शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कचरा कोंडी फुटणार ?

By admin | Updated: February 21, 2015 22:41 IST

गेल्या दिड महिन्यापासून शहरात निर्माण होणारा कचरा महापालिका शहरातच जिरवित आहे. मात्र, सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे जागाच नसल्याचे शहरात या कच-याचे ढीग साचलेले आहेत.

पुणे : गेल्या दिड महिन्यापासून शहरात निर्माण होणारा कचरा महापालिका शहरातच जिरवित आहे. मात्र, सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे जागाच नसल्याचे शहरात या कच-याचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे आरोग्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने एक पाऊल मागे घेत हा सुका कचरा डेपोवर टाकण्यासाठी महापालिकेस परवानगी देण्यास ग्रामस्थांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यानुसार, उद्या ( रविवारी) सकाळी महापौरांसह महापालिकेचे अधिकारी आणि ग्रामस्थ कचराडेपोची पाहणी करणार असून त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शनिवारी दिली. सुका कचरा टाकण्यासाठी शहरात जागाच नसल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील कचरा उलचने महापालिका प्रशासनाने बंद केले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी आज आढावा बैठक घेतली.या बैठकीस फुरसुंगी गावच्या ग्रामस्थांसह महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर तसेच पालिका प्रशासनाकडून गेल्या दिड महिन्यात करण्यात आलेल्या उपाय-योजनांची तसेच शासनाकडे प्रलंबित प्रश्नांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. तसेच महापालिकेने अनेक मागण्यापूर्ण केल्या असून उर्वरीत मागण्या राज्यशासनाच्या अख्त्यारीतील आहेत. तसेच शहरातील कच-याची स्थिती दिवसें दिवस गंभीर होत असल्याने ग्रामस्थांनी पालिकेस सहकार्य करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या नंतर , शहराची कचरा समस्या पाहता महापालिकेस कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी अनुकुलता दर्शविली आहे. त्या नुसार, उद्या सकाळी महापौरांसह पालिका अधिकारी कचरा कँपींग करण्यासाठी जागेची पाहणी ़डेपोवर जाऊन करणार असून त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून कचरा टाकण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.वाढताहेत कच-याचे ढीग महापालिकेने कचरा उचलने बंद केल्याने शहरात कच-याचे ढीग वाढतच असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरातही प्रशासनाने सुमारे ६00 ते ७00 टन कचरा उचलला नसल्याने शहरात पडून असलेला कचरा चार ते पाच हजार टनांपर्यंत पोहचला आहे. त्यातच उद्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास नकार दिल्यास येत्या काही दिवसात संपूर्ण शहर कच-याखाली जाण्याची भिती महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.