शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
5
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
6
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
7
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
8
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
9
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
10
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
11
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
12
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
13
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
14
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
15
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
16
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
17
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
18
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
19
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
20
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप

मुलींची जेवणासाठी ‘भागम भाग’, खानावळ केली बंद, ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:16 IST

सर्वत्र दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींना मात्र मागील तीन दिवस जेवणासाठी ‘भागम भाग’ करावी लागल्याचे समोर आले आहे.

पुणे : सर्वत्र दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींना मात्र मागील तीन दिवस जेवणासाठी ‘भागम भाग’ करावी लागल्याचे समोर आले आहे. दिवाळीसाठी वसतिगृहातील बहुतेक मुली गावी गेल्याने कंत्राटदाराने रविवारपासूनच खानावळ बंद केली. मात्र, वसतिगृहात राहिलेल्या मुलींच्या जेवणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दोन दिवस काही मुलींना नाष्टा तसेच रात्रीचे जेवणही मिळाले नाही.विद्यापीठाला मंगळवारपासून दिवाळीची सुटी सुरू झाली आहे. मात्र, वसतिगृहात राहणाºया अनेक विद्यार्थी शनिवार व रविवारीच गावी गेले. मुलींच्या वसतिगृहात १३७० पैकी अनेक मुली शनिवारीच गावी गेल्या. प्रत्येक दिवाळीला हीच स्थिती असते. त्यामुळे खानावळीच्या कंत्राटदाराने मुलींची कमी संख्या असल्याचे कारण देत खानावळ दि. १५ ते २२ आॅक्टोबर या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसे पत्रही विद्यापीठ प्रशासनाला दिले. तसेच वसतिगृहामध्येही तशी नोटीस लावण्यात आली. प्रशासनानेही काहीही माहिती न घेता संबंधित कंत्राटदाराला खानावळ बंद ठेवण्याची मुभा दिली. त्यानुसार रविवारपासूनच खानावळ बंद करण्यात आली.दरम्यान, शनिवारपर्यंत वसतिगृहात सुमारे १२०० मुली गावी गेल्या. साधारणपणे १५० मुली वसतिगृहातच राहिल्या होत्या. या मुलींची नाष्टा व जेवणाची पर्यायी व्यवस्था मात्र विद्यापीठाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे बहुतेक मुलींना रविवारपासून स्वत:च जेवणाची व्यवस्था करावी लागली. विद्यापीठातील भोजनालय सुरू असल्याने काही मुलींना त्याचा आधार घ्यावा लागला. मात्र, सकाळचा नाष्ट्यासाठी वसतिगृहातून भोजनालयात जाणे अनेक मुलींनी टाळले, तर रात्रीच्या वेळी अंधारात जाणेही बहुतेक मुलींना शक्य झाले नाही. परिणामी बहुतेक मुलींनी दुपारीच रात्रीच्या जेवणाचे पार्सल नेले. त्यामुळे त्यांना रात्री थंड जेवणच घ्यावे लागले.रविवारपासून सुरू असलेली मुलींची ही कसरत मंगळवारी विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यानुसार मग मंगळवारी रात्रीपासून संबंधित मुलींच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रशासन पुढे सरसावले.मुलींबाबत दुजाभाव का?विद्यापीठात मुलींप्रमाणेच अनेक मुलेही दिवाळीनिमित्त गावी गेली आहेत. असे असताना केवळ मुलींचीच खानावळ बंद ठेवण्यात आली आहे. मुलांची खानावळ मात्र सुरूच आहे. तसेच मुलींची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. असा दुजाभाव केल्याबद्दल मुलींनी नाराजी व्यक्त केली.वसतिगृहामध्ये रविवारपर्यंत सुमारे १५० मुली राहिल्या होत्या. मंगळवारपर्यंत ही संख्या ४० मुलींपर्यंत खाली आली. मुलींची संख्या कमी होत असल्याने कंत्राटदाराने खानावळ बंद ठेवली, पण हे चुकीचे होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याला मुलींच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले. पण कर्मचारी नसल्याने त्याने असमर्थता दर्शविली. त्यामुळे वसतिगृहापासून भोजनालयापर्यंत मुलींची ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळीच ही व्यवस्था करण्यात आली आहे. खानावळ शनिवारी सुरू होणार असल्याने मुलींसाठी तोपर्यंत ही व्यवस्था असेल. सध्या २५ ते ३० मुलींनी त्यासाठी मागणी केली आहे.- टी. डी. निकम, मुख्य वसतिगृहप्रमुख

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थी