शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

चित्रपटसृष्टीच्या भगवीकरणाचा डाव - योगेंद्र यादव

By admin | Updated: June 15, 2015 09:16 IST

भारतीय चित्रपट व दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे संस्थेचे अवमुल्यन झाले आहे.

पुणे : भारतीय चित्रपट व दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे संस्थेचे अवमुल्यन झाले आहे. भाजप सत्तेत आल्यापासून देशातील अशा महत्वाच्या संस्थांवर अशा लोकांची नियुक्ती केली जात आहे. यामुळे देशातील या संस्थांवर दुरगामी परिणाम होतील, अशी टीका स्वराज्य अभियानाचे प्रा. योगेंद्र यादव यांनी केली. चौहान यांच्या नियुक्तीवरून 'एफटीआयआय'मधील विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. प्रा. यादव हे रविवारी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी संस्थेत आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चौहान यांच्या नियुक्तीवरून भाजपा सरकारवर टीका केली. यादव म्हणाले, देशात अनेक अशा संस्था आहेत, त्यावर प्रत्येकाला गर्व आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून या संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. त्यांच्या स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. गिरीश कर्नाड यांच्यासह अनेकांनी या संस्थेचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र चौहान यांच्या नियुक्तीने संस्थेचे अवमुल्यन झाले आहे. मोठय़ा संस्थांच्या प्रमुखपदी नियुक्ती कराव्यात अशा व्यक्ती भाजपामध्ये सापडत नाहीत. त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर हसावे की रडावे अशी अवस्था होते. भारतीय मुल्य, संस्कृती, संस्थांचा इतिहास या लोकांना माहित नाही. चांगल्या लोकांना काढून ते असे लोक बसवत आहेत. भविष्यात याचे दुष्परिणाम होतील, याची त्यांना कल्पना नाही, असे प्रा. यादव यांनी नमुद केले. हे तर संस्थेचे अवमूल्यन : योगेंद्र यादव एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर संवाद साधताना योगेंद्र यादव. पुणे : पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाशी निगडित असलेल्या पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड केली आणि आता त्याच पक्षाशी निगडित असलेल्या गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. यावरून मोदी सरकारने चित्रपटसृष्टीच्या भगवीकरणाचा डाव आखला आहे, असा गंभीर आरोप माहितीपट निर्माते आनंद पटवर्धन यांनी रविवारी केला.फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथे चौहान यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पटवर्धन आले होते. या वेळी त्यांनी हा आरोप केला. गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला यापूर्वीच 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'ने (एनएसडी) पाठिंबा दिला असून, आज पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना सर्मथन दिल्याने आता हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये आजही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत चौहान यांना हटविण्याची मागणी केली.या वेळी पटवर्धन म्हणाले, ''चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी 'भीष्म पितामह' म्हणजेच मुकेश खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. तर आता एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी 'युधिष्ठिर'ची म्हणजेच गजेंद्र चौहान यांची निवड करण्यात आली आहे. आता या महाभारतातील फक्त 'कृष्ण'च येण्याचा राहिला आहे. मोदी सरकार आल्यानंतरच या सर्व क्षेत्राचे भगवीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चौहान यांना केलेला विरोध योग्य आहे.''ते म्हणाले, ''ही निवड कशाच्या आधारावर करण्यात आली, त्यासाठी कोणत्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला, याचा खुलासा सरकारने करायला हवा. मात्र, सरकार हा खुलासा करीत नसल्याने चौहान यांची निवड राजकीय वरदहस्त असल्याने अपारदश्री पद्धतीने करण्यात आल्याचे सिद्ध होत आहे.''