ शाळांतील शंभर टक्के मुले दहावीत पास झाली पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शाळांप्रमाणे चांगले गुण मिळावेत, त्यांची गुणवत्ता वाढावी, तसेच यासाठी प्रकल्पाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. घोडेगाव प्रकल्पातील ३१ शाळांतील शंभर टक्के मुले दहावीत पास झाली पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मुलांना परीक्षा सोपी जावी, म्हणून प्रश्नपुस्तक तयार केले व हे पुस्तक सर्व मुलांना वाटले आहे. एवढेच नाही, तर टॉपर २५ मुलांचे विशेष शिबिर घेऊन ते स्वत: मुलांचा अभ्यास घेतात. आता ते १० वीच्या निकालाची वाट पाहत असून यावर्षी आश्रमशाळेचा निकाल सर्वोत्तम लागेल, असा विश्वास त्यांना आहे.आयुष प्रसाद म्हणाले, की एकीकाडे शासन आश्रमशाळांवर भरपूर खर्च करते. जेवढा शासन खर्च करते तेवढा खर्च कोणतीही खासगी शाळा करीत नाही. आश्रमशाळांमधील शिक्षक उच्चशिक्षित आहेत. शाळांच्या इमारती चांगल्या आहेत. मुलांना सर्व शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. जेवण वेळेवर दिले जाते,. संगणकाच्या अतिउच्च दर्जाच्या लॅब आहेत. संगणक आहेत, क्रीडांगण आहे जे शाळेसाठी हवे आहे, त्या सगळ्या सुविधा असतानाही आश्रमशाळांना चांगल्या शाळेचा दर्जा मिळत नाही, त्यांचा निकाल चांगला लागत नाही. असे का होते हा विचार केला. आश्रमशाळांमध्ये गुणवत्तेवर लक्ष दिले जात नाही, असे निदर्शनास आले. कोणतीही शाळा गुणवत्तेवर गणली जाते. यासाठी घोडेगाव प्रकल्पातील ३१ आश्रमशाळांतील मुलांचे गुण वाढावेत, याकडे लक्ष देण्याचे ठरविले. आश्रमशाळांतील मुलेदेखील कमी नाहीत, हे दाखवून देण्यासाठी तीन उद्दिष्टे ठेवली. दहावीतील शंभर टक्के मुले पास झाली पाहिजेत, प्रत्येक शाळेचे सरासरी गुण दहा टक्के वाढले पाहिजेत व मागच्या वर्षी टॉपर असलेल्या मुलांमध्ये पाच टक्के वाढ झाली पाहिजे. ही तीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सराव परीक्षेमधून नापास होणारी मुले निवडली. या मुलांवर लक्ष केंद्रित केले. यासाठी मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, विषयशिक्षक यांच्या बैठका घेतल्या; तसेच सगळ््या मुलांसाठी प्रश्नपुस्तक काढले. या पुस्तकातील प्रकरणानुसार आणि परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नानुसार मुलांना समजेल, असे पुस्तक तयार करण्यात आले. हे पुस्तक आश्रमशाळांमधील सर्वोत्तम शिक्षकांनी तयार केले. तसेच त्यांनी या मुलांची वेळोवेळी भेट घेऊन अभ्यास कसा करावा, परीक्षेला कसे सामोरे जावे, गुण वाढण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. त्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा विभागाचा दर्जा सुधारावा, याकडेही लक्ष दिले. यासाठी मुलांचा सराव करून घेतला. स्वत: मुलांचा योगा घेतला. राजपूर येथे प्रकल्पस्तरीय तर घोडेगाव येथे विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये आश्रमशाळेतील मुलांनी चांगले यश संपादन केले. यातून घोडेगाव प्रकल्पातील ३३ मुले राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवडली गेली. आदिवासी मुलांमधील गुण पाहता ही मुले क्रीडा स्पर्धेत चांगले काम करू शकतात, असा विश्वास आहे. तसेच यावर्षी दहावी, बारावीमध्ये गेलेल्या मुलांसाठी घोडेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत उन्हाळी सुटीत जादा क्लास सुरू केले आहेत. जूनपासून डिसेंबरपर्यंत वर्गामध्ये शिकविलेला अभ्यासक्रम फेब्रुवारीमध्ये होणाºया परीक्षेत विद्यार्थ्यांच्या पूर्ण लक्षात राहत नाही. अभ्यास करताना त्यांची दमछाक होते, पेपर हातात येईपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी शासकीय आश्रमशाळेतील तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांकडून अभ्यास घेतला जात आहे. या उपक्रमामुळे दुर्गम डोंगरी भागातील विद्यार्थी ख-या अर्थाने मुख्य प्रवाहात येणार आहे. यामुळे त्याला शहरी भागाप्रमाणेच पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. भविष्यात मनाचा कौल ओळखून शिक्षण तसेच मार्ग निवडता येणार असल्यामुळे त्याचा विकास होणार आहे. परंपरा आणि समूहाच्या चक्रव्यूहात न अडकता हे विद्यार्थी ख-या अर्थाने मोकळ्या आकाशात उडण्यासाठी सज्ज होतील. हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात सर्व ठिकाणी सुरू करण्यास प्रयत्नशील आहोत.

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्या