शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक गावांच्या पूनर्वसनासाठी घरकुल योजनेतून निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर : राज्यात अतिवृष्टीमुळे सुरु असलेल्या भुस्स्खलनाच्या घटना पाहता, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : राज्यात अतिवृष्टीमुळे सुरु असलेल्या भुस्स्खलनाच्या घटना पाहता, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाच धोकादायक गावांचे कायम स्वरुपी पुर्नवसन करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जांभोरी, काळवाडी व माळीण पसारवाडी या गावांना भेट दिली व ग्रामस्थांशी चर्चा केली. घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी दिड लाख रूपये मिळणार असून ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माळीण दुर्घटनेनंतर जिल्हातील इतरञ ठिकाणी अशी घटना घडु नये म्हणुन काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे यांनी जिल्ह्यातील धोकाग्रस्त गावांचा सर्वेक्षण केले होते. यामध्ये ६० गावे धोकादायक तर १० गावे अति धोकादायक असल्याचे सांगितले होते. यामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये असणारे काळवाडी नंबर एक व नंबर दोन (जांभोरी) हे गावे धोकादायक असल्याचे आढळले. काळवाडी नंबर एक व नंबर दोन त्याचप्रमाणे शेळके वस्ती असे मिळून सत्तर ते ऐंशी घरे असणारे हे गाव आहे. बुधवार (दि २१) पासून आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याच गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन उबड निघाले आहे. या डोंगरावर असणारे सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून घरांच्या भिंतींना ओल येवुन मागील पाच सहा दिवसांत घरे कोसळायचे प्रकारही घडले आहेत. पालक मंत्री व जिल्हाधिकारी याच्या आदेशाने दुर्घटना होणार नाही, याची प्रशासन काळजी घेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जांभोरी काळवाडी व माळीण पसारवाडी या गावांना भेट दिली. ग्रामस्थांशी चर्चा केली.

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पाच धोकदायक गांवाची पाहाणी केली. ह्यात ५ पैकी ३ ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे थेट खरेदी प्रस्ताव पंचायत समिती कडून महसुल विभागाकडे गेले आहेत. मंत्री मोहदयांच्या सुचने नुसार महसुल विभाग कार्यवाही करत आहे. यात लाभार्थी म्हणुन घरकुल योजनेतुन दिड लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाने पावसाचा अंदाज घेऊन स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवावे कोणताही धोक पत्करु नये धोकादायक गावातील स्थानिक नागरिकांंनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी आदिवासी नेते मारुती केंगले, जांभोरीचे सरपंच संजय केंगले, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी, वसंत पारधी, सुरेश भोकटे, विठ्ठल लोहकरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते.

चौकट

स्थानिक प्रशासनाने हवामानाचा व पावसाचा अभ्यास करुन विचार करुन कोणताही धोका न घेता लोकांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवावे असे नियोजन करत आहोत. नागरिकांंनी आपल्या कुंटुबाला व जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सहकार्य करण्याचे सांगितले आहे. तर धोकादायक गांवान मधील लोकांना प्राधान्य देत शासनाच्या शबरी व प्रधानमंत्री घरकुल योजनेतुन लाभ देत असताना घरबांधणी साहित्यासाठी १ लाख २० हजार तर १८ हजार मजुरीसाठी, १२ हजार स्वच्छतागृहासाठी लाभ देत आहोत. ही एक अर्थसाह्य योजना आहे. या योजने अंतर्गत १ लाख ५० हजार रुपये लाभ देता येतो. यात जादा पैसेसाठी लाभार्थी यांनी करावे अथवा इतर योजना विशेष बाब म्हणुन आपत्ती व्यवस्थापन मदत घ्यावी.

-आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी

फोटो खालचा मजकुर:-आंबेगाव तालुक्याच्या पश्चीम आदिवासी भागातील पाच अति धोकादायक गावांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देवुन ग्रामस्थांशी चर्चा केली.

छायाचिञ संतोष जाधव

तळेघर वार्ताहार संतोष जाधव