शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

जिरायती पट्ट्यात चौैथ्या वर्षी खरीप जाणार वाया

By admin | Updated: July 7, 2015 02:44 IST

बारामती तालुक्यातील जिरायती भागातील खरीपाच्या आशा धूसर झाल्या आहेत. विशेषत : जिरायती भागाचा मुख्य आधार असलेला खरीप हंगाम सलग चौथ्या वर्षी वाया जात आहे.

लोणी भापकर : बारामती तालुक्यातील जिरायती भागातील खरीपाच्या आशा धूसर झाल्या आहेत. विशेषत : जिरायती भागाचा मुख्य आधार असलेला खरीप हंगाम सलग चौथ्या वर्षी वाया जात आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, दुध उत्पादकांपुढे मोठेच संकट ठाकल्याचे चित्र आहे. तर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतिक्षा करावी लागत आहे. े.यामुळे या भागातील नवीन पिढी शहराकडे स्थलांतरित होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. मोरगाव, सुपे या जिरायती पट्ट्यात खरीप हंगामातील बाजरी ,मूग ,मटकी, हुलगा, सूर्यफूल, हळवी कांदा ही पीके घेतली जातात. पुरेशा पाऊस असेल तर ही पीके केवळ पावसावरही पदरात पडतात. यासाठी मे महीन्यातील मान्सूनपूर्व रोहीणी नक्षत्रातील अवकाळी पावसाची गरज असते. त्यानंतर जून महीन्यातील मृग नक्षत्रातील ओलीवर पेरण्या मार्गी लागतात. मात्र यंदा सलग चौथ्या वर्षी मे जून मधील पावसाने हुलकावणी दिली. कमी दाबाच्या प्रभावामुळे झालेल्या थोडयाशा पावसाच्या ओलीवर या भागात बाजरी, मूग, कांदा या पीकांच्या पेरण्या उरकल्या आहेत. मात्र नंतर पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने उगवलेली पीके सुकून जात आहे.यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दिवसभर कडक ऊन व वाहणारे कोरडे वारे यामुळे सध्यातरी पावसाची शक्यता नसल्याने उगवलेली पिके आणखी किती दिवस तग धरणार अशा विवंचनेत शेतकरी वर्ग आकाशाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र जिरायती भागात दिसत आहे. या भागातील मजूरवर्ग बागायती भागाकडे स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहे. ऐन पावसाळ्यात परीसरातील ओढे, नाले, पाझर तलाव कोरडेच आहेत. (वार्ताहर)