शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

गावे घेतली, आता ३० टक्के ‘जीएसटी’पण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 04:32 IST

महापालिकेत समावेश करण्याची मागणी एकूण ३४ गावांनी केली होती. त्यातील फक्त ११ गावांबाबत निर्णय घेऊन राज्य सरकारने अन्य २३ गावांवर अन्याय केला

- लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेत समावेश करण्याची मागणी एकूण ३४ गावांनी केली होती. त्यातील फक्त ११ गावांबाबत निर्णय घेऊन राज्य सरकारने अन्य २३ गावांवर अन्याय केला आहे. आता जी गावे समाविष्ट केली आहेत, त्यांच्यासाठी आता महापालिकेला देत असलेल्या जीएसटी अनुदानात ३० टक्के वाढ करावी, अशी मागणी गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. सदस्यांच्या या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी यावर दिले.गेली काही वर्षे रखडलेल्या ३४ गावांच्या समावेशाबाबत राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले. त्यात त्यांनी दोन गावे पूर्ण, आता अंशत: असलेली ९ गावे संपूर्ण, अशी ११ गावे डिसेंबर २०१७ पर्यंत सामावून घेण्याचे म्हटले असून, उर्वरित २३ गावे पुढील ३ वर्षांत समाविष्ट करण्यात येतील, असे त्यात म्हटले आहे. सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना सदस्यांनी अर्धवट निर्णय अशी टीका यावर केली. बांधकाम व्यावसायिकांच्या लॉबीपुढे दबून सरकारने असा निर्णय घेतला आहे. आता त्या २३ गावांमध्ये जी काही अनधिकृत बांधकामे होतील त्याला सरकारच जबाबदार असेल, पीएमआरडीच्या म्हणजे भाजपाच्या अखत्यारीत ही गावे ठेवण्याचे कारण उघड आहे, असा टोला शिवेसनेचे संजय भोसले यांनी मारला. महापालिकेचे क्षेत्र या निर्णयामुळे वाढले आहे. जीएसटीपोटी महापालिकेला देणार असलेल्या अनुदानात ३० टक्के वाढ करावी, अशी मागणी सुभाष जगताप यांनी केली. २३ गावे वाऱ्यावर सोडण्याचा सरकारचा निर्णय आत्मघातकी आहे, अशी टीका दिलीप बराटे यांनी केली. रस्ते आणि पिण्याच्या पाण्याला या गावांमध्ये काम करताना प्राधान्य द्यावे, असे सुनील टिंगरे म्हणाले. ३३ गावे एकाच वेळी घेतली असती तर सुविधा क्षेत्रांसाठी जागा उपलब्ध झाल्या असत्या; मात्र आता ११ गावांत सुविधा क्षेत्रांच्या जागा शिल्लक राहिल्या नसल्याचे प्रकाश कदम यांनी सांगितले. चेतन तुपे यांनीही जीएसटीच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली. पाणीपुरवठ्यात आता तरी वाढ व्हायला हवी, अशी मागणी संजय भोसले यांनी केली. दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, अमोल बालवडकर, भय्यासाहेब जाधव, योगेश ससाणे, हाजी गफूर पठाण, वसंत मोरे चर्चेत सहभागी झाले. सत्ताधारी भाजपाच्याही काही सदस्यांनी या निर्णयाबद्दल शंका व्यक्त केली. विरोधक मात्र तुटून पडले होते. अनेकांनी २३ गावांच्या भवितव्याबद्दलच शंका व्यक्त केली. असंख्य अवैध बांधकामांना महापालिकेत आल्यानंतर त्याला आळा बसला असता; मात्र आता ते होणार नाही, उलट तीन वर्षांचा अवधी आहे, तोपर्यंत अवैध बांधकामे करून घ्या, अशी चर्चा सुरू झाल्याचे काही सदस्यांनी सांगितले.सूस-म्हाळुंगे घ्यायला हवेसत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सदस्य अमोल बालवडकर यांनी सरकारने किमान सूस-म्हाळुंगे या गावांबाबत तरी समावेशाचा निर्णय घ्यायला हवा होता, असे मत व्यक्त केले. हिंजवडी येथील आयटी पार्कशी ही गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे त्यांचा चांगला विकास झाला असता. आता पीएमपीआरडीच्या ताब्यात असूनही या दोन तसेच अन्य गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी फुकटचे पाणी वापरले जाते. बाबूराव चांदेरे यांनी या निर्णयाचे खरे श्रेय हवेली तालुका कृती समितीचे आहे असे सांगितले. श्रीरंग चव्हाण व त्यांचे सहकारी न्यायालयात गेले, तिथे लढा दिला, त्यामुळे सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले. तरीही सरकारने चुकीचेच केले आहे, सर्व गावांचा समावेश एकाच वेळी करून तेथील विकासकामांसाठी महापालिकेला नियमित निधी द्यायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.सरकारने गावांचा समावेश करण्याबाबत न्यायालयात फक्त प्रतिज्ञापत्रक दाखल केले आहे. ग्रामपंचायतींचे काय करणार, त्यांचे कर्मचारी महापालिकेत कसे वर्ग होतील, त्याचा दर्जा काय असेल, तिथे महापालिकेच्या म्हणून निवडणुका घेतल्या जातील का, हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. त्याचा काहीच विचार सरकारने केलेला दिसत नाही, अशी टीका करण्यात आली. गावांचा समावेश सरकार करणार आहे तर त्यांनी आता महापालिकेला दिलेला पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढवून द्यावा. तेवढे पाणी लागणारच आहे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केली. राजकीय फायदा समोर ठेवून घेतलेला निर्णय, अशी टीका त्यांनी केली. यातून त्या गावांचे नुकसान होणार आहे. समावेश करायचा तर सर्व ३४ गावांचा करायचा होता, काही गावे ठेवली कशासाठी ते जनतेला कळणारच नाही या भ्रमात कोणी राहू नये, असे ते म्हणाले.