शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

१५ लाख किलोमीटरच्या प्रवासाने जुळवले रुळांशी मैत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वेचे रुळ आयुष्यभर समांतर चालतात पण त्यांची गाठ कधी पडत नाही असे म्हणतात. अगीनगाडीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वेचे रुळ आयुष्यभर समांतर चालतात पण त्यांची गाठ कधी पडत नाही असे म्हणतात. अगीनगाडीच्या चालकाला आयुष्यातला सर्वाधिक काळ व्यतित करावा लागतो तो या रुळांवरच. भयाण अंधाऱ्या रात्री, कोसळत्या पावसात, तापत्या उन्हात किंवा कडाक्याच्या थंडीत या चालकाची सोबत करत असतात ते अखंड पसरलेले रुळ. त्यामुळे या रुळांशी मैत्री करण्याखेरीज चालकापुढे पर्याय नसतो. या रुळांवर तोल सांभाळतच त्याला शेकडो जणांना वेगाने आणि तेही सुरक्षितपणे त्यांच्या मुक्कामी पोहोचवयाचे असते. त्यामुळेच या रुळांशी मैत्री करण्याखेरीज या चालकापुढे पर्याय नसतो.

सह्याद्रीतल्या अवघड घाटातल्या चढ-उतारांवरुन रोज रेल्वे घेऊन जाणाऱ्या पुण्यातील अजय हिवाळे हे असेच एक चालक आहेत. मध्य रेल्वेच्या सेवेत असणाऱ्या हिवाळे यांनी गेल्या २५ वर्षात १५ लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर रुळांवरुन कापले आहे. रविवारच्या (१ ऑगस्ट) मैत्रीदिनाच्या निमित्ताने हिवाळे यांनी त्यांचे रुळाशी जुळलेले मैत्र ‘लोकमत’कडे उलगडले.

हिवाळे म्हणाले, “लहानपणापासून रेल्वेबद्दल आकर्षण मनात होते. धूर सोडत जाणाऱ्या रेल्वेबद्दल प्रचंड कुतुहूल होते. सन १९९६ मध्ये रेल्वेत चालक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर रूळांच्या आणखी जवळ आलो. पुणे-कोल्हापूर, पुणे-वसई रोड आणि पुणे-इगतपुरी या मार्गावर आत्तापर्यंत १५ लाख किलोमीटर अंतर रेल्वेने कापले. घाटात रेल्वे चालवणे हे नेहमीच खूप आव्हानात्मक असते. चढउतारांवर, तीव्र वळणांवर विशेष काळजी घ्यावी लागते. घाटातल्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते.”

रुळांवर कधी अचानक पाणी येते, कधी दरड कोसळते यावर लक्ष ठेवावे लागते. उन्हाळ्यात रुळांचे प्रसरण होते. हिवाळ्यात ते आकुंचन पावतात. त्यामुळे या दोन्ही ऋतूंमध्येही लक्ष ठेवावेच लागते. रुळांवर नजर ठेवताना बाजूला असणाऱ्या सिग्नलकडे अधिक लक्ष द्यावे लागते. कधी अचानक गाई, म्हशी, शेळ्या किंवा क्वचित वन्यप्राणी रुळावर येतात. काहीवेळा आत्महत्येच्या विचाराने माणसं रुळांवर येतात. त्यावेळी आपत्कालीन ब्रेक लावावा लागतो. हॉर्न वाजवावा लागतो. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तडजोड न करता हे सगळे करावे लागते, असे हिवाळे सांगतात.

चौकट

अन वाचले शेकडो जणांचे प्राण

“शेलारवाडी-देहूरोड दरम्यान गाडी चालवीत असताना एकदा अप-लाईन वर कोणीतरी रेल्वे रुळांशेजारी असणारा मैलाचा दगड काढून ठेवला होता. त्यावरुन जर रेल्वे धावली असती तर अपघात घडला असता. मी तात्काळ स्टेशन मास्तरांना कळविले. अप लाईनवर येणारी गाडी ताबडतोब थांबविण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.”

-अजय हिवाळे.