शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळांतही दर्जेदार शिक्षण - आयुष प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:14 IST

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शाळांप्रमाणे चांगले गुण मिळावेत, त्यांची गुणवत्ता वाढावी, तसेच यासाठी प्रकल्पाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. घोडेगाव प्रकल्पातील ३१ शाळांतील शंभर टक्के मुले दहावीत पास झाली पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शाळांप्रमाणे चांगले गुण मिळावेत, त्यांची गुणवत्ता वाढावी, तसेच यासाठी प्रकल्पाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. घोडेगाव प्रकल्पातील ३१ शाळांतील शंभर टक्के मुले दहावीत पास झाली पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मुलांना परीक्षा सोपी जावी, म्हणून प्रश्नपुस्तक तयार केले व हे पुस्तक सर्व मुलांना वाटले आहे. एवढेच नाही, तर टॉपर २५ मुलांचे विशेष शिबिर घेऊन ते स्वत: मुलांचा अभ्यास घेतात. आता ते १० वीच्या निकालाची वाट पाहत असून यावर्षी आश्रमशाळेचा निकाल सर्वोत्तम लागेल, असा विश्वास त्यांना आहे.आयुष प्रसाद म्हणाले, की एकीकाडे शासन आश्रमशाळांवर भरपूर खर्च करते. जेवढा शासन खर्च करते तेवढा खर्च कोणतीही खासगी शाळा करीत नाही. आश्रमशाळांमधील शिक्षक उच्चशिक्षित आहेत. शाळांच्या इमारती चांगल्या आहेत. मुलांना सर्व शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. जेवण वेळेवर दिले जाते,. संगणकाच्या अतिउच्च दर्जाच्या लॅब आहेत. संगणक आहेत, क्रीडांगण आहे जे शाळेसाठी हवे आहे, त्या सगळ्या सुविधा असतानाही आश्रमशाळांना चांगल्या शाळेचा दर्जा मिळत नाही, त्यांचा निकाल चांगला लागत नाही. असे का होते हा विचार केला. आश्रमशाळांमध्ये गुणवत्तेवर लक्ष दिले जात नाही, असे निदर्शनास आले. कोणतीही शाळा गुणवत्तेवर गणली जाते. यासाठी घोडेगाव प्रकल्पातील ३१ आश्रमशाळांतील मुलांचे गुण वाढावेत, याकडे लक्ष देण्याचे ठरविले. आश्रमशाळांतील मुलेदेखील कमी नाहीत, हे दाखवून देण्यासाठी तीन उद्दिष्टे ठेवली. दहावीतील शंभर टक्के मुले पास झाली पाहिजेत, प्रत्येक शाळेचे सरासरी गुण दहा टक्के वाढले पाहिजेत व मागच्या वर्षी टॉपर असलेल्या मुलांमध्ये पाच टक्के वाढ झाली पाहिजे. ही तीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सराव परीक्षेमधून नापास होणारी मुले निवडली. या मुलांवर लक्ष केंद्रित केले. यासाठी मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, विषयशिक्षक यांच्या बैठका घेतल्या; तसेच सगळ््या मुलांसाठी प्रश्नपुस्तक काढले. या पुस्तकातील प्रकरणानुसार आणि परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नानुसार मुलांना समजेल, असे पुस्तक तयार करण्यात आले. हे पुस्तक आश्रमशाळांमधील सर्वोत्तम शिक्षकांनी तयार केले. तसेच त्यांनी या मुलांची वेळोवेळी भेट घेऊन अभ्यास कसा करावा, परीक्षेला कसे सामोरे जावे, गुण वाढण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. त्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा विभागाचा दर्जा सुधारावा, याकडेही लक्ष दिले. यासाठी मुलांचा सराव करून घेतला. स्वत: मुलांचा योगा घेतला. राजपूर येथे प्रकल्पस्तरीय तर घोडेगाव येथे विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये आश्रमशाळेतील मुलांनी चांगले यश संपादन केले. यातून घोडेगाव प्रकल्पातील ३३ मुले राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवडली गेली. आदिवासी मुलांमधील गुण पाहता ही मुले क्रीडा स्पर्धेत चांगले काम करू शकतात, असा विश्वास आहे. तसेच यावर्षी दहावी, बारावीमध्ये गेलेल्या मुलांसाठी घोडेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत उन्हाळी सुटीत जादा क्लास सुरू केले आहेत. जूनपासून डिसेंबरपर्यंत वर्गामध्ये शिकविलेला अभ्यासक्रम फेब्रुवारीमध्ये होणाºया परीक्षेत विद्यार्थ्यांच्या पूर्ण लक्षात राहत नाही. अभ्यास करताना त्यांची दमछाक होते, पेपर हातात येईपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी शासकीय आश्रमशाळेतील तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांकडून अभ्यास घेतला जात आहे. या उपक्रमामुळे दुर्गम डोंगरी भागातील विद्यार्थी ख-या अर्थाने मुख्य प्रवाहात येणार आहे. यामुळे त्याला शहरी भागाप्रमाणेच पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. भविष्यात मनाचा कौल ओळखून शिक्षण तसेच मार्ग निवडता येणार असल्यामुळे त्याचा विकास होणार आहे. परंपरा आणि समूहाच्या चक्रव्यूहात न अडकता हे विद्यार्थी ख-या अर्थाने मोकळ्या आकाशात उडण्यासाठी सज्ज होतील. हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात सर्व ठिकाणी सुरू करण्यास प्रयत्नशील आहोत.

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्या