शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रेट गेम’मुळे अफगाणी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:13 IST

तरुणांना धार्मिक दहशतवादापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला. ...

तरुणांना धार्मिक दहशतवादापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये ऊर्जा व इतर क्षेत्रात गुंतवणूक मोठी गुंतवणूक केली. भारत अफगाणिस्तानातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांना पुरोगामी वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच भारतातून शिक्षण घेऊन गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीचे काम केले आहे. मात्र, या पुढील काळात या विद्यार्थ्यांना भारतात येऊन शिक्षण घेणे शक्य झाले नाही, तर अफगाणिस्तान आणखी काही वर्षे मागे जाईल.

तालिबानने १९९६ मध्ये अफगाणिस्तानचा घेतलेला ताबा आणि सध्या २०२१ मध्ये घेतलेला ताबा यात बराच फरक आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी १९९६ मध्ये तालिबानने मानवी हक्कांची पायमल्ली केली होती. महिलांचे स्वातंत्र, हक्क नाकारले होते. महिलांवर अत्याचार केले होते. सध्या तूर्त तरी असे काही घडताना दिसत नाही. कारण, तालिबानच्या सत्तासंघर्षाला चीन, पाकिस्तान, रशियाने पाठिंबा दिला आहे. अमेरिकेला शह देण्यासाठी या तीनही राष्ट्रांनी हे घडवून आणले आहे.

केवळ साठ हजार तालिबान्यांसमोर दोन ते अडीच लाख अफगाण सैनिक नतमस्तक झाले. त्यामागे एक ‘ग्रेट गेम’ आहे. ज्या पध्दतीने सध्या सर्व काही घडत आहे, तसेच या पुढेही घडत राहिले तर तालिबानच्या नावाने चीन, पाकिस्तान रशियाचे ‘पपेट’ सरकार येथे चालेल. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना व इतर देशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शिक्षण घेऊन अफगाणिस्तानमध्ये गेलेले विद्यार्थी त्या देशाची एक मोठी संपत्ती आहेत. त्यांनी तेथील मंत्रालयात, उद्योग आणि खासगी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका तेथील विद्यार्थ्यांना निश्चितच बसणार आहे. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट कनेक्टिव्हिटी या समस्या सुरू झाल्या आहेत. मुलींवरचे निर्बंध केवळ बुरखा घालण्यापुरते नाहीत. त्यांनी काय शिकावे, सार्वजनिक ठिकाणी कसे वावरावे? आदीबाबत कोणते धोरण स्वीकारले जाते, या संदर्भात अद्याप स्पष्टता नाही. तालिबानने अफगाणिस्तानात १९९६ सारखेच धोरण राबवले, तर येथील नवीन पिढीचे भवितव्य अंधकारमय होईल. अमेरिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही अफगाणिस्तानचा फारसा विकास झाला नाही. कारण, तेथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर आहे. अफगाणिस्तानात विविध वंशाचे लोक राहतात. त्यांच्यात सांघिक भावना किंवा राष्ट्रीयत्वाची भावना फारशी दिसत नाही. अफगाणिस्तान महाराष्ट्राच्या केवळ दीडपट मोठा असून त्याची भौगोलिकस्थिती डोंगराळ व टेकड्यांची आहे. या भौगोलिक स्थितीचा अफगाणी नागरिकांनी नेहमीच फायदा करून घेतला. त्यामुळेच अमेरिका आणि सोव्हियत युनियनसारख्या बलाढ्य राष्ट्रांना अफगाणिस्तानने रोखले होते. मात्र, तालिबान्यांनी दुसऱ्यांदा अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता तालिबानी सहजासहजी ताबा सोडणार नाहीत.