शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा

By admin | Updated: February 21, 2015 02:00 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरली जात असली तरी फारसी, उर्दू भाषांच्या प्रभावामुळे राजमान्यता मात्र नव्हती.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरली जात असली तरी फारसी, उर्दू भाषांच्या प्रभावामुळे राजमान्यता मात्र नव्हती. मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सगळे व्यवहार शिवाजी महाराज मराठीतून करीत असत. मातृभाषेचे महत्त्व ओळखणारे शिवाजी महाराज हिंदुस्थानातील पहिले राजे होते, असे मत ज्येष्ठ लेखक हरी नरके यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी सरहद संस्थेचे संचालक संजय नहार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, परिषदेचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, प्रकाश पायगुडे, सुनील महाजन आदी या वेळी उपस्थित होते.नरके म्हणाले, की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा. येत्या आठवडाभरात ही घोषणा झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र शासनाने ठरविलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. त्यामुळे भाषेला विशेष दर्जा देण्यासंदर्भातील निर्णय येत्या आठवडाभरात होईल. भालचंद्र नेमाडे यांनी राग सोडावा, राग वैयक्तिक स्वरूपाचे असतात, त्याचा सामाजिक परिणाम होऊ नये. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्याची आमची इच्छा आहे, असे माधवी वैद्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मातृभाषेला कमी लेखू नये४मराठी भाषेचं वय हे दोन ते अडीच हजार वर्षांचं आहे. मराठी भाषेच महत्त्व खूप मोठं आहे. आपल्या मातृभाषेला कमी लेखता कामा नये. मराठी संस्कृतमधून जन्माला आलेली नसून, ती संस्कृतच्या आधी जन्माला आलेली आहे. मराठी भाषा संस्कृतची मुलगी नाही, तर मराठी संस्कृतची मावशी आहे, असे मत हरी नरके यांनी व्यक्त केले.