शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा

By admin | Updated: February 21, 2015 02:00 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरली जात असली तरी फारसी, उर्दू भाषांच्या प्रभावामुळे राजमान्यता मात्र नव्हती.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरली जात असली तरी फारसी, उर्दू भाषांच्या प्रभावामुळे राजमान्यता मात्र नव्हती. मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सगळे व्यवहार शिवाजी महाराज मराठीतून करीत असत. मातृभाषेचे महत्त्व ओळखणारे शिवाजी महाराज हिंदुस्थानातील पहिले राजे होते, असे मत ज्येष्ठ लेखक हरी नरके यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी सरहद संस्थेचे संचालक संजय नहार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, परिषदेचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, प्रकाश पायगुडे, सुनील महाजन आदी या वेळी उपस्थित होते.नरके म्हणाले, की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा. येत्या आठवडाभरात ही घोषणा झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र शासनाने ठरविलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. त्यामुळे भाषेला विशेष दर्जा देण्यासंदर्भातील निर्णय येत्या आठवडाभरात होईल. भालचंद्र नेमाडे यांनी राग सोडावा, राग वैयक्तिक स्वरूपाचे असतात, त्याचा सामाजिक परिणाम होऊ नये. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्याची आमची इच्छा आहे, असे माधवी वैद्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मातृभाषेला कमी लेखू नये४मराठी भाषेचं वय हे दोन ते अडीच हजार वर्षांचं आहे. मराठी भाषेच महत्त्व खूप मोठं आहे. आपल्या मातृभाषेला कमी लेखता कामा नये. मराठी संस्कृतमधून जन्माला आलेली नसून, ती संस्कृतच्या आधी जन्माला आलेली आहे. मराठी भाषा संस्कृतची मुलगी नाही, तर मराठी संस्कृतची मावशी आहे, असे मत हरी नरके यांनी व्यक्त केले.