शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेळी, बोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

बारामती :वाढत्या बेकारीमुळे आता रोकड आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच चक्क शेळी आणि बोकडाची देखील चोरी होण्यास सुरुवात झाली आहे. शहर ...

बारामती :वाढत्या बेकारीमुळे आता रोकड आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच चक्क शेळी आणि बोकडाची देखील चोरी होण्यास सुरुवात झाली आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतून २० जून रोजी पिंपळी लिमटेक येथून फिर्यादीच्या घरासमोरील गोट्यातून एक बोकड व शेळी चोरी केल्याची तक्रार दाखल आहे. त्याअनुशंगाने दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यात येत होता. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर परिसरात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी हे पिंपळी लिमटेक चौकात आले असलेचे समजले.

पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्या दोघांनी आपले नाव अक्षय दादा बोरकर, अशोक विश्वास गंगावणे (रा. दोघे विठठलवाडी, गुणवडी, ता. बारामती, जि. पुणे) असे सांगितले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस चौकशी केली असता त्यांनी लिमटेक येथून एक शेळी व बोकड चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रूपेश साळुके, पोलीस कॉन्स्टेबल अजित राऊत ,तुषार चव्हाण, अकबर शेख, सुहास लाटणे, दशर इंगोले, होमगार्ड संदीप थोरात यांनी कारवाईत सहभाग घेतला.