शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गावकारभा-यांचे आज मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:21 IST

पुणे : जिल्ह्यातील दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उद्या मंगळवारी मतदान होत असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान यंत्र केंद्रावर पोहोचवण्यात आले आहेत.

पुणे : जिल्ह्यातील दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उद्या मंगळवारी मतदान होत असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान यंत्र केंद्रावर पोहोचवण्यात आले आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी अनेक ठिकाणी पोलिसांनी संचलन केले. यावर्षी सरपंचांच्या निवडी थेट होणार असल्याने या निवडणुका चुरशीच्या ठरणार आहेत. आतापर्यंत ९९ ग्रामपंचायतींपैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर तेरा सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता ८९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत.जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींसाठी उद्या मंगळवारी ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाºया आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर मतदान यंत्रे पोहोचवण्यात आले आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. मोठे गुन्हे असणाºयांना याआधीच पोलिसांनी तडीपार केले आहे.सरपंचनिवडीची प्रक्रिया थेट ग्रामस्थांमधून होणार असल्याने अनेकांचा कस लागणार आहे. निवडणुकीत मोठ्या ग्रामपंचायतीत मातब्बरांचा कस लागणार आहे.> पुणे जिल्ह्यातील ९९ ग्रामपंचायतीपैकी ८९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. दोन ग्रामपंचायती आणि तेरा सरपंचांची आधीच बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित ८९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.>आंबेगाव १०१ ०९जुन्नर २३९ १७खेड ३५ ०१शिरूर २६ ०१मावळ ८९ ०७मुळशी ८३ १२हवेली १८० ०९वेल्हे १२ ०३भोर २७ ०८दौंड २३ ०१बारामती २८६ १५पुरंदर ३२ ०२