शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

दिग्गजांच्या गायकीचा सांगीतिक वेध

By admin | Updated: March 21, 2015 00:20 IST

पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी ही तीन अमूल्य रत्ने. संगीतविश्वात निर्माण केलेल्या गायनशैलीतून स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्यात ‘ते’ यशस्वी ठरले.

पुणे : भारतीय अभिजात संगीत दरबारातील स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी ही तीन अमूल्य रत्ने. संगीतविश्वात निर्माण केलेल्या गायनशैलीतून स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्यात ‘ते’ यशस्वी ठरले. याच दिग्गजांच्या सांगीतिक कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या ‘त्रिवेणी संगम’ या नाट्य आणि भक्ती संगीताच्या मैफिलीने रसिकांची शुक्रवारची सायंकाळ अविस्मरणीय ठरली. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आपला परिसर यांच्या वतीने आयोजित अकराव्या पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवामध्ये हिंदुस्थानी सांगीतिक परंपरेतील या दिग्गज कलाकारांच्या प्रतिभावंत गायकीचा नजराणा त्यांचेच शिष्य आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि पं. शौनक अभिषेकी यांनी त्यांच्याच गानशैलीतून रसिकांसमोर पेश केला. ‘तम भवललाट’ या गणेशवंदनेने त्यांनी गायकीस प्रारंभ केला. ‘हिंडोल गावत सब, ओढत कल्याण थाट’ ही १८ रागांची मालिका एकसूरात सादर करीत त्रिवेणी संगमाची खऱ्या अर्थाने अनुभूती दिली. त्यानंतर तिघाही प्रतिभावंत गायकांनी आपल्या संगीत संस्काराच्या गानशैलीचे दर्शन एकलरीतीने रसिकांना घडविले. भाटे यांनी मारवा रागातील ‘गुरू बिन ज्ञान ना पाऊँ मैं’ ही बंदिश अभिजाततेतून खुलविली. शौनक अभिषेकी यांनी वडील जितेंद्रबुवांनी अजरामर केलेले ‘लागी करेजवा कट्यार’ सादर करून रसिकांची दाद मिळविली. धनश्री लेले यांनी ओघवत्या शैलीतील निवेदन केले.(प्रतिनिधी)पुढचा महोत्सव १२ दिवसांचा४या महोत्सवाचे पुढचे बारावे वर्ष आहे. त्यामुळे पुढील वर्षाचा महोत्सव दहा नव्हे, तर तब्बल बारा दिवसांचा होईल, अशी घोषणा उज्ज्वल केसकर यांनी केली.