शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

By admin | Updated: June 4, 2015 22:55 IST

दोन हजार कोटी रूपये ऊस उत्पादकांना तातडीने देऊ असे सांगून सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे.

मंचर : दोन हजार कोटी रूपये ऊस उत्पादकांना तातडीने देऊ असे सांगून सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. सहकार मंत्र्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोल्हापूर येथील चंद्रकांत पाटील यांच्या घरावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा बुधवार दि.१० जून रोजी काढला जाणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी रात्री केली.आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे राज्यव्यापी दुध आणि ऊस परिषद संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन आणि आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील बोलत होते. यावेळी शिवाजीराव नांदखिले, प्रभाकर बांगर, पांडूरंग रायते, वनाजी बांगर, तानाजी बेनके, बाळासाहेब पठारे, कालीदास आपटे, आनंद शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि राज्याच्या विविध भागातून आलेले ऊस उत्पादक आणि दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.ऊसाचा एफ.आर.पी.भाव १४ दिवसांत आणि एकरकमी देणे कारखाने आणि सरकारला बंधनकारक आहे, असे कायदा सांगतो जर सरकारच कायदे पाळत नसेल तर शेतकऱ्यांनी का कायदा पाळावा असा सवाल करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी संपविण्यासाठी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे देशाची वाटचाल अराजकतेच्या दिशेने चालू झाली आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला़ दुधाच्या दराबाबत बोलताना रघुनाथ दादा पाटील म्हणाले, दुध पावडर निर्यातीवर बंदी आणल्यामुळे दुध व्यवसायाला घरघर लागली आहे. या सरकारच्या अगोदर असणाऱ्या सरकारने दुधाच्या पावडरला अनुदान देत होते. परंतु विद्यमान सरकारने दुधाच्या पावडरवरील अनुदान बंद करून दुध उत्पादकाची चेष्टा सुरू केली आहे. यावेळी शिवाजीराव नांदखिले,पांडूरंग रायते,वनाजी बांगर,आनंद शिंदे,लक्ष्मण शिंदे,बाळासाहेब पठारे,कालीदास आपेट यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रभाकर बांगर यांनी केले. (वार्ताहर)सहकार मंत्री चंदक्रांत पाटील यांनी सरकारच्या वतीने २ हजार कोटी रूपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची घोषणा २ महिन्यापूर्वी केली. परंतु अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वांचेच अर्थकारण कोलमडले आहे. जून महिना सुरू झाला आहे. शेतीच्या पेरणी,मशागतीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. आडसाली ऊस लागवड करण्याची वेळ आली आहे. शाळेचे दिवस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. अशा परिस्थितीत शेतकरी असताना सरकारला मात्र शेतकऱ्यांबाबत आस्था नाही़- रघुनाथदादा पाटीलराज्य अध्यक्ष शेतकरी संघटना