शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

दमदार पावसामुळे भूजलपातळी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 02:29 IST

पाच वर्षांतील उच्चांक, टंचाईग्रस्त गावांची संख्या घटली

- विशाल शिर्के पुणे : ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिलेल्या दमदार पावसामुळे राज्यातील भूजलाची पातळी पाच वर्षांतील सर्वोत्तम स्थितीला पोहोचली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणातून हे तथ्य समोर आले आहे.भूजल विभागाच्या माध्यमातून दरवर्षी आॅक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे या महिन्यात पाणीटंचाईची पाहणी केली जाते. राज्यातील पाच नदी खोऱ्यातील १ हजार ४३१ पाणलोट क्षेत्राची पाहणी करुन अहवाल केला जातो. यंदा आॅक्टोबरअखेर ३५५ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यात सरासरी अथवा त्याहून अधिक पाऊस झाला. १०३ तालुक्यांपैकी ८७ तालुक्यांमधे २० टक्क्यांपर्यंत, १४ तालुक्यांमधे २० ते ३० आणि २ तालुक्यांमधे ३० ते ५० टक्के तूट आढळली आहे. ५० टक्क्यांहून अधिक तूट असलेला यंदा एकही तालुका नाही.भूजल आकडेवारीत येणार अचूकताया पूर्वी भूजल पातळीचा अंदाज ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींद्वारे केला जात होता. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत ३२,७६९ गावांमधे निरीक्षण विहिरींचे जाळे वाढविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील ४३ हजार खेड्यातील भूजलाचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होईल, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.