शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी

By admin | Updated: January 28, 2017 00:05 IST

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा,

मंचर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रांदरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पुणे जिल्ह्यातही दिवाळीनंतर मे महिन्यापर्यंतच्या काळात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. गावोगावी होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती पाहताना अथवा त्यात सहभाग घेताना शेतकरी आपली सारी दु:खे विसरून आनंद घेत असतो. काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने बैल या प्राण्याचा अधिसूचित प्राण्यांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींवर बंदी लादली गेली आहे. या बंदीविरोधात शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली असून, सर्वोच्च न्यायालयातही शेतकऱ्यांच्या वतीने बैलगाडा मालकांच्या संघटना व मी स्वत: लढा देत आहे.बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी केवळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असून, त्यासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढून बैल हा प्राणी पर्यावरण विभागाच्या अधिसूचित यादीतून वगळण्याची गरज आहे. आपण तमिळनाडूच्या धर्तीवर आचारसहिंता संपल्यानंतर वटहुकूम काढण्याचे जाहीर केले असले, तरी त्या वटहुकमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, हे आज तमिळनाडूच्या वटहुकमाला देण्यात आलेल्या न्यायालयातील आव्हान याचिकेमुळे स्पष्ट झाले आहे.