शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

‘ग्रेट गेम’मुळे अफगाणी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:13 IST

तरुणांना धार्मिक दहशतवादापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला. ...

तरुणांना धार्मिक दहशतवादापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये ऊर्जा व इतर क्षेत्रात गुंतवणूक मोठी गुंतवणूक केली. भारत अफगाणिस्तानातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांना पुरोगामी वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच भारतातून शिक्षण घेऊन गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीचे काम केले आहे. मात्र, या पुढील काळात या विद्यार्थ्यांना भारतात येऊन शिक्षण घेणे शक्य झाले नाही, तर अफगाणिस्तान आणखी काही वर्षे मागे जाईल.

तालिबानने १९९६ मध्ये अफगाणिस्तानचा घेतलेला ताबा आणि सध्या २०२१ मध्ये घेतलेला ताबा यात बराच फरक आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी १९९६ मध्ये तालिबानने मानवी हक्कांची पायमल्ली केली होती. महिलांचे स्वातंत्र, हक्क नाकारले होते. महिलांवर अत्याचार केले होते. सध्या तूर्त तरी असे काही घडताना दिसत नाही. कारण, तालिबानच्या सत्तासंघर्षाला चीन, पाकिस्तान, रशियाने पाठिंबा दिला आहे. अमेरिकेला शह देण्यासाठी या तीनही राष्ट्रांनी हे घडवून आणले आहे.

केवळ साठ हजार तालिबान्यांसमोर दोन ते अडीच लाख अफगाण सैनिक नतमस्तक झाले. त्यामागे एक ‘ग्रेट गेम’ आहे. ज्या पध्दतीने सध्या सर्व काही घडत आहे, तसेच या पुढेही घडत राहिले तर तालिबानच्या नावाने चीन, पाकिस्तान रशियाचे ‘पपेट’ सरकार येथे चालेल. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना व इतर देशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शिक्षण घेऊन अफगाणिस्तानमध्ये गेलेले विद्यार्थी त्या देशाची एक मोठी संपत्ती आहेत. त्यांनी तेथील मंत्रालयात, उद्योग आणि खासगी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका तेथील विद्यार्थ्यांना निश्चितच बसणार आहे. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट कनेक्टिव्हिटी या समस्या सुरू झाल्या आहेत. मुलींवरचे निर्बंध केवळ बुरखा घालण्यापुरते नाहीत. त्यांनी काय शिकावे, सार्वजनिक ठिकाणी कसे वावरावे? आदीबाबत कोणते धोरण स्वीकारले जाते, या संदर्भात अद्याप स्पष्टता नाही. तालिबानने अफगाणिस्तानात १९९६ सारखेच धोरण राबवले, तर येथील नवीन पिढीचे भवितव्य अंधकारमय होईल. अमेरिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही अफगाणिस्तानचा फारसा विकास झाला नाही. कारण, तेथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर आहे. अफगाणिस्तानात विविध वंशाचे लोक राहतात. त्यांच्यात सांघिक भावना किंवा राष्ट्रीयत्वाची भावना फारशी दिसत नाही. अफगाणिस्तान महाराष्ट्राच्या केवळ दीडपट मोठा असून त्याची भौगोलिकस्थिती डोंगराळ व टेकड्यांची आहे. या भौगोलिक स्थितीचा अफगाणी नागरिकांनी नेहमीच फायदा करून घेतला. त्यामुळेच अमेरिका आणि सोव्हियत युनियनसारख्या बलाढ्य राष्ट्रांना अफगाणिस्तानने रोखले होते. मात्र, तालिबान्यांनी दुसऱ्यांदा अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता तालिबानी सहजासहजी ताबा सोडणार नाहीत.