शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मुलींची जेवणासाठी ‘भागम भाग’, खानावळ केली बंद, ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:16 IST

सर्वत्र दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींना मात्र मागील तीन दिवस जेवणासाठी ‘भागम भाग’ करावी लागल्याचे समोर आले आहे.

पुणे : सर्वत्र दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींना मात्र मागील तीन दिवस जेवणासाठी ‘भागम भाग’ करावी लागल्याचे समोर आले आहे. दिवाळीसाठी वसतिगृहातील बहुतेक मुली गावी गेल्याने कंत्राटदाराने रविवारपासूनच खानावळ बंद केली. मात्र, वसतिगृहात राहिलेल्या मुलींच्या जेवणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दोन दिवस काही मुलींना नाष्टा तसेच रात्रीचे जेवणही मिळाले नाही.विद्यापीठाला मंगळवारपासून दिवाळीची सुटी सुरू झाली आहे. मात्र, वसतिगृहात राहणाºया अनेक विद्यार्थी शनिवार व रविवारीच गावी गेले. मुलींच्या वसतिगृहात १३७० पैकी अनेक मुली शनिवारीच गावी गेल्या. प्रत्येक दिवाळीला हीच स्थिती असते. त्यामुळे खानावळीच्या कंत्राटदाराने मुलींची कमी संख्या असल्याचे कारण देत खानावळ दि. १५ ते २२ आॅक्टोबर या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसे पत्रही विद्यापीठ प्रशासनाला दिले. तसेच वसतिगृहामध्येही तशी नोटीस लावण्यात आली. प्रशासनानेही काहीही माहिती न घेता संबंधित कंत्राटदाराला खानावळ बंद ठेवण्याची मुभा दिली. त्यानुसार रविवारपासूनच खानावळ बंद करण्यात आली.दरम्यान, शनिवारपर्यंत वसतिगृहात सुमारे १२०० मुली गावी गेल्या. साधारणपणे १५० मुली वसतिगृहातच राहिल्या होत्या. या मुलींची नाष्टा व जेवणाची पर्यायी व्यवस्था मात्र विद्यापीठाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे बहुतेक मुलींना रविवारपासून स्वत:च जेवणाची व्यवस्था करावी लागली. विद्यापीठातील भोजनालय सुरू असल्याने काही मुलींना त्याचा आधार घ्यावा लागला. मात्र, सकाळचा नाष्ट्यासाठी वसतिगृहातून भोजनालयात जाणे अनेक मुलींनी टाळले, तर रात्रीच्या वेळी अंधारात जाणेही बहुतेक मुलींना शक्य झाले नाही. परिणामी बहुतेक मुलींनी दुपारीच रात्रीच्या जेवणाचे पार्सल नेले. त्यामुळे त्यांना रात्री थंड जेवणच घ्यावे लागले.रविवारपासून सुरू असलेली मुलींची ही कसरत मंगळवारी विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यानुसार मग मंगळवारी रात्रीपासून संबंधित मुलींच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रशासन पुढे सरसावले.मुलींबाबत दुजाभाव का?विद्यापीठात मुलींप्रमाणेच अनेक मुलेही दिवाळीनिमित्त गावी गेली आहेत. असे असताना केवळ मुलींचीच खानावळ बंद ठेवण्यात आली आहे. मुलांची खानावळ मात्र सुरूच आहे. तसेच मुलींची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. असा दुजाभाव केल्याबद्दल मुलींनी नाराजी व्यक्त केली.वसतिगृहामध्ये रविवारपर्यंत सुमारे १५० मुली राहिल्या होत्या. मंगळवारपर्यंत ही संख्या ४० मुलींपर्यंत खाली आली. मुलींची संख्या कमी होत असल्याने कंत्राटदाराने खानावळ बंद ठेवली, पण हे चुकीचे होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याला मुलींच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले. पण कर्मचारी नसल्याने त्याने असमर्थता दर्शविली. त्यामुळे वसतिगृहापासून भोजनालयापर्यंत मुलींची ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळीच ही व्यवस्था करण्यात आली आहे. खानावळ शनिवारी सुरू होणार असल्याने मुलींसाठी तोपर्यंत ही व्यवस्था असेल. सध्या २५ ते ३० मुलींनी त्यासाठी मागणी केली आहे.- टी. डी. निकम, मुख्य वसतिगृहप्रमुख

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थी