शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक गावांच्या पूनर्वसनासाठी घरकुल योजनेतून निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर : राज्यात अतिवृष्टीमुळे सुरु असलेल्या भुस्स्खलनाच्या घटना पाहता, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : राज्यात अतिवृष्टीमुळे सुरु असलेल्या भुस्स्खलनाच्या घटना पाहता, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाच धोकादायक गावांचे कायम स्वरुपी पुर्नवसन करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जांभोरी, काळवाडी व माळीण पसारवाडी या गावांना भेट दिली व ग्रामस्थांशी चर्चा केली. घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी दिड लाख रूपये मिळणार असून ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माळीण दुर्घटनेनंतर जिल्हातील इतरञ ठिकाणी अशी घटना घडु नये म्हणुन काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे यांनी जिल्ह्यातील धोकाग्रस्त गावांचा सर्वेक्षण केले होते. यामध्ये ६० गावे धोकादायक तर १० गावे अति धोकादायक असल्याचे सांगितले होते. यामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये असणारे काळवाडी नंबर एक व नंबर दोन (जांभोरी) हे गावे धोकादायक असल्याचे आढळले. काळवाडी नंबर एक व नंबर दोन त्याचप्रमाणे शेळके वस्ती असे मिळून सत्तर ते ऐंशी घरे असणारे हे गाव आहे. बुधवार (दि २१) पासून आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याच गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन उबड निघाले आहे. या डोंगरावर असणारे सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून घरांच्या भिंतींना ओल येवुन मागील पाच सहा दिवसांत घरे कोसळायचे प्रकारही घडले आहेत. पालक मंत्री व जिल्हाधिकारी याच्या आदेशाने दुर्घटना होणार नाही, याची प्रशासन काळजी घेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जांभोरी काळवाडी व माळीण पसारवाडी या गावांना भेट दिली. ग्रामस्थांशी चर्चा केली.

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पाच धोकदायक गांवाची पाहाणी केली. ह्यात ५ पैकी ३ ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे थेट खरेदी प्रस्ताव पंचायत समिती कडून महसुल विभागाकडे गेले आहेत. मंत्री मोहदयांच्या सुचने नुसार महसुल विभाग कार्यवाही करत आहे. यात लाभार्थी म्हणुन घरकुल योजनेतुन दिड लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाने पावसाचा अंदाज घेऊन स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवावे कोणताही धोक पत्करु नये धोकादायक गावातील स्थानिक नागरिकांंनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी आदिवासी नेते मारुती केंगले, जांभोरीचे सरपंच संजय केंगले, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी, वसंत पारधी, सुरेश भोकटे, विठ्ठल लोहकरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते.

चौकट

स्थानिक प्रशासनाने हवामानाचा व पावसाचा अभ्यास करुन विचार करुन कोणताही धोका न घेता लोकांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवावे असे नियोजन करत आहोत. नागरिकांंनी आपल्या कुंटुबाला व जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सहकार्य करण्याचे सांगितले आहे. तर धोकादायक गांवान मधील लोकांना प्राधान्य देत शासनाच्या शबरी व प्रधानमंत्री घरकुल योजनेतुन लाभ देत असताना घरबांधणी साहित्यासाठी १ लाख २० हजार तर १८ हजार मजुरीसाठी, १२ हजार स्वच्छतागृहासाठी लाभ देत आहोत. ही एक अर्थसाह्य योजना आहे. या योजने अंतर्गत १ लाख ५० हजार रुपये लाभ देता येतो. यात जादा पैसेसाठी लाभार्थी यांनी करावे अथवा इतर योजना विशेष बाब म्हणुन आपत्ती व्यवस्थापन मदत घ्यावी.

-आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी

फोटो खालचा मजकुर:-आंबेगाव तालुक्याच्या पश्चीम आदिवासी भागातील पाच अति धोकादायक गावांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देवुन ग्रामस्थांशी चर्चा केली.

छायाचिञ संतोष जाधव

तळेघर वार्ताहार संतोष जाधव