शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कचरा कोंडी फुटणार ?

By admin | Updated: February 21, 2015 22:41 IST

गेल्या दिड महिन्यापासून शहरात निर्माण होणारा कचरा महापालिका शहरातच जिरवित आहे. मात्र, सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे जागाच नसल्याचे शहरात या कच-याचे ढीग साचलेले आहेत.

पुणे : गेल्या दिड महिन्यापासून शहरात निर्माण होणारा कचरा महापालिका शहरातच जिरवित आहे. मात्र, सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे जागाच नसल्याचे शहरात या कच-याचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे आरोग्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने एक पाऊल मागे घेत हा सुका कचरा डेपोवर टाकण्यासाठी महापालिकेस परवानगी देण्यास ग्रामस्थांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यानुसार, उद्या ( रविवारी) सकाळी महापौरांसह महापालिकेचे अधिकारी आणि ग्रामस्थ कचराडेपोची पाहणी करणार असून त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शनिवारी दिली. सुका कचरा टाकण्यासाठी शहरात जागाच नसल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील कचरा उलचने महापालिका प्रशासनाने बंद केले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी आज आढावा बैठक घेतली.या बैठकीस फुरसुंगी गावच्या ग्रामस्थांसह महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर तसेच पालिका प्रशासनाकडून गेल्या दिड महिन्यात करण्यात आलेल्या उपाय-योजनांची तसेच शासनाकडे प्रलंबित प्रश्नांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. तसेच महापालिकेने अनेक मागण्यापूर्ण केल्या असून उर्वरीत मागण्या राज्यशासनाच्या अख्त्यारीतील आहेत. तसेच शहरातील कच-याची स्थिती दिवसें दिवस गंभीर होत असल्याने ग्रामस्थांनी पालिकेस सहकार्य करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या नंतर , शहराची कचरा समस्या पाहता महापालिकेस कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी अनुकुलता दर्शविली आहे. त्या नुसार, उद्या सकाळी महापौरांसह पालिका अधिकारी कचरा कँपींग करण्यासाठी जागेची पाहणी ़डेपोवर जाऊन करणार असून त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून कचरा टाकण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.वाढताहेत कच-याचे ढीग महापालिकेने कचरा उचलने बंद केल्याने शहरात कच-याचे ढीग वाढतच असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरातही प्रशासनाने सुमारे ६00 ते ७00 टन कचरा उचलला नसल्याने शहरात पडून असलेला कचरा चार ते पाच हजार टनांपर्यंत पोहचला आहे. त्यातच उद्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास नकार दिल्यास येत्या काही दिवसात संपूर्ण शहर कच-याखाली जाण्याची भिती महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.