शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

शिक्षणासाठी येणाऱ्या मुली असुरक्षित

By admin | Updated: July 27, 2016 04:31 IST

कोपर्डीच्या दुर्दैवी प्रकारानंतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का, याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. त्यामध्ये अनेक बाबी उघड झाल्या.

बारामती : कोपर्डीच्या दुर्दैवी प्रकारानंतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का, याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. त्यामध्ये अनेक बाबी उघड झाल्या. मुलींची छेड होतेच. त्रासदेखील होतो. त्याचबरोबर काही विद्यार्थिनी मित्रासमवेत शिक्षणाच्या नावाखाली निर्जन स्थळी महाविद्यालयीन वेळेत जातात. त्या गावगुंडांच्या सावज बनतात. त्यावर वेळीच प्रतिबंध घालण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी आलेल्या प्रामाणिक मुली रोडरोमिओंचा त्रास सहन करतात. छेड होत असल्याचे घरी सांगितल्यास शिक्षण बंद होईल, अशी भीतीदेखील त्यांना असते. त्यांना पालकांनी समजून घेतले पाहिजे. तरच मुली आई वडिलांपुढे ‘व्यक्त’ होतील.‘लोकमत’च्या वार्ताहरांनी आज शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. शिक्षणासाठी बाहेरगावाहून बारामती शहरात विद्यार्थिनी येतात. शहरातील एसटी बसस्थानकातून पुन्हा महाविद्यालयापर्यंत ‘मिनी बस’ अथवा सहा सिटर रिक्षाने प्रवास करावा लागतो. एसटी बसस्थानकाच्या परिसरात मुलींचा घोळका ज्या बसमध्ये बसणार आहे, त्याच बसमध्ये बसण्याचा काही तरुणांचा अट्टहास असतो. गर्दीत मुलींशी लगट करण्याचा प्रकार होतो. गाडीत जागाच अपुरी असल्यामुळे मुलींना वेगळ्या प्रकारचा स्पर्श जाणवूनदेखील काही बोलता येत नाही, असे विद्यार्थिनींनी असह्यपणे सांगितले. मुलींसाठी स्वतंत्र बससेवा काही वर्षांपूर्वी बारामती एसटी आगाराने सुरू केली. स्वतंत्र बससेवेच्या काळात हा त्रास कमी झाला होता, असेदेखील त्यांनी सांगितले. - बारामती शहरात ग्रामीण भागासह आसपासच्या तालुक्यातून येणाऱ्या मुलींना नेहमीचा त्रास सहन करावा लागतो, असे चित्र आढळून आले. बारामतीपाठोपाठ मोरगाव, माळेगाव, सोमेश्वरनगर, सुपे या मोठ्या गावांमध्ये पायी अथवा सायकलवर येणाऱ्या मुलींना संरक्षण देण्याची गरज आहे. - माळेगावमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचे प्रमाण मोठे आहे. महाविद्यालयात नसणाऱ्या तरुणांकडून त्यांना त्रास होतो. बुलेट गाड्यांची क्रेझ आली आहे. त्या भरधाव मुलींच्या घोळक्यासमोरून पुढे नेणे, विचित्र हावभाव करणे, डायलॉगबाजी करून मुलींना छेडणे, असे प्रकार घडतात. - खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी आलेल्या मुली हा त्रास निमूटपणे सहन करतात. हा प्रकार घरी पालकांना सांगितल्यास, शिक्षणच बंद होईल, अशी भीती मुलींना असते. त्यामुळे त्यांना समजून घेण्याची जबाबदारी पालकांची आहे. तरच त्या व्यक्त होतील. काही मुलींनी अशा भावना व्यक्त केल्या.