शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

संमेलनात साहित्याची सर्वंकष चर्चा - विजय खरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:50 IST

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडी सेंटरच्या वतीने दि. ११, १२, १३ व १४ जानेवारी २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडी सेंटरच्या वतीने दि. ११, १२, १३ व १४ जानेवारी २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. संमेलनात सर्वंकश चर्चा घडून यावी अशी अपेक्षा डॉ. खरे यांनी व्यक्त केली.विजय खरे म्हणाले, सम्यक साहित्य संमेलनाच्या नावात थोडासा बदल करून त्याचे नाव या वर्षीपासून अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन असे करण्यात आले आहे. सर्वांना सामावून घेणारे सर्वसमावेशक असे हे संमेलन असणार आहे.अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनामध्ये साहित्याची सर्वंकष चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. इतर कुठल्याही संमेलनाशी याची स्पर्धा नाही. समकालीन विषयांना भिडण्याचा प्रयत्न या संमेलनात करण्यात आला आहे.महाराष्टÑाच्या मराठी साहित्य-संस्कृती पर्यावरणात तसेच इतर राज्यांच्या भाषिक आणि साहित्य व्यवहारात सम्यक साहित्य संमेलनाने वेगळा ठसा उमटविलेला आहे. आतापर्यंत पार पडलेल्या ५ सम्यक साहित्य संमेलनांना भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. आगामी संमेलनास त्यापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून परशुराम वाडेकर हे जबाबदारी पार पाडीत आहेत.डॉ. यशवंत मनोहर यांचे नाव साहित्य क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांचे उत्थानगुंफा, काव्यभीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता आदी कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.यशवंत मनोहर यांनी वैचारिक साहित्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. डॉ. आंबेडकरांचा बुद्धधम्म, मंडल आयोग, आपले महाकाव्यातील नायक, रिपब्लिकन पक्ष, आंबेडकर संस्कृती, बुद्धाचे तत्त्वज्ञान, आचारधर्म आदी विषयांवर त्यांनी वैचारिक लेखन केले आहे.समीक्षेच्या क्षेत्रातही डॉ. मनोहर यांचे मोठे योगदान राहिले आहे. आंबेडकरी चळवळ आणि साहित्य, समाज आणि साहित्य समीक्षा, आंबेडकरवादी महागीतकार, दलित साहित्य आदी विषयांवर त्यांनी समीक्षात्मक लिखाण केले आहे.सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशाच्या विविध राज्यांतील, विविध भाषक साहित्यिक, कलावंत, नाट्यकर्मींना निमंत्रित करण्यात आले आहे. साहित्यविषयक विविध प्रकारचे उपक्रम या संमेलनात पार पाडले जाणार आहेत.बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलन स्थळाला ‘संविधाननगरी’ असे संबोधण्यात येणार आहे.संमेलनाच्या पूर्वसंध्येला ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता शिवाजीनगरच्या एसएसपीएमएस शाळेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना देऊन भिडे वाड्यापर्यंत ‘संविधान मिरवणूक’ काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सर्व निमंत्रित साहित्यिक, कलावंत व नाट्यकर्मी सहभागी होणार आहेत. ही संविधान सन्मान रॅली संमेलनाचे आकर्षण असणार आहे.संमेलनाचे उद्घाटन १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी होणार आहे. पद्मश्री के. इनोक यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे त्यांचे अध्यक्षीय विचार मांडतील. स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आपले विचार मांडतील.उद्घाटन सत्रात अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.शरणकुमार लिंबाळे, योगीराज वाघमारे, सदानंद देशमुख, नजुबाई गावित, फ. मुं. शिंदे, सुरेंद्र जोंधळे, राजन खान, जयदेव डोळे, राजनखान आदी मान्यवर लेखक, साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी या संमेलनाच्या निमित्ताने मिळणार आहे.

टॅग्स :marathiमराठीPuneपुणे