शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षणासाठी येणाऱ्या मुली असुरक्षित

By admin | Updated: July 27, 2016 04:31 IST

कोपर्डीच्या दुर्दैवी प्रकारानंतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का, याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. त्यामध्ये अनेक बाबी उघड झाल्या.

बारामती : कोपर्डीच्या दुर्दैवी प्रकारानंतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का, याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. त्यामध्ये अनेक बाबी उघड झाल्या. मुलींची छेड होतेच. त्रासदेखील होतो. त्याचबरोबर काही विद्यार्थिनी मित्रासमवेत शिक्षणाच्या नावाखाली निर्जन स्थळी महाविद्यालयीन वेळेत जातात. त्या गावगुंडांच्या सावज बनतात. त्यावर वेळीच प्रतिबंध घालण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी आलेल्या प्रामाणिक मुली रोडरोमिओंचा त्रास सहन करतात. छेड होत असल्याचे घरी सांगितल्यास शिक्षण बंद होईल, अशी भीतीदेखील त्यांना असते. त्यांना पालकांनी समजून घेतले पाहिजे. तरच मुली आई वडिलांपुढे ‘व्यक्त’ होतील.‘लोकमत’च्या वार्ताहरांनी आज शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. शिक्षणासाठी बाहेरगावाहून बारामती शहरात विद्यार्थिनी येतात. शहरातील एसटी बसस्थानकातून पुन्हा महाविद्यालयापर्यंत ‘मिनी बस’ अथवा सहा सिटर रिक्षाने प्रवास करावा लागतो. एसटी बसस्थानकाच्या परिसरात मुलींचा घोळका ज्या बसमध्ये बसणार आहे, त्याच बसमध्ये बसण्याचा काही तरुणांचा अट्टहास असतो. गर्दीत मुलींशी लगट करण्याचा प्रकार होतो. गाडीत जागाच अपुरी असल्यामुळे मुलींना वेगळ्या प्रकारचा स्पर्श जाणवूनदेखील काही बोलता येत नाही, असे विद्यार्थिनींनी असह्यपणे सांगितले. मुलींसाठी स्वतंत्र बससेवा काही वर्षांपूर्वी बारामती एसटी आगाराने सुरू केली. स्वतंत्र बससेवेच्या काळात हा त्रास कमी झाला होता, असेदेखील त्यांनी सांगितले. - बारामती शहरात ग्रामीण भागासह आसपासच्या तालुक्यातून येणाऱ्या मुलींना नेहमीचा त्रास सहन करावा लागतो, असे चित्र आढळून आले. बारामतीपाठोपाठ मोरगाव, माळेगाव, सोमेश्वरनगर, सुपे या मोठ्या गावांमध्ये पायी अथवा सायकलवर येणाऱ्या मुलींना संरक्षण देण्याची गरज आहे. - माळेगावमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचे प्रमाण मोठे आहे. महाविद्यालयात नसणाऱ्या तरुणांकडून त्यांना त्रास होतो. बुलेट गाड्यांची क्रेझ आली आहे. त्या भरधाव मुलींच्या घोळक्यासमोरून पुढे नेणे, विचित्र हावभाव करणे, डायलॉगबाजी करून मुलींना छेडणे, असे प्रकार घडतात. - खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी आलेल्या मुली हा त्रास निमूटपणे सहन करतात. हा प्रकार घरी पालकांना सांगितल्यास, शिक्षणच बंद होईल, अशी भीती मुलींना असते. त्यामुळे त्यांना समजून घेण्याची जबाबदारी पालकांची आहे. तरच त्या व्यक्त होतील. काही मुलींनी अशा भावना व्यक्त केल्या.