शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

‘परस्त्री मातेसमान’ ही शिकवण मुलांना द्या

By admin | Updated: January 14, 2017 03:31 IST

जिजाऊंनी फक्त शिवरायांना नव्हे, तर सर्व मावळ्यांनादेखील संस्काराने वाढविले होते. स्त्री आदर शिकवला होता. सध्या समाजात

पुणे : जिजाऊंनी फक्त शिवरायांना नव्हे, तर सर्व मावळ्यांनादेखील संस्काराने वाढविले होते. स्त्री आदर शिकवला होता. सध्या समाजात स्त्री अत्याचार वाढताना दिसत आहेत. प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर वाईट प्रसंग उद््भवत आहे. आज मुलांना ‘परस्त्री मातेसमान’ ही शिकवण देण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला ही शिकवण दिली तर आजची परिस्थिती नक्की बदलेल, असे मत साहित्यिक कौमुदी गोडबोले यांनी व्यक्त केले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, समस्त हिंदू आघाडी, लालमहाल उत्सव समिती, स्वरूपवर्धिनी व जिजामाता तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौष पौर्णिमा, स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाबाई यांच्या जयंती उत्सवाचे लालमहालात आयोजन करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद एकबोटे, प्रा. संगीता मावळे, स्वरूपवर्धिनीच्या पुष्पा लडे, शुभांगी आफळे, शाहीर हेमंतराजे मावळे, प्रीती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ५ आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. यांमध्ये शहीद जवान सौरभ फराटे यांच्या माता मंगला फराटे यांच्यासह तुळसा कबाडी, भारती गिते, शांताबाई पवार, लीलाबाई पवळे यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफल व भेटवस्तू, असे सन्मानाचे स्वरूप होते.गोडबोले म्हणाल्या, ‘‘मुलांना लहान वयातच स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे, तर चांगली व सुसंस्कृत पिढी घडेल. चांगली पिढी घडली, तर समाजातील वातावरण चांगले असेल. तरच, या वातावरणात आपल्या माता-भगिनी सुरक्षित राहतील. जिजाऊंनी शिवरायांना धाडसी व धोरणी बनविले. त्याप्रमाणे आपण मुलांना शिकवण देण्याची गरज आहे. आजच्या पिढीमध्ये सहनशक्तीची कमतरता दिसते; त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. मुलांना या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जायला शिकवा, असेही त्यांनी सांगितले.या वेळी जिजामाता यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या मुलांना वाढवणाऱ्या ५ आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. या वेळी पोवाडे सादर करण्यात आले. चारुलता काळे यांनी सूत्रसंचालन केले. सारिका वारुळे यांनी आभार मानले.