शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

गावे घेतली, आता ३० टक्के ‘जीएसटी’पण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 04:32 IST

महापालिकेत समावेश करण्याची मागणी एकूण ३४ गावांनी केली होती. त्यातील फक्त ११ गावांबाबत निर्णय घेऊन राज्य सरकारने अन्य २३ गावांवर अन्याय केला

- लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेत समावेश करण्याची मागणी एकूण ३४ गावांनी केली होती. त्यातील फक्त ११ गावांबाबत निर्णय घेऊन राज्य सरकारने अन्य २३ गावांवर अन्याय केला आहे. आता जी गावे समाविष्ट केली आहेत, त्यांच्यासाठी आता महापालिकेला देत असलेल्या जीएसटी अनुदानात ३० टक्के वाढ करावी, अशी मागणी गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. सदस्यांच्या या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी यावर दिले.गेली काही वर्षे रखडलेल्या ३४ गावांच्या समावेशाबाबत राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले. त्यात त्यांनी दोन गावे पूर्ण, आता अंशत: असलेली ९ गावे संपूर्ण, अशी ११ गावे डिसेंबर २०१७ पर्यंत सामावून घेण्याचे म्हटले असून, उर्वरित २३ गावे पुढील ३ वर्षांत समाविष्ट करण्यात येतील, असे त्यात म्हटले आहे. सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना सदस्यांनी अर्धवट निर्णय अशी टीका यावर केली. बांधकाम व्यावसायिकांच्या लॉबीपुढे दबून सरकारने असा निर्णय घेतला आहे. आता त्या २३ गावांमध्ये जी काही अनधिकृत बांधकामे होतील त्याला सरकारच जबाबदार असेल, पीएमआरडीच्या म्हणजे भाजपाच्या अखत्यारीत ही गावे ठेवण्याचे कारण उघड आहे, असा टोला शिवेसनेचे संजय भोसले यांनी मारला. महापालिकेचे क्षेत्र या निर्णयामुळे वाढले आहे. जीएसटीपोटी महापालिकेला देणार असलेल्या अनुदानात ३० टक्के वाढ करावी, अशी मागणी सुभाष जगताप यांनी केली. २३ गावे वाऱ्यावर सोडण्याचा सरकारचा निर्णय आत्मघातकी आहे, अशी टीका दिलीप बराटे यांनी केली. रस्ते आणि पिण्याच्या पाण्याला या गावांमध्ये काम करताना प्राधान्य द्यावे, असे सुनील टिंगरे म्हणाले. ३३ गावे एकाच वेळी घेतली असती तर सुविधा क्षेत्रांसाठी जागा उपलब्ध झाल्या असत्या; मात्र आता ११ गावांत सुविधा क्षेत्रांच्या जागा शिल्लक राहिल्या नसल्याचे प्रकाश कदम यांनी सांगितले. चेतन तुपे यांनीही जीएसटीच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली. पाणीपुरवठ्यात आता तरी वाढ व्हायला हवी, अशी मागणी संजय भोसले यांनी केली. दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, अमोल बालवडकर, भय्यासाहेब जाधव, योगेश ससाणे, हाजी गफूर पठाण, वसंत मोरे चर्चेत सहभागी झाले. सत्ताधारी भाजपाच्याही काही सदस्यांनी या निर्णयाबद्दल शंका व्यक्त केली. विरोधक मात्र तुटून पडले होते. अनेकांनी २३ गावांच्या भवितव्याबद्दलच शंका व्यक्त केली. असंख्य अवैध बांधकामांना महापालिकेत आल्यानंतर त्याला आळा बसला असता; मात्र आता ते होणार नाही, उलट तीन वर्षांचा अवधी आहे, तोपर्यंत अवैध बांधकामे करून घ्या, अशी चर्चा सुरू झाल्याचे काही सदस्यांनी सांगितले.सूस-म्हाळुंगे घ्यायला हवेसत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सदस्य अमोल बालवडकर यांनी सरकारने किमान सूस-म्हाळुंगे या गावांबाबत तरी समावेशाचा निर्णय घ्यायला हवा होता, असे मत व्यक्त केले. हिंजवडी येथील आयटी पार्कशी ही गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे त्यांचा चांगला विकास झाला असता. आता पीएमपीआरडीच्या ताब्यात असूनही या दोन तसेच अन्य गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी फुकटचे पाणी वापरले जाते. बाबूराव चांदेरे यांनी या निर्णयाचे खरे श्रेय हवेली तालुका कृती समितीचे आहे असे सांगितले. श्रीरंग चव्हाण व त्यांचे सहकारी न्यायालयात गेले, तिथे लढा दिला, त्यामुळे सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले. तरीही सरकारने चुकीचेच केले आहे, सर्व गावांचा समावेश एकाच वेळी करून तेथील विकासकामांसाठी महापालिकेला नियमित निधी द्यायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.सरकारने गावांचा समावेश करण्याबाबत न्यायालयात फक्त प्रतिज्ञापत्रक दाखल केले आहे. ग्रामपंचायतींचे काय करणार, त्यांचे कर्मचारी महापालिकेत कसे वर्ग होतील, त्याचा दर्जा काय असेल, तिथे महापालिकेच्या म्हणून निवडणुका घेतल्या जातील का, हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. त्याचा काहीच विचार सरकारने केलेला दिसत नाही, अशी टीका करण्यात आली. गावांचा समावेश सरकार करणार आहे तर त्यांनी आता महापालिकेला दिलेला पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढवून द्यावा. तेवढे पाणी लागणारच आहे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केली. राजकीय फायदा समोर ठेवून घेतलेला निर्णय, अशी टीका त्यांनी केली. यातून त्या गावांचे नुकसान होणार आहे. समावेश करायचा तर सर्व ३४ गावांचा करायचा होता, काही गावे ठेवली कशासाठी ते जनतेला कळणारच नाही या भ्रमात कोणी राहू नये, असे ते म्हणाले.