शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

१५ लाख किलोमीटरच्या प्रवासाने जुळवले रुळांशी मैत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वेचे रुळ आयुष्यभर समांतर चालतात पण त्यांची गाठ कधी पडत नाही असे म्हणतात. अगीनगाडीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वेचे रुळ आयुष्यभर समांतर चालतात पण त्यांची गाठ कधी पडत नाही असे म्हणतात. अगीनगाडीच्या चालकाला आयुष्यातला सर्वाधिक काळ व्यतित करावा लागतो तो या रुळांवरच. भयाण अंधाऱ्या रात्री, कोसळत्या पावसात, तापत्या उन्हात किंवा कडाक्याच्या थंडीत या चालकाची सोबत करत असतात ते अखंड पसरलेले रुळ. त्यामुळे या रुळांशी मैत्री करण्याखेरीज चालकापुढे पर्याय नसतो. या रुळांवर तोल सांभाळतच त्याला शेकडो जणांना वेगाने आणि तेही सुरक्षितपणे त्यांच्या मुक्कामी पोहोचवयाचे असते. त्यामुळेच या रुळांशी मैत्री करण्याखेरीज या चालकापुढे पर्याय नसतो.

सह्याद्रीतल्या अवघड घाटातल्या चढ-उतारांवरुन रोज रेल्वे घेऊन जाणाऱ्या पुण्यातील अजय हिवाळे हे असेच एक चालक आहेत. मध्य रेल्वेच्या सेवेत असणाऱ्या हिवाळे यांनी गेल्या २५ वर्षात १५ लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर रुळांवरुन कापले आहे. रविवारच्या (१ ऑगस्ट) मैत्रीदिनाच्या निमित्ताने हिवाळे यांनी त्यांचे रुळाशी जुळलेले मैत्र ‘लोकमत’कडे उलगडले.

हिवाळे म्हणाले, “लहानपणापासून रेल्वेबद्दल आकर्षण मनात होते. धूर सोडत जाणाऱ्या रेल्वेबद्दल प्रचंड कुतुहूल होते. सन १९९६ मध्ये रेल्वेत चालक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर रूळांच्या आणखी जवळ आलो. पुणे-कोल्हापूर, पुणे-वसई रोड आणि पुणे-इगतपुरी या मार्गावर आत्तापर्यंत १५ लाख किलोमीटर अंतर रेल्वेने कापले. घाटात रेल्वे चालवणे हे नेहमीच खूप आव्हानात्मक असते. चढउतारांवर, तीव्र वळणांवर विशेष काळजी घ्यावी लागते. घाटातल्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते.”

रुळांवर कधी अचानक पाणी येते, कधी दरड कोसळते यावर लक्ष ठेवावे लागते. उन्हाळ्यात रुळांचे प्रसरण होते. हिवाळ्यात ते आकुंचन पावतात. त्यामुळे या दोन्ही ऋतूंमध्येही लक्ष ठेवावेच लागते. रुळांवर नजर ठेवताना बाजूला असणाऱ्या सिग्नलकडे अधिक लक्ष द्यावे लागते. कधी अचानक गाई, म्हशी, शेळ्या किंवा क्वचित वन्यप्राणी रुळावर येतात. काहीवेळा आत्महत्येच्या विचाराने माणसं रुळांवर येतात. त्यावेळी आपत्कालीन ब्रेक लावावा लागतो. हॉर्न वाजवावा लागतो. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तडजोड न करता हे सगळे करावे लागते, असे हिवाळे सांगतात.

चौकट

अन वाचले शेकडो जणांचे प्राण

“शेलारवाडी-देहूरोड दरम्यान गाडी चालवीत असताना एकदा अप-लाईन वर कोणीतरी रेल्वे रुळांशेजारी असणारा मैलाचा दगड काढून ठेवला होता. त्यावरुन जर रेल्वे धावली असती तर अपघात घडला असता. मी तात्काळ स्टेशन मास्तरांना कळविले. अप लाईनवर येणारी गाडी ताबडतोब थांबविण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.”

-अजय हिवाळे.