शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळांतही दर्जेदार शिक्षण - आयुष प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:14 IST

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शाळांप्रमाणे चांगले गुण मिळावेत, त्यांची गुणवत्ता वाढावी, तसेच यासाठी प्रकल्पाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. घोडेगाव प्रकल्पातील ३१ शाळांतील शंभर टक्के मुले दहावीत पास झाली पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शाळांप्रमाणे चांगले गुण मिळावेत, त्यांची गुणवत्ता वाढावी, तसेच यासाठी प्रकल्पाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. घोडेगाव प्रकल्पातील ३१ शाळांतील शंभर टक्के मुले दहावीत पास झाली पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मुलांना परीक्षा सोपी जावी, म्हणून प्रश्नपुस्तक तयार केले व हे पुस्तक सर्व मुलांना वाटले आहे. एवढेच नाही, तर टॉपर २५ मुलांचे विशेष शिबिर घेऊन ते स्वत: मुलांचा अभ्यास घेतात. आता ते १० वीच्या निकालाची वाट पाहत असून यावर्षी आश्रमशाळेचा निकाल सर्वोत्तम लागेल, असा विश्वास त्यांना आहे.आयुष प्रसाद म्हणाले, की एकीकाडे शासन आश्रमशाळांवर भरपूर खर्च करते. जेवढा शासन खर्च करते तेवढा खर्च कोणतीही खासगी शाळा करीत नाही. आश्रमशाळांमधील शिक्षक उच्चशिक्षित आहेत. शाळांच्या इमारती चांगल्या आहेत. मुलांना सर्व शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. जेवण वेळेवर दिले जाते,. संगणकाच्या अतिउच्च दर्जाच्या लॅब आहेत. संगणक आहेत, क्रीडांगण आहे जे शाळेसाठी हवे आहे, त्या सगळ्या सुविधा असतानाही आश्रमशाळांना चांगल्या शाळेचा दर्जा मिळत नाही, त्यांचा निकाल चांगला लागत नाही. असे का होते हा विचार केला. आश्रमशाळांमध्ये गुणवत्तेवर लक्ष दिले जात नाही, असे निदर्शनास आले. कोणतीही शाळा गुणवत्तेवर गणली जाते. यासाठी घोडेगाव प्रकल्पातील ३१ आश्रमशाळांतील मुलांचे गुण वाढावेत, याकडे लक्ष देण्याचे ठरविले. आश्रमशाळांतील मुलेदेखील कमी नाहीत, हे दाखवून देण्यासाठी तीन उद्दिष्टे ठेवली. दहावीतील शंभर टक्के मुले पास झाली पाहिजेत, प्रत्येक शाळेचे सरासरी गुण दहा टक्के वाढले पाहिजेत व मागच्या वर्षी टॉपर असलेल्या मुलांमध्ये पाच टक्के वाढ झाली पाहिजे. ही तीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सराव परीक्षेमधून नापास होणारी मुले निवडली. या मुलांवर लक्ष केंद्रित केले. यासाठी मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, विषयशिक्षक यांच्या बैठका घेतल्या; तसेच सगळ््या मुलांसाठी प्रश्नपुस्तक काढले. या पुस्तकातील प्रकरणानुसार आणि परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नानुसार मुलांना समजेल, असे पुस्तक तयार करण्यात आले. हे पुस्तक आश्रमशाळांमधील सर्वोत्तम शिक्षकांनी तयार केले. तसेच त्यांनी या मुलांची वेळोवेळी भेट घेऊन अभ्यास कसा करावा, परीक्षेला कसे सामोरे जावे, गुण वाढण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. त्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा विभागाचा दर्जा सुधारावा, याकडेही लक्ष दिले. यासाठी मुलांचा सराव करून घेतला. स्वत: मुलांचा योगा घेतला. राजपूर येथे प्रकल्पस्तरीय तर घोडेगाव येथे विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये आश्रमशाळेतील मुलांनी चांगले यश संपादन केले. यातून घोडेगाव प्रकल्पातील ३३ मुले राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवडली गेली. आदिवासी मुलांमधील गुण पाहता ही मुले क्रीडा स्पर्धेत चांगले काम करू शकतात, असा विश्वास आहे. तसेच यावर्षी दहावी, बारावीमध्ये गेलेल्या मुलांसाठी घोडेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत उन्हाळी सुटीत जादा क्लास सुरू केले आहेत. जूनपासून डिसेंबरपर्यंत वर्गामध्ये शिकविलेला अभ्यासक्रम फेब्रुवारीमध्ये होणाºया परीक्षेत विद्यार्थ्यांच्या पूर्ण लक्षात राहत नाही. अभ्यास करताना त्यांची दमछाक होते, पेपर हातात येईपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी शासकीय आश्रमशाळेतील तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांकडून अभ्यास घेतला जात आहे. या उपक्रमामुळे दुर्गम डोंगरी भागातील विद्यार्थी ख-या अर्थाने मुख्य प्रवाहात येणार आहे. यामुळे त्याला शहरी भागाप्रमाणेच पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. भविष्यात मनाचा कौल ओळखून शिक्षण तसेच मार्ग निवडता येणार असल्यामुळे त्याचा विकास होणार आहे. परंपरा आणि समूहाच्या चक्रव्यूहात न अडकता हे विद्यार्थी ख-या अर्थाने मोकळ्या आकाशात उडण्यासाठी सज्ज होतील. हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात सर्व ठिकाणी सुरू करण्यास प्रयत्नशील आहोत.

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्या