शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

रेलफोर फाउंडेशनतर्फे आदिवासींना मोफत घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 03:34 IST

आंदेशे : कातकऱ्यांसाठीचा मुळशी तालुक्यातील पहिला आदर्श गृहनिर्माण प्रकल्प

पौड : स्वत:च्या जागेचा अभाव, शेतावर मोलमजुरीसाठी सातत्याने होणारे स्थलांतर आणि आधुनिक व्यवस्थेमुळे आदिवासी हा भूमिहीन होऊन त्याला स्वत:चे घर नाही अशी परिस्थिती मुळशी तालुक्यातील आदिवासी समाजाची आहे. भूगाव पासून ताम्हिणीपर्यंत, तर हिंजवडी पासून लवासापर्यंत हा समाज गावकुसाबाहेर दुसऱ्याच्या अथवा शासकीय जागेवर गवतापासून बनवलेल्या झोपडीमध्ये राहतो.

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाºया या समाजात शिक्षणाचा अभाव, प्रचंड कुपोषण, दारिद्र्य आहे. हिंजवडीसारख्या आयटी हबपासून अवघ्या १२ किमी अंतरावर दारिद्र्याच्या अंधारात चाचपडत असणाºया समाजाला हात दिला आहे एका मोठ्या हृदयाच्या व्यक्तीने, आणि त्या व्यक्तीचे नाव आहे दीपक नथानी. दीपक नथानींच्या मातोश्री पुष्पा नथानी यांनी वर्षभरापूर्वी एका भेटीच्या दरम्यान या लोकांची अवस्था पाहिल्यानंतर या लोकांसाठी घरे बांधून देण्याचा संकल्प मुलगा दीपक याला सांगितला. यावर दीपक नथानी यांनी लगेच आपल्या रेलफोर फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे वर्षभरापूर्वी २६ घरे मुळशी तालुक्यातील आंदेशे या ठिकाणी बांधण्यास सुरुवात केली. याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन व हस्तांतरण समारंभ नुकताच पार पडला. या वेळी दीपक नथानी व त्यांच्या मातोश्री यांच्या हस्ते ९ कुटुंबांना घरांचे हस्तांतरण करण्यात आले.रेलफोर फाउंडेशनतर्फे येत्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील आदिवासींना आणखी १०० घरे बांधून देण्याचा संकल्पित प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याची माहिती या कार्यक्रमाच्या वेळी रेलफोर फाउंडेशनचे व्यवस्थापकीय अधिकारी नितीन घोडके यांनी दिली. या वेळी ठेकेदार संतोष कदम, सचिन आकरे, आदिवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे