शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी येणाऱ्या मुली असुरक्षित

By admin | Updated: July 27, 2016 04:31 IST

कोपर्डीच्या दुर्दैवी प्रकारानंतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का, याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. त्यामध्ये अनेक बाबी उघड झाल्या.

बारामती : कोपर्डीच्या दुर्दैवी प्रकारानंतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का, याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. त्यामध्ये अनेक बाबी उघड झाल्या. मुलींची छेड होतेच. त्रासदेखील होतो. त्याचबरोबर काही विद्यार्थिनी मित्रासमवेत शिक्षणाच्या नावाखाली निर्जन स्थळी महाविद्यालयीन वेळेत जातात. त्या गावगुंडांच्या सावज बनतात. त्यावर वेळीच प्रतिबंध घालण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी आलेल्या प्रामाणिक मुली रोडरोमिओंचा त्रास सहन करतात. छेड होत असल्याचे घरी सांगितल्यास शिक्षण बंद होईल, अशी भीतीदेखील त्यांना असते. त्यांना पालकांनी समजून घेतले पाहिजे. तरच मुली आई वडिलांपुढे ‘व्यक्त’ होतील.‘लोकमत’च्या वार्ताहरांनी आज शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. शिक्षणासाठी बाहेरगावाहून बारामती शहरात विद्यार्थिनी येतात. शहरातील एसटी बसस्थानकातून पुन्हा महाविद्यालयापर्यंत ‘मिनी बस’ अथवा सहा सिटर रिक्षाने प्रवास करावा लागतो. एसटी बसस्थानकाच्या परिसरात मुलींचा घोळका ज्या बसमध्ये बसणार आहे, त्याच बसमध्ये बसण्याचा काही तरुणांचा अट्टहास असतो. गर्दीत मुलींशी लगट करण्याचा प्रकार होतो. गाडीत जागाच अपुरी असल्यामुळे मुलींना वेगळ्या प्रकारचा स्पर्श जाणवूनदेखील काही बोलता येत नाही, असे विद्यार्थिनींनी असह्यपणे सांगितले. मुलींसाठी स्वतंत्र बससेवा काही वर्षांपूर्वी बारामती एसटी आगाराने सुरू केली. स्वतंत्र बससेवेच्या काळात हा त्रास कमी झाला होता, असेदेखील त्यांनी सांगितले. - बारामती शहरात ग्रामीण भागासह आसपासच्या तालुक्यातून येणाऱ्या मुलींना नेहमीचा त्रास सहन करावा लागतो, असे चित्र आढळून आले. बारामतीपाठोपाठ मोरगाव, माळेगाव, सोमेश्वरनगर, सुपे या मोठ्या गावांमध्ये पायी अथवा सायकलवर येणाऱ्या मुलींना संरक्षण देण्याची गरज आहे. - माळेगावमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचे प्रमाण मोठे आहे. महाविद्यालयात नसणाऱ्या तरुणांकडून त्यांना त्रास होतो. बुलेट गाड्यांची क्रेझ आली आहे. त्या भरधाव मुलींच्या घोळक्यासमोरून पुढे नेणे, विचित्र हावभाव करणे, डायलॉगबाजी करून मुलींना छेडणे, असे प्रकार घडतात. - खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी आलेल्या मुली हा त्रास निमूटपणे सहन करतात. हा प्रकार घरी पालकांना सांगितल्यास, शिक्षणच बंद होईल, अशी भीती मुलींना असते. त्यामुळे त्यांना समजून घेण्याची जबाबदारी पालकांची आहे. तरच त्या व्यक्त होतील. काही मुलींनी अशा भावना व्यक्त केल्या.