शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

धोकादायक गावांच्या पूनर्वसनासाठी घरकुल योजनेतून निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर : राज्यात अतिवृष्टीमुळे सुरु असलेल्या भुस्स्खलनाच्या घटना पाहता, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : राज्यात अतिवृष्टीमुळे सुरु असलेल्या भुस्स्खलनाच्या घटना पाहता, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाच धोकादायक गावांचे कायम स्वरुपी पुर्नवसन करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जांभोरी, काळवाडी व माळीण पसारवाडी या गावांना भेट दिली व ग्रामस्थांशी चर्चा केली. घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी दिड लाख रूपये मिळणार असून ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माळीण दुर्घटनेनंतर जिल्हातील इतरञ ठिकाणी अशी घटना घडु नये म्हणुन काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे यांनी जिल्ह्यातील धोकाग्रस्त गावांचा सर्वेक्षण केले होते. यामध्ये ६० गावे धोकादायक तर १० गावे अति धोकादायक असल्याचे सांगितले होते. यामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये असणारे काळवाडी नंबर एक व नंबर दोन (जांभोरी) हे गावे धोकादायक असल्याचे आढळले. काळवाडी नंबर एक व नंबर दोन त्याचप्रमाणे शेळके वस्ती असे मिळून सत्तर ते ऐंशी घरे असणारे हे गाव आहे. बुधवार (दि २१) पासून आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याच गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन उबड निघाले आहे. या डोंगरावर असणारे सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून घरांच्या भिंतींना ओल येवुन मागील पाच सहा दिवसांत घरे कोसळायचे प्रकारही घडले आहेत. पालक मंत्री व जिल्हाधिकारी याच्या आदेशाने दुर्घटना होणार नाही, याची प्रशासन काळजी घेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जांभोरी काळवाडी व माळीण पसारवाडी या गावांना भेट दिली. ग्रामस्थांशी चर्चा केली.

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पाच धोकदायक गांवाची पाहाणी केली. ह्यात ५ पैकी ३ ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे थेट खरेदी प्रस्ताव पंचायत समिती कडून महसुल विभागाकडे गेले आहेत. मंत्री मोहदयांच्या सुचने नुसार महसुल विभाग कार्यवाही करत आहे. यात लाभार्थी म्हणुन घरकुल योजनेतुन दिड लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाने पावसाचा अंदाज घेऊन स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवावे कोणताही धोक पत्करु नये धोकादायक गावातील स्थानिक नागरिकांंनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी आदिवासी नेते मारुती केंगले, जांभोरीचे सरपंच संजय केंगले, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी, वसंत पारधी, सुरेश भोकटे, विठ्ठल लोहकरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते.

चौकट

स्थानिक प्रशासनाने हवामानाचा व पावसाचा अभ्यास करुन विचार करुन कोणताही धोका न घेता लोकांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवावे असे नियोजन करत आहोत. नागरिकांंनी आपल्या कुंटुबाला व जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सहकार्य करण्याचे सांगितले आहे. तर धोकादायक गांवान मधील लोकांना प्राधान्य देत शासनाच्या शबरी व प्रधानमंत्री घरकुल योजनेतुन लाभ देत असताना घरबांधणी साहित्यासाठी १ लाख २० हजार तर १८ हजार मजुरीसाठी, १२ हजार स्वच्छतागृहासाठी लाभ देत आहोत. ही एक अर्थसाह्य योजना आहे. या योजने अंतर्गत १ लाख ५० हजार रुपये लाभ देता येतो. यात जादा पैसेसाठी लाभार्थी यांनी करावे अथवा इतर योजना विशेष बाब म्हणुन आपत्ती व्यवस्थापन मदत घ्यावी.

-आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी

फोटो खालचा मजकुर:-आंबेगाव तालुक्याच्या पश्चीम आदिवासी भागातील पाच अति धोकादायक गावांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देवुन ग्रामस्थांशी चर्चा केली.

छायाचिञ संतोष जाधव

तळेघर वार्ताहार संतोष जाधव