शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वारूळवाडीत गणपीर बाबा ग्रामविकास पॅनेलचे सलग तिस-यांदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:11 IST

दरम्यान, या निवडणुकीत पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ यांचे पुतणे सतेज भुजबळ, सरपंच ज्योत्सना फुलसुंदर, कृषी ...

दरम्यान, या निवडणुकीत पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ यांचे पुतणे सतेज भुजबळ, सरपंच ज्योत्सना फुलसुंदर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विपुल फुलसुंदर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे यांची स्नुषा प्रमिला पाटे या मातब्बर उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत ३ माजी सरपंच व २ विद्यमान सदस्य यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे.

संजय वारूळे, जालिंदर कोल्हे आणि जंगल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तिस-यांदा गणपीर बाबा ग्रामविकास पॅनेलद्वारे १६ उमेदवार या निवडणूक रिंगणात होते. तर प्रतिस्पर्धी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, माजी सरपंच आत्माराम संते, देवेंद्र बनकर, आशिष फुलसुंदर यांच्या नेतृत्वाखाली भागेष्वर ग्रामविकास पॅनल द्वारे १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सरळ व अटीतटीच्या लढतीत गणपीर बाबा पॅनेल चे एक जागा बिनविरोध होऊन उर्वरित १६ जागांपैकी नऊ जागांवर विजय मिळवित संजय वारूळे, जालिंदर कोल्हे यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. या निवडणुकीत वाॅर्ड क्र. ६ मधून जंगल कोल्हे यांनी ७७४ मते मिळवित सर्वाधिक ३४४ मताधिक्यांनी विजय मिळविला. तर त्या खालोखाल याच वार्ड मधील स्नेहल कांकरीया यांनी ६९२ मते मिळवित २२० माधिक्यांनी विजय मिळविला. तसेच वाॅर्ड क्र.१ मधून राजश्री काळे या १२ मताधिक्यांनी विजयी झाल्या. तर प्रमिला पाटे यांना अवघ्या ९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

गणपीरबाबा पॅनेलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- वार्ड क्र.१ राजेंद्र मेहेर (४५१ मते), माया डांेगरे (३९१ मते), राजश्री काळे (३७९ मते), वाॅर्ड क्र.३ प्रकाश भालेकर (बिनविरोध), शुभांगी कानडे (३२२ मते), वाॅर्ड क्र.४ ज्योती संते (५८७ मते), किरण आल्हाट (५१५ मते), वाॅर्ड क्र.६ जंगल कोल्हे (७५४ मते), स्नेहल कांकरीया (६९२ मते), संगीता काळे (६५६ मते)

भागेश्वर ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- वाॅर्ड क्र.२ देवेंद्र बनकर (४७८ मते), शाम दुधाणे (४८३ मते), वैशाली मेहेर (५०७ मते), वाॅर्ड क्र.४ आत्माराम संते (५०७ मते), वार्ड क्र.५ विनायक भुजबळ (५४० मते), रेखा फुलसुंदर (५३४ मते), सोनल अडसरे (५४६ मते)

पाच वर्षात केलेली विकासकामे व पारदर्शक कारभार यामुळे मतदारांनी गणपीर बाबा पॅनलच्या उमेदवारांना मोठया मताधिक्यांनी विजयी केले आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ करून गावच्या विकासासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवून सर्व सदस्यांना विश्वासात घेवून विकासकामांना प्राधान्य दिले जाईल असा विश्वास गणपीर बाबा पॅनल प्रमुख संजय वारूळे यांनी व्यक्त केला.

फोटो - वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय वारूळे, जालिंदर कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गणपीर बाबा ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी १० जागा जिंकून सलग तिस-यांदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविल्यानंतर जलोश साजरा केला .