शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख किलोमीटरच्या प्रवासाने जुळवले रुळांशी मैत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वेचे रुळ आयुष्यभर समांतर चालतात पण त्यांची गाठ कधी पडत नाही असे म्हणतात. अगीनगाडीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वेचे रुळ आयुष्यभर समांतर चालतात पण त्यांची गाठ कधी पडत नाही असे म्हणतात. अगीनगाडीच्या चालकाला आयुष्यातला सर्वाधिक काळ व्यतित करावा लागतो तो या रुळांवरच. भयाण अंधाऱ्या रात्री, कोसळत्या पावसात, तापत्या उन्हात किंवा कडाक्याच्या थंडीत या चालकाची सोबत करत असतात ते अखंड पसरलेले रुळ. त्यामुळे या रुळांशी मैत्री करण्याखेरीज चालकापुढे पर्याय नसतो. या रुळांवर तोल सांभाळतच त्याला शेकडो जणांना वेगाने आणि तेही सुरक्षितपणे त्यांच्या मुक्कामी पोहोचवयाचे असते. त्यामुळेच या रुळांशी मैत्री करण्याखेरीज या चालकापुढे पर्याय नसतो.

सह्याद्रीतल्या अवघड घाटातल्या चढ-उतारांवरुन रोज रेल्वे घेऊन जाणाऱ्या पुण्यातील अजय हिवाळे हे असेच एक चालक आहेत. मध्य रेल्वेच्या सेवेत असणाऱ्या हिवाळे यांनी गेल्या २५ वर्षात १५ लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर रुळांवरुन कापले आहे. रविवारच्या (१ ऑगस्ट) मैत्रीदिनाच्या निमित्ताने हिवाळे यांनी त्यांचे रुळाशी जुळलेले मैत्र ‘लोकमत’कडे उलगडले.

हिवाळे म्हणाले, “लहानपणापासून रेल्वेबद्दल आकर्षण मनात होते. धूर सोडत जाणाऱ्या रेल्वेबद्दल प्रचंड कुतुहूल होते. सन १९९६ मध्ये रेल्वेत चालक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर रूळांच्या आणखी जवळ आलो. पुणे-कोल्हापूर, पुणे-वसई रोड आणि पुणे-इगतपुरी या मार्गावर आत्तापर्यंत १५ लाख किलोमीटर अंतर रेल्वेने कापले. घाटात रेल्वे चालवणे हे नेहमीच खूप आव्हानात्मक असते. चढउतारांवर, तीव्र वळणांवर विशेष काळजी घ्यावी लागते. घाटातल्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते.”

रुळांवर कधी अचानक पाणी येते, कधी दरड कोसळते यावर लक्ष ठेवावे लागते. उन्हाळ्यात रुळांचे प्रसरण होते. हिवाळ्यात ते आकुंचन पावतात. त्यामुळे या दोन्ही ऋतूंमध्येही लक्ष ठेवावेच लागते. रुळांवर नजर ठेवताना बाजूला असणाऱ्या सिग्नलकडे अधिक लक्ष द्यावे लागते. कधी अचानक गाई, म्हशी, शेळ्या किंवा क्वचित वन्यप्राणी रुळावर येतात. काहीवेळा आत्महत्येच्या विचाराने माणसं रुळांवर येतात. त्यावेळी आपत्कालीन ब्रेक लावावा लागतो. हॉर्न वाजवावा लागतो. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तडजोड न करता हे सगळे करावे लागते, असे हिवाळे सांगतात.

चौकट

अन वाचले शेकडो जणांचे प्राण

“शेलारवाडी-देहूरोड दरम्यान गाडी चालवीत असताना एकदा अप-लाईन वर कोणीतरी रेल्वे रुळांशेजारी असणारा मैलाचा दगड काढून ठेवला होता. त्यावरुन जर रेल्वे धावली असती तर अपघात घडला असता. मी तात्काळ स्टेशन मास्तरांना कळविले. अप लाईनवर येणारी गाडी ताबडतोब थांबविण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.”

-अजय हिवाळे.