शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

‘परस्त्री मातेसमान’ ही शिकवण मुलांना द्या

By admin | Updated: January 14, 2017 03:31 IST

जिजाऊंनी फक्त शिवरायांना नव्हे, तर सर्व मावळ्यांनादेखील संस्काराने वाढविले होते. स्त्री आदर शिकवला होता. सध्या समाजात

पुणे : जिजाऊंनी फक्त शिवरायांना नव्हे, तर सर्व मावळ्यांनादेखील संस्काराने वाढविले होते. स्त्री आदर शिकवला होता. सध्या समाजात स्त्री अत्याचार वाढताना दिसत आहेत. प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर वाईट प्रसंग उद््भवत आहे. आज मुलांना ‘परस्त्री मातेसमान’ ही शिकवण देण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला ही शिकवण दिली तर आजची परिस्थिती नक्की बदलेल, असे मत साहित्यिक कौमुदी गोडबोले यांनी व्यक्त केले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, समस्त हिंदू आघाडी, लालमहाल उत्सव समिती, स्वरूपवर्धिनी व जिजामाता तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौष पौर्णिमा, स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाबाई यांच्या जयंती उत्सवाचे लालमहालात आयोजन करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद एकबोटे, प्रा. संगीता मावळे, स्वरूपवर्धिनीच्या पुष्पा लडे, शुभांगी आफळे, शाहीर हेमंतराजे मावळे, प्रीती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ५ आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. यांमध्ये शहीद जवान सौरभ फराटे यांच्या माता मंगला फराटे यांच्यासह तुळसा कबाडी, भारती गिते, शांताबाई पवार, लीलाबाई पवळे यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफल व भेटवस्तू, असे सन्मानाचे स्वरूप होते.गोडबोले म्हणाल्या, ‘‘मुलांना लहान वयातच स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे, तर चांगली व सुसंस्कृत पिढी घडेल. चांगली पिढी घडली, तर समाजातील वातावरण चांगले असेल. तरच, या वातावरणात आपल्या माता-भगिनी सुरक्षित राहतील. जिजाऊंनी शिवरायांना धाडसी व धोरणी बनविले. त्याप्रमाणे आपण मुलांना शिकवण देण्याची गरज आहे. आजच्या पिढीमध्ये सहनशक्तीची कमतरता दिसते; त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. मुलांना या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जायला शिकवा, असेही त्यांनी सांगितले.या वेळी जिजामाता यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या मुलांना वाढवणाऱ्या ५ आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. या वेळी पोवाडे सादर करण्यात आले. चारुलता काळे यांनी सूत्रसंचालन केले. सारिका वारुळे यांनी आभार मानले.