शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
5
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
6
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
7
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
8
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
9
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
10
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
11
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
12
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
13
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
14
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
15
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
16
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
17
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
18
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
19
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
20
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

जिवाशी खेळ सुरूच!

By admin | Updated: December 18, 2015 02:31 IST

बुधवारी कोथरूडमध्ये गादी कारखान्याला लागलेली आग चार कामगारांच्या जिवावर उठली. बेकायदा बांधकामांना मिळणारे अभय, पालिका आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे

पुणे : बुधवारी कोथरूडमध्ये गादी कारखान्याला लागलेली आग चार कामगारांच्या जिवावर उठली. बेकायदा बांधकामांना मिळणारे अभय, पालिका आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आगीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. खरोखरीच मानवी जीवनाबाबत एवढी अनास्था का आहे? शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये झपाट्याने उभ्या राहत असलेल्या उंचच उंच इमारतींच्या फायर आॅडिटकडे होणारे दुर्लक्ष, अतिक्रमणांकडे होणारी डोळेझाक आणि अग्निप्रतिरोधक यंत्रणेच्या बाबतीतही उदासीनता यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. प्रसंगी जिवावर उदार होऊन नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तांचे रक्षण करणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांच्याही जिवाशी एकप्रकारचा खेळच सुरू आहे. हलक्या दर्जाचे गणवेश आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय.कोथरूडमध्ये ज्या ठिकाणी आग लागली होती ते पत्र्याचे शेडच अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. चारही बाजूंनी बंदिस्त असलेले हे शेड पुन्हा पुन्हा कसे उभे राहते, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. शेडमधील गॅस सिलिंडरमुळे ही आग आणखीनच भडकली. वास्तविक अशाप्रकारची अतिक्रमणे रस्त्यांवर राजरोस पाहायला मिळत आहेत. चायनीज स्टॉल आणि बेकायदा उपाहारगृह तर रस्तोरस्ती झालेले आहेत. यासर्व ठिकाणांवर बेकायदा सिलिंडर वापरले जातात. त्याकडे मात्र दुर्लक्ष होते. गेल्याच महिन्यात गुलटेकडी येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये एका दाम्पत्याच्या भांडणामधून आग लागली होती. घरगुती वादामधून गॅस सुरू ठेवल्यामुळे भडकलेल्या आगीत तब्बल ६६ झोपड्या जळून खाक झाल्या, तर ४० वर घरांना झळ बसली. अनेक कष्टकरी कुटुंब एकाच दिवसात रस्त्यावर आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत ही आग विझवली. त्यांना स्थानिकांनीही मोठी मदत केली. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही अथवा जीवितहानी झाली नाही. अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन जळीतग्रस्तांना मदत केली. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या शेकडो झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात. तारांचे जाळे, छोट्या अरुंद बोळा, वेडीवाकडी वायरिंग यामुळे आगीचा धोका कायमच असतो. त्यावर उपाययोजनेची आवश्यकता आहे. रिफ्युज एरियाकडे होणारी डोळेझाक, खासगी एजन्सीमार्फत चालणारे फॉर्म बी भरून घेण्याचे, तसेच अग्निप्रतिरोधक यंत्रणा तपासण्याचे काम यामुळे अडचणी वाढत आहेत. आगीच्या घटनांकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिकांच्या जीविताशी संबंधित या विषयाकडे आजही तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नाही.प्रतीक्षाचप्रशासनाच्या उदासीनतेमुळे यापुढे गंभीर परिस्थिती उद्भवल्यास खूप मोठी हानी होण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाचे जवान सक्षम असले, तरीदेखील कोट्यवधींचे साहित्य धूळ खात पडून आहे. त्यामुळे कामात मर्यादा येत आहेत. मुख्य अग्निशामक अधिकाऱ्याला फायर अ‍ॅक्टनुसार फायर फायटिंग सिस्टिम न बसविणाऱ्या इमारतींना व आस्थापनांना ‘सील’ ठोकण्याचे अधिकार आहेत; परंतु अशी कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही.