शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

संमेलनात साहित्याची सर्वंकष चर्चा - विजय खरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:50 IST

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडी सेंटरच्या वतीने दि. ११, १२, १३ व १४ जानेवारी २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडी सेंटरच्या वतीने दि. ११, १२, १३ व १४ जानेवारी २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. संमेलनात सर्वंकश चर्चा घडून यावी अशी अपेक्षा डॉ. खरे यांनी व्यक्त केली.विजय खरे म्हणाले, सम्यक साहित्य संमेलनाच्या नावात थोडासा बदल करून त्याचे नाव या वर्षीपासून अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन असे करण्यात आले आहे. सर्वांना सामावून घेणारे सर्वसमावेशक असे हे संमेलन असणार आहे.अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनामध्ये साहित्याची सर्वंकष चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. इतर कुठल्याही संमेलनाशी याची स्पर्धा नाही. समकालीन विषयांना भिडण्याचा प्रयत्न या संमेलनात करण्यात आला आहे.महाराष्टÑाच्या मराठी साहित्य-संस्कृती पर्यावरणात तसेच इतर राज्यांच्या भाषिक आणि साहित्य व्यवहारात सम्यक साहित्य संमेलनाने वेगळा ठसा उमटविलेला आहे. आतापर्यंत पार पडलेल्या ५ सम्यक साहित्य संमेलनांना भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. आगामी संमेलनास त्यापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून परशुराम वाडेकर हे जबाबदारी पार पाडीत आहेत.डॉ. यशवंत मनोहर यांचे नाव साहित्य क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांचे उत्थानगुंफा, काव्यभीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता आदी कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.यशवंत मनोहर यांनी वैचारिक साहित्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. डॉ. आंबेडकरांचा बुद्धधम्म, मंडल आयोग, आपले महाकाव्यातील नायक, रिपब्लिकन पक्ष, आंबेडकर संस्कृती, बुद्धाचे तत्त्वज्ञान, आचारधर्म आदी विषयांवर त्यांनी वैचारिक लेखन केले आहे.समीक्षेच्या क्षेत्रातही डॉ. मनोहर यांचे मोठे योगदान राहिले आहे. आंबेडकरी चळवळ आणि साहित्य, समाज आणि साहित्य समीक्षा, आंबेडकरवादी महागीतकार, दलित साहित्य आदी विषयांवर त्यांनी समीक्षात्मक लिखाण केले आहे.सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशाच्या विविध राज्यांतील, विविध भाषक साहित्यिक, कलावंत, नाट्यकर्मींना निमंत्रित करण्यात आले आहे. साहित्यविषयक विविध प्रकारचे उपक्रम या संमेलनात पार पाडले जाणार आहेत.बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलन स्थळाला ‘संविधाननगरी’ असे संबोधण्यात येणार आहे.संमेलनाच्या पूर्वसंध्येला ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता शिवाजीनगरच्या एसएसपीएमएस शाळेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना देऊन भिडे वाड्यापर्यंत ‘संविधान मिरवणूक’ काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सर्व निमंत्रित साहित्यिक, कलावंत व नाट्यकर्मी सहभागी होणार आहेत. ही संविधान सन्मान रॅली संमेलनाचे आकर्षण असणार आहे.संमेलनाचे उद्घाटन १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी होणार आहे. पद्मश्री के. इनोक यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे त्यांचे अध्यक्षीय विचार मांडतील. स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आपले विचार मांडतील.उद्घाटन सत्रात अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.शरणकुमार लिंबाळे, योगीराज वाघमारे, सदानंद देशमुख, नजुबाई गावित, फ. मुं. शिंदे, सुरेंद्र जोंधळे, राजन खान, जयदेव डोळे, राजनखान आदी मान्यवर लेखक, साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी या संमेलनाच्या निमित्ताने मिळणार आहे.

टॅग्स :marathiमराठीPuneपुणे