शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

धान्य व्यापा-यांनाही हव्यात सवलती! - पोपटलाल ओस्तवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 02:21 IST

धान्य व्यापारीदेखील इतर व्यवसायांप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती देत असतो. मात्र, त्याला कोणत्याही सवलती मिळत नाहीत. तसेच कधी व्यवसायवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते असे होत नाही. इतर उद्योगांप्रमाणे सरकारने सवलतींचे धोरण स्वीकारले पाहिजे.

धान्य व्यापारीदेखील इतर व्यवसायांप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती देत असतो. मात्र, त्याला कोणत्याही सवलती मिळत नाहीत. तसेच कधी व्यवसायवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते असे होत नाही. इतर उद्योगांप्रमाणे सरकारने सवलतींचे धोरण स्वीकारले पाहिजे. वस्तू आणि सेवाकरांतर्गत (जीएसटी) शेतमाल वगळला असला तरी, ब्रँेडेड वस्तूंचा त्यात समावेश आहे. तसेच, ई वे बिलाच्या चुकीच्या तरतुदी बदलण्यात याव्या, अशी अपेक्षा पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी व्यक्त केली.आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून गुरुवारी सादर होत असलेल्या केंद्रीय अंदाजपत्रकाकडे पाहिले जात आहे. व्यापाºयांनी आपल्या भूमिका वेळोवेळी केंद्र सरकारकडे मांडल्या आहेत. वस्तू आणि सेवा करातील तरतुदी (जीएसटी), आंतरराज्य मालवाहतूक करण्यासाठी येत्या १ फेब्रुवारीपासून लागू होत असलेले ई-वे बिल याबाबतही केंद्र सरकारकडे निवेदन देण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात आश्वासक बदल पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.फेब्रुवारीपासून लागू होत असलेल्या ई-वे बिलाशिवाय मालवाहतूक करता येणार नाही. अगदी पन्नास हजार रुपयांपर्यंत जरी मालाची वाहतूक करायची असली तरी असे बिल मालवाहतूक करणाºया व्यक्तीकडे असणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. त्याची मर्यादा ५ लाख रुपये करावी, अशी मागणी पूना मर्चंट चेंबरच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा व्यापाºयांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. सध्या देशांतर्गत व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वेगवेगळ्या राज्यांतून भुसार मालाची आवक होत असते. पुण्यासारखे शहर तर याचे केंद्र बनले आहे.देशामध्ये वस्तूंच्या वाहतुकीसाठी एकच ई-वे बिल असणार असून, त्यामुळे विनाअडथळा मालाची वाहतूक करणे शक्य होईल. परिणामी कोणत्याही राज्यात ट्रान्झिस्ट पासची आवश्यकता भासणार नाही. तसेच, व्यापारी व वाहतूकदारांना कर कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. कोणत्याही राज्यात चेक-पोस्ट नसल्याने वेळेत बचत होऊन वाहतुकीचा वेळ वाचणार असल्याचे जीएसटीच्या अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे.मात्र, या ई-वे बिलाची वैधता प्रत्येक १०० किलोमीटरकरिता एक दिवस याप्रमाणे असणार आहे. पुरवठादार, प्राप्तकर्ता अथवा वाहतूकदार हे एसएमएसद्वारे देखील ई-वे बिल तयार करणे, रद्द करणे तसेच वाहन क्रमांक अद्ययावत करण्याची कामे करू शकतात. त्यासाठी संबंधितांचा मोबाईल क्रमांक बिल प्रणालीवर नोंदणीकृत करणे गरजेचे आहे. तरच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, यातील तरतूद ही व्यापाराच्या दृष्टीने अडचणीची ठरणारी आहे. त्यामुळे त्यात सुटसुटीतपणा आणणे गरजेचे आहे. या तरतुदींचा पुनर्विचार झाला पाहिजे.जीएसटीमध्ये शेतमालाला वगळण्याची सरकारने घोषणा केली आहे. मात्र, त्यातून ब्रँडेड शेतमालाला वगळले आहे. आज बाजारात बहुतांश माल हा ब्रँडेड येतो. वजनाचे प्रमाणीकरण आणि खाद्यान्नाच्या दर्जाची खात्री विविध ब्रँड देत असतात. त्यामुळे पाकिटातील उडीद डाळ, तूरडाळ, मूगडाळ, तांदूळ, हळद, मिरची, धना यांसारख्या सर्वच वस्तूंना त्याचा फटका बसला आहे. या वस्तू जीएसटीतून वगळाव्यात, अशी आग्रही मागणी व्यापाºयांकडून करण्यात येत आहे. यामुळे महागाई वाढली आहे. थेट परकीय गुंतवणुकीवरून (एफडीआय) यापूर्वी भारतीय जनता पक्षानेच विरोधी भूमिका घेतली होती. आज सत्तेत आल्यानंतर त्यांची भूमिका बदलली आहे. किरकोळ व्यापारात परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊ नये. अन्यथा किरकोळ व्यापाºयासमोर संकट निर्माण होईल. उलट सरकारने देशातील हा उद्योग वाढावा यासाठी जाणीवपूर्ण प्रयत्न केले पाहिजे. विविध उद्योग आणि व्यवसायाला सरकार प्रोत्साहनपर सवलती देते. अनेकदा अनुदानही दिले जाते. तसेच प्रोत्साहन या व्यापारालाही मिळावे. या अंदाजपत्रकातून या अपेक्षा कितपत पूर्ण होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBudget 2018अर्थसंकल्प २०१८