शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
5
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
6
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
7
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
8
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
9
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
10
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
11
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
12
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
13
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
14
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
15
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
16
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
17
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
18
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
19
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
20
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...

सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

By admin | Updated: June 4, 2015 22:55 IST

दोन हजार कोटी रूपये ऊस उत्पादकांना तातडीने देऊ असे सांगून सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे.

मंचर : दोन हजार कोटी रूपये ऊस उत्पादकांना तातडीने देऊ असे सांगून सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. सहकार मंत्र्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोल्हापूर येथील चंद्रकांत पाटील यांच्या घरावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा बुधवार दि.१० जून रोजी काढला जाणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी रात्री केली.आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे राज्यव्यापी दुध आणि ऊस परिषद संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन आणि आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील बोलत होते. यावेळी शिवाजीराव नांदखिले, प्रभाकर बांगर, पांडूरंग रायते, वनाजी बांगर, तानाजी बेनके, बाळासाहेब पठारे, कालीदास आपटे, आनंद शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि राज्याच्या विविध भागातून आलेले ऊस उत्पादक आणि दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.ऊसाचा एफ.आर.पी.भाव १४ दिवसांत आणि एकरकमी देणे कारखाने आणि सरकारला बंधनकारक आहे, असे कायदा सांगतो जर सरकारच कायदे पाळत नसेल तर शेतकऱ्यांनी का कायदा पाळावा असा सवाल करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी संपविण्यासाठी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे देशाची वाटचाल अराजकतेच्या दिशेने चालू झाली आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला़ दुधाच्या दराबाबत बोलताना रघुनाथ दादा पाटील म्हणाले, दुध पावडर निर्यातीवर बंदी आणल्यामुळे दुध व्यवसायाला घरघर लागली आहे. या सरकारच्या अगोदर असणाऱ्या सरकारने दुधाच्या पावडरला अनुदान देत होते. परंतु विद्यमान सरकारने दुधाच्या पावडरवरील अनुदान बंद करून दुध उत्पादकाची चेष्टा सुरू केली आहे. यावेळी शिवाजीराव नांदखिले,पांडूरंग रायते,वनाजी बांगर,आनंद शिंदे,लक्ष्मण शिंदे,बाळासाहेब पठारे,कालीदास आपेट यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रभाकर बांगर यांनी केले. (वार्ताहर)सहकार मंत्री चंदक्रांत पाटील यांनी सरकारच्या वतीने २ हजार कोटी रूपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची घोषणा २ महिन्यापूर्वी केली. परंतु अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वांचेच अर्थकारण कोलमडले आहे. जून महिना सुरू झाला आहे. शेतीच्या पेरणी,मशागतीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. आडसाली ऊस लागवड करण्याची वेळ आली आहे. शाळेचे दिवस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. अशा परिस्थितीत शेतकरी असताना सरकारला मात्र शेतकऱ्यांबाबत आस्था नाही़- रघुनाथदादा पाटीलराज्य अध्यक्ष शेतकरी संघटना