शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

धान्य व्यापा-यांनाही हव्यात सवलती! - पोपटलाल ओस्तवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 02:21 IST

धान्य व्यापारीदेखील इतर व्यवसायांप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती देत असतो. मात्र, त्याला कोणत्याही सवलती मिळत नाहीत. तसेच कधी व्यवसायवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते असे होत नाही. इतर उद्योगांप्रमाणे सरकारने सवलतींचे धोरण स्वीकारले पाहिजे.

धान्य व्यापारीदेखील इतर व्यवसायांप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती देत असतो. मात्र, त्याला कोणत्याही सवलती मिळत नाहीत. तसेच कधी व्यवसायवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते असे होत नाही. इतर उद्योगांप्रमाणे सरकारने सवलतींचे धोरण स्वीकारले पाहिजे. वस्तू आणि सेवाकरांतर्गत (जीएसटी) शेतमाल वगळला असला तरी, ब्रँेडेड वस्तूंचा त्यात समावेश आहे. तसेच, ई वे बिलाच्या चुकीच्या तरतुदी बदलण्यात याव्या, अशी अपेक्षा पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी व्यक्त केली.आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून गुरुवारी सादर होत असलेल्या केंद्रीय अंदाजपत्रकाकडे पाहिले जात आहे. व्यापाºयांनी आपल्या भूमिका वेळोवेळी केंद्र सरकारकडे मांडल्या आहेत. वस्तू आणि सेवा करातील तरतुदी (जीएसटी), आंतरराज्य मालवाहतूक करण्यासाठी येत्या १ फेब्रुवारीपासून लागू होत असलेले ई-वे बिल याबाबतही केंद्र सरकारकडे निवेदन देण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात आश्वासक बदल पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.फेब्रुवारीपासून लागू होत असलेल्या ई-वे बिलाशिवाय मालवाहतूक करता येणार नाही. अगदी पन्नास हजार रुपयांपर्यंत जरी मालाची वाहतूक करायची असली तरी असे बिल मालवाहतूक करणाºया व्यक्तीकडे असणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. त्याची मर्यादा ५ लाख रुपये करावी, अशी मागणी पूना मर्चंट चेंबरच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा व्यापाºयांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. सध्या देशांतर्गत व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वेगवेगळ्या राज्यांतून भुसार मालाची आवक होत असते. पुण्यासारखे शहर तर याचे केंद्र बनले आहे.देशामध्ये वस्तूंच्या वाहतुकीसाठी एकच ई-वे बिल असणार असून, त्यामुळे विनाअडथळा मालाची वाहतूक करणे शक्य होईल. परिणामी कोणत्याही राज्यात ट्रान्झिस्ट पासची आवश्यकता भासणार नाही. तसेच, व्यापारी व वाहतूकदारांना कर कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. कोणत्याही राज्यात चेक-पोस्ट नसल्याने वेळेत बचत होऊन वाहतुकीचा वेळ वाचणार असल्याचे जीएसटीच्या अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे.मात्र, या ई-वे बिलाची वैधता प्रत्येक १०० किलोमीटरकरिता एक दिवस याप्रमाणे असणार आहे. पुरवठादार, प्राप्तकर्ता अथवा वाहतूकदार हे एसएमएसद्वारे देखील ई-वे बिल तयार करणे, रद्द करणे तसेच वाहन क्रमांक अद्ययावत करण्याची कामे करू शकतात. त्यासाठी संबंधितांचा मोबाईल क्रमांक बिल प्रणालीवर नोंदणीकृत करणे गरजेचे आहे. तरच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, यातील तरतूद ही व्यापाराच्या दृष्टीने अडचणीची ठरणारी आहे. त्यामुळे त्यात सुटसुटीतपणा आणणे गरजेचे आहे. या तरतुदींचा पुनर्विचार झाला पाहिजे.जीएसटीमध्ये शेतमालाला वगळण्याची सरकारने घोषणा केली आहे. मात्र, त्यातून ब्रँडेड शेतमालाला वगळले आहे. आज बाजारात बहुतांश माल हा ब्रँडेड येतो. वजनाचे प्रमाणीकरण आणि खाद्यान्नाच्या दर्जाची खात्री विविध ब्रँड देत असतात. त्यामुळे पाकिटातील उडीद डाळ, तूरडाळ, मूगडाळ, तांदूळ, हळद, मिरची, धना यांसारख्या सर्वच वस्तूंना त्याचा फटका बसला आहे. या वस्तू जीएसटीतून वगळाव्यात, अशी आग्रही मागणी व्यापाºयांकडून करण्यात येत आहे. यामुळे महागाई वाढली आहे. थेट परकीय गुंतवणुकीवरून (एफडीआय) यापूर्वी भारतीय जनता पक्षानेच विरोधी भूमिका घेतली होती. आज सत्तेत आल्यानंतर त्यांची भूमिका बदलली आहे. किरकोळ व्यापारात परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊ नये. अन्यथा किरकोळ व्यापाºयासमोर संकट निर्माण होईल. उलट सरकारने देशातील हा उद्योग वाढावा यासाठी जाणीवपूर्ण प्रयत्न केले पाहिजे. विविध उद्योग आणि व्यवसायाला सरकार प्रोत्साहनपर सवलती देते. अनेकदा अनुदानही दिले जाते. तसेच प्रोत्साहन या व्यापारालाही मिळावे. या अंदाजपत्रकातून या अपेक्षा कितपत पूर्ण होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBudget 2018अर्थसंकल्प २०१८