शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रेट गेम’मुळे अफगाणी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:13 IST

तरुणांना धार्मिक दहशतवादापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला. ...

तरुणांना धार्मिक दहशतवादापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये ऊर्जा व इतर क्षेत्रात गुंतवणूक मोठी गुंतवणूक केली. भारत अफगाणिस्तानातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांना पुरोगामी वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच भारतातून शिक्षण घेऊन गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीचे काम केले आहे. मात्र, या पुढील काळात या विद्यार्थ्यांना भारतात येऊन शिक्षण घेणे शक्य झाले नाही, तर अफगाणिस्तान आणखी काही वर्षे मागे जाईल.

तालिबानने १९९६ मध्ये अफगाणिस्तानचा घेतलेला ताबा आणि सध्या २०२१ मध्ये घेतलेला ताबा यात बराच फरक आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी १९९६ मध्ये तालिबानने मानवी हक्कांची पायमल्ली केली होती. महिलांचे स्वातंत्र, हक्क नाकारले होते. महिलांवर अत्याचार केले होते. सध्या तूर्त तरी असे काही घडताना दिसत नाही. कारण, तालिबानच्या सत्तासंघर्षाला चीन, पाकिस्तान, रशियाने पाठिंबा दिला आहे. अमेरिकेला शह देण्यासाठी या तीनही राष्ट्रांनी हे घडवून आणले आहे.

केवळ साठ हजार तालिबान्यांसमोर दोन ते अडीच लाख अफगाण सैनिक नतमस्तक झाले. त्यामागे एक ‘ग्रेट गेम’ आहे. ज्या पध्दतीने सध्या सर्व काही घडत आहे, तसेच या पुढेही घडत राहिले तर तालिबानच्या नावाने चीन, पाकिस्तान रशियाचे ‘पपेट’ सरकार येथे चालेल. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना व इतर देशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शिक्षण घेऊन अफगाणिस्तानमध्ये गेलेले विद्यार्थी त्या देशाची एक मोठी संपत्ती आहेत. त्यांनी तेथील मंत्रालयात, उद्योग आणि खासगी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका तेथील विद्यार्थ्यांना निश्चितच बसणार आहे. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट कनेक्टिव्हिटी या समस्या सुरू झाल्या आहेत. मुलींवरचे निर्बंध केवळ बुरखा घालण्यापुरते नाहीत. त्यांनी काय शिकावे, सार्वजनिक ठिकाणी कसे वावरावे? आदीबाबत कोणते धोरण स्वीकारले जाते, या संदर्भात अद्याप स्पष्टता नाही. तालिबानने अफगाणिस्तानात १९९६ सारखेच धोरण राबवले, तर येथील नवीन पिढीचे भवितव्य अंधकारमय होईल. अमेरिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही अफगाणिस्तानचा फारसा विकास झाला नाही. कारण, तेथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर आहे. अफगाणिस्तानात विविध वंशाचे लोक राहतात. त्यांच्यात सांघिक भावना किंवा राष्ट्रीयत्वाची भावना फारशी दिसत नाही. अफगाणिस्तान महाराष्ट्राच्या केवळ दीडपट मोठा असून त्याची भौगोलिकस्थिती डोंगराळ व टेकड्यांची आहे. या भौगोलिक स्थितीचा अफगाणी नागरिकांनी नेहमीच फायदा करून घेतला. त्यामुळेच अमेरिका आणि सोव्हियत युनियनसारख्या बलाढ्य राष्ट्रांना अफगाणिस्तानने रोखले होते. मात्र, तालिबान्यांनी दुसऱ्यांदा अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता तालिबानी सहजासहजी ताबा सोडणार नाहीत.