शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

दिग्गजांच्या गायकीचा सांगीतिक वेध

By admin | Updated: March 21, 2015 00:20 IST

पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी ही तीन अमूल्य रत्ने. संगीतविश्वात निर्माण केलेल्या गायनशैलीतून स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्यात ‘ते’ यशस्वी ठरले.

पुणे : भारतीय अभिजात संगीत दरबारातील स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी ही तीन अमूल्य रत्ने. संगीतविश्वात निर्माण केलेल्या गायनशैलीतून स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्यात ‘ते’ यशस्वी ठरले. याच दिग्गजांच्या सांगीतिक कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या ‘त्रिवेणी संगम’ या नाट्य आणि भक्ती संगीताच्या मैफिलीने रसिकांची शुक्रवारची सायंकाळ अविस्मरणीय ठरली. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आपला परिसर यांच्या वतीने आयोजित अकराव्या पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवामध्ये हिंदुस्थानी सांगीतिक परंपरेतील या दिग्गज कलाकारांच्या प्रतिभावंत गायकीचा नजराणा त्यांचेच शिष्य आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि पं. शौनक अभिषेकी यांनी त्यांच्याच गानशैलीतून रसिकांसमोर पेश केला. ‘तम भवललाट’ या गणेशवंदनेने त्यांनी गायकीस प्रारंभ केला. ‘हिंडोल गावत सब, ओढत कल्याण थाट’ ही १८ रागांची मालिका एकसूरात सादर करीत त्रिवेणी संगमाची खऱ्या अर्थाने अनुभूती दिली. त्यानंतर तिघाही प्रतिभावंत गायकांनी आपल्या संगीत संस्काराच्या गानशैलीचे दर्शन एकलरीतीने रसिकांना घडविले. भाटे यांनी मारवा रागातील ‘गुरू बिन ज्ञान ना पाऊँ मैं’ ही बंदिश अभिजाततेतून खुलविली. शौनक अभिषेकी यांनी वडील जितेंद्रबुवांनी अजरामर केलेले ‘लागी करेजवा कट्यार’ सादर करून रसिकांची दाद मिळविली. धनश्री लेले यांनी ओघवत्या शैलीतील निवेदन केले.(प्रतिनिधी)पुढचा महोत्सव १२ दिवसांचा४या महोत्सवाचे पुढचे बारावे वर्ष आहे. त्यामुळे पुढील वर्षाचा महोत्सव दहा नव्हे, तर तब्बल बारा दिवसांचा होईल, अशी घोषणा उज्ज्वल केसकर यांनी केली.