शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

पुणे सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून वारंवार हस्तक्षेप; महापालिका प्रशासन त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 15:15 IST

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून महापालिकेच्या कामांमध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात आहे.कंपनीकडून मिळत असलेल्या या झटक्यामुळे महापालिका प्रशासन त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केलेल्या २४ तास पाणी योजनेलाच स्मार्ट सिटी कंपनीने घातला हातकुणाल कुमार व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यात सुप्त वाद

पुणे : महापालिकेच्याच ठरावातून स्थापना होऊन स्वतंत्र अस्तित्व मिळालेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून महापालिकेच्या कामांमध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात आहे. कंपनीकडून मिळत असलेल्या या झटक्यामुळे महापालिका प्रशासन त्रस्त झाले आहे. आता तर आयुक्तांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केलेल्या २४ तास पाणी योजनेलाच स्मार्ट सिटी कंपनीने हात घातला आहे.मागील दोन वर्षांपासून महापालिका आयुक्त कुणाल कुमार या पाणी योजनेसाठी प्रयत्न करीत आहेत. राज्यातीलच एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून या योजनेचा पाठपुरावा होत आहे. राज्यात सत्ता मिळाल्यानंतरच लगेचच भाजपाकडून या योजनेचा आग्रह सुरू झाला. त्यावेळी महापालिकेत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची भेट घेऊन आयुक्तांनी त्यांना या योजनेसाठी राजी केले. आता भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळातही त्यांना राज्यातून दबाव आहे. त्यामुळेच येथील पदाधिकाऱ्यांना कसबसे तयार करून त्यांनी योजना निविदेच्या अंतीम टप्प्यात आणली तर वादामुळे ती निविदाच रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.फेरनिविदेवरही आक्षेप आले असून ते नजरेआड करीत प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. आता त्यात स्मार्ट सिटी कंपनीने खोडा घातला आहे. या योजनेच्या निविदेत नमुद केलेले पाणी मोजण्याचे मीटर कालबाह्य (आऊटडेटेड) झाले आहेत, असा आक्षेप घेत एका अमेरिकन कंपनीने नव्या तंत्राचे अत्याधुनिक मीटर महापालिकेला कमी दरात देण्याची तयारी दाखवली आहे. त्या कंपनीचे असे पत्रच महापालिकेला मिळाले आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये चलबीचल सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपाचे नगरसेवकही त्याला अपवाद नाहीत. किमतीच्या व दर्जाच्या तफावतीचा तक्ताच पत्रात दर्शवण्यात आला आहे. या पत्रामागे स्मार्ट सिटी कंपनी असल्याची चर्चा महापालिकेत आहे. त्यांनीच हे पत्र महापालिकेला दिले व नगरसेवकांनी पुरवले असल्याचे बोलले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्वसाधारण सभेतच सत्ताधारी भाजपाच्या बऱ्याच सदस्यांनी मीटर बाबत चौकशी करू, तोपर्यंत २४ तास पाणी योजनेची निविदा प्रक्रिया थांबवू या विरोधकांच्या मागणीला जाहीरपणे पाठिंबा दिला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये या विषयावर विसंवाद असल्याचे स्पष्ट झाले. ३० नोव्हेंबरला आयुक्त आल्यावर यासंबधातील निर्णय घेऊ असे सांगून सभा गुंडाळण्याची वेळ भाजपावर आली.याच योजनेतील आॅप्टिकल फायबर केबल डक्टचे पूर्वीचे २९० व फेरनिविदेत १०० कोटी रूपये कमी होऊन १९० कोटी रूपयांचे झालेले काम विनामूल्य करण्याची तयारी असल्याचे पत्र स्मार्ट सिटी कंपनीनेच महापालिका आयुक्त कुणाल कुमार व महापौर मुक्ता टिळक यांना दिले होते. खासगी कंपनीकडून हे काम करून घेऊ, तयार झालेला डक्ट वापरण्यासाठी मिळणारे पैसे, संबधित कंपनी, स्मार्ट सिटी व महापालिका यांना मिळतील, त्यातून नियमित उत्पन्न वाढेल असा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावरही नगरसेवकांमध्ये चर्चा झाली व तसे करण्याचा विचार सुरू होता. खासदार काकडे गटाचे नगरसेवकच त्यात पुढे होते. तसे होऊ नये म्हणून पुन्हा प्रशासन व पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांची समजूत घालावी लागली होती.महापालिका आयुक्त कुणाल कुमार व स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले राजेंद्र जगताप यांच्यातील सुप्त वाद यामागे असल्याचे बोलले जात आहे. जगताप महापालिकेतच अतिरिक्त आयुक्त म्हणून दीर्घ काल कार्यरत होते. त्याचवेळेस या वादाचे बीज रोवले गेले असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच तत्कालीन अंदाजपत्रक समितीने पाणी योजनेत डक्टचे काम समावेश करण्याला नकार दिला होता. त्यांच्या मंजूरीविनाच पहिल्या निविदेत या कामाचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर जगताप यांची महापालिकेतून बदली झाली. काही कालावधीनंतर त्यांची महापालिकेनेच स्थापन केलेल्या स्मार्ट सिटी कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तत्पुर्वी या कंपनीचे कामकाजही आयुक्त कुणाल कुमार यांच्याच नियंत्रणाखाली होते. त्यामुळे त्यांच्यातील सुप्त संघर्षच आता वेगवेगळ्या निमित्ताने स्मार्ट सिटी व महापालिका यांच्या माध्यमातून पुढे येत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.स्मार्ट सिटी कंपनीने स्वतंत्रपणे करणे अपेक्षित असलेली कामे महापालिका करत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. २४ तास पाणी योजनाही स्मार्ट सिटी कंपनीच करणार होती. शहरामध्ये एलईडी दिवे बसवणे, सोलर सिटी करणे, नव्या अत्याधुनिक पद्धतीचे सिग्नल बसवणे, वायफाय क्षेत्र तयार करणे अशा काही कामांचीही तयारी स्मार्ट सिटी कंपनीने केली होती, मात्र आता ही कामे महापालिकेकडूनच होणार असल्याचे दिसते आहे. त्यामुळेच खासगी कंपनी ही कामे करण्यास तयार असल्याचे सांगून त्या कामांना मोडता घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाkunal kumarकुणाल कुमारPuneपुणे