शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटसृष्टीच्या भगवीकरणाचा डाव - योगेंद्र यादव

By admin | Updated: June 15, 2015 09:16 IST

भारतीय चित्रपट व दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे संस्थेचे अवमुल्यन झाले आहे.

पुणे : भारतीय चित्रपट व दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे संस्थेचे अवमुल्यन झाले आहे. भाजप सत्तेत आल्यापासून देशातील अशा महत्वाच्या संस्थांवर अशा लोकांची नियुक्ती केली जात आहे. यामुळे देशातील या संस्थांवर दुरगामी परिणाम होतील, अशी टीका स्वराज्य अभियानाचे प्रा. योगेंद्र यादव यांनी केली. चौहान यांच्या नियुक्तीवरून 'एफटीआयआय'मधील विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. प्रा. यादव हे रविवारी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी संस्थेत आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चौहान यांच्या नियुक्तीवरून भाजपा सरकारवर टीका केली. यादव म्हणाले, देशात अनेक अशा संस्था आहेत, त्यावर प्रत्येकाला गर्व आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून या संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. त्यांच्या स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. गिरीश कर्नाड यांच्यासह अनेकांनी या संस्थेचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र चौहान यांच्या नियुक्तीने संस्थेचे अवमुल्यन झाले आहे. मोठय़ा संस्थांच्या प्रमुखपदी नियुक्ती कराव्यात अशा व्यक्ती भाजपामध्ये सापडत नाहीत. त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर हसावे की रडावे अशी अवस्था होते. भारतीय मुल्य, संस्कृती, संस्थांचा इतिहास या लोकांना माहित नाही. चांगल्या लोकांना काढून ते असे लोक बसवत आहेत. भविष्यात याचे दुष्परिणाम होतील, याची त्यांना कल्पना नाही, असे प्रा. यादव यांनी नमुद केले. हे तर संस्थेचे अवमूल्यन : योगेंद्र यादव एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर संवाद साधताना योगेंद्र यादव. पुणे : पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाशी निगडित असलेल्या पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड केली आणि आता त्याच पक्षाशी निगडित असलेल्या गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. यावरून मोदी सरकारने चित्रपटसृष्टीच्या भगवीकरणाचा डाव आखला आहे, असा गंभीर आरोप माहितीपट निर्माते आनंद पटवर्धन यांनी रविवारी केला.फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथे चौहान यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पटवर्धन आले होते. या वेळी त्यांनी हा आरोप केला. गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला यापूर्वीच 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'ने (एनएसडी) पाठिंबा दिला असून, आज पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना सर्मथन दिल्याने आता हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये आजही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत चौहान यांना हटविण्याची मागणी केली.या वेळी पटवर्धन म्हणाले, ''चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी 'भीष्म पितामह' म्हणजेच मुकेश खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. तर आता एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी 'युधिष्ठिर'ची म्हणजेच गजेंद्र चौहान यांची निवड करण्यात आली आहे. आता या महाभारतातील फक्त 'कृष्ण'च येण्याचा राहिला आहे. मोदी सरकार आल्यानंतरच या सर्व क्षेत्राचे भगवीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चौहान यांना केलेला विरोध योग्य आहे.''ते म्हणाले, ''ही निवड कशाच्या आधारावर करण्यात आली, त्यासाठी कोणत्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला, याचा खुलासा सरकारने करायला हवा. मात्र, सरकार हा खुलासा करीत नसल्याने चौहान यांची निवड राजकीय वरदहस्त असल्याने अपारदश्री पद्धतीने करण्यात आल्याचे सिद्ध होत आहे.''