शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख किलोमीटरच्या प्रवासाने जुळवले रुळांशी मैत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वेचे रुळ आयुष्यभर समांतर चालतात पण त्यांची गाठ कधी पडत नाही असे म्हणतात. अगीनगाडीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वेचे रुळ आयुष्यभर समांतर चालतात पण त्यांची गाठ कधी पडत नाही असे म्हणतात. अगीनगाडीच्या चालकाला आयुष्यातला सर्वाधिक काळ व्यतित करावा लागतो तो या रुळांवरच. भयाण अंधाऱ्या रात्री, कोसळत्या पावसात, तापत्या उन्हात किंवा कडाक्याच्या थंडीत या चालकाची सोबत करत असतात ते अखंड पसरलेले रुळ. त्यामुळे या रुळांशी मैत्री करण्याखेरीज चालकापुढे पर्याय नसतो. या रुळांवर तोल सांभाळतच त्याला शेकडो जणांना वेगाने आणि तेही सुरक्षितपणे त्यांच्या मुक्कामी पोहोचवयाचे असते. त्यामुळेच या रुळांशी मैत्री करण्याखेरीज या चालकापुढे पर्याय नसतो.

सह्याद्रीतल्या अवघड घाटातल्या चढ-उतारांवरुन रोज रेल्वे घेऊन जाणाऱ्या पुण्यातील अजय हिवाळे हे असेच एक चालक आहेत. मध्य रेल्वेच्या सेवेत असणाऱ्या हिवाळे यांनी गेल्या २५ वर्षात १५ लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर रुळांवरुन कापले आहे. रविवारच्या (१ ऑगस्ट) मैत्रीदिनाच्या निमित्ताने हिवाळे यांनी त्यांचे रुळाशी जुळलेले मैत्र ‘लोकमत’कडे उलगडले.

हिवाळे म्हणाले, “लहानपणापासून रेल्वेबद्दल आकर्षण मनात होते. धूर सोडत जाणाऱ्या रेल्वेबद्दल प्रचंड कुतुहूल होते. सन १९९६ मध्ये रेल्वेत चालक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर रूळांच्या आणखी जवळ आलो. पुणे-कोल्हापूर, पुणे-वसई रोड आणि पुणे-इगतपुरी या मार्गावर आत्तापर्यंत १५ लाख किलोमीटर अंतर रेल्वेने कापले. घाटात रेल्वे चालवणे हे नेहमीच खूप आव्हानात्मक असते. चढउतारांवर, तीव्र वळणांवर विशेष काळजी घ्यावी लागते. घाटातल्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते.”

रुळांवर कधी अचानक पाणी येते, कधी दरड कोसळते यावर लक्ष ठेवावे लागते. उन्हाळ्यात रुळांचे प्रसरण होते. हिवाळ्यात ते आकुंचन पावतात. त्यामुळे या दोन्ही ऋतूंमध्येही लक्ष ठेवावेच लागते. रुळांवर नजर ठेवताना बाजूला असणाऱ्या सिग्नलकडे अधिक लक्ष द्यावे लागते. कधी अचानक गाई, म्हशी, शेळ्या किंवा क्वचित वन्यप्राणी रुळावर येतात. काहीवेळा आत्महत्येच्या विचाराने माणसं रुळांवर येतात. त्यावेळी आपत्कालीन ब्रेक लावावा लागतो. हॉर्न वाजवावा लागतो. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तडजोड न करता हे सगळे करावे लागते, असे हिवाळे सांगतात.

चौकट

अन वाचले शेकडो जणांचे प्राण

“शेलारवाडी-देहूरोड दरम्यान गाडी चालवीत असताना एकदा अप-लाईन वर कोणीतरी रेल्वे रुळांशेजारी असणारा मैलाचा दगड काढून ठेवला होता. त्यावरुन जर रेल्वे धावली असती तर अपघात घडला असता. मी तात्काळ स्टेशन मास्तरांना कळविले. अप लाईनवर येणारी गाडी ताबडतोब थांबविण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.”

-अजय हिवाळे.