शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

खात्यातील १ लाख २० हजार काढून शेतकऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 02:08 IST

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला फसवून हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड काढून घेऊन नंतर त्या एटीएम कार्डद्वारे शेतकऱ्याच्या खात्यातील पैसे काढून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

उरुळी कांचन : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला फसवून हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड काढून घेऊन नंतर त्या एटीएम कार्डद्वारे शेतकऱ्याच्या खात्यातील पैसे काढून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी बाळासाहेब म्हस्कू थोरात (वय ५९, रा. हिंगणगाव, ता. हवेली) यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या खात्यातून तब्बल १ लाख २० हजार रुपये काढून घेतले आहेत. बाळासाहेब थोरात हे शेतकरी असून त्यांचे उरुळी कांचन येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. रविवारी (दि. ९) उरुळी कांचनचा आठवडे बाजार होता. या बाजारातून घरात लागणारा भाजीपाला व इतर वस्तू घेण्यासाठी थोरात यांना पैशाची आवश्यकता होती. म्हणून एलाईट चौकातील एका सहकारी बँकेच्या एटीएममध्ये ते गेले होते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्या वेळी एटीएममधून पैसे निघाले नाहीत.अचानक त्या वेळी तेथे गोरा, मध्यम बांधा असलेला २५-३० वर्षे वयाचा एक तरुण आला. तो थोरात यांना म्हणाला, तुम्हाला पैसे निघत नाहीत. मी मदत करतो. एटीएम कार्ड माझ्याकडे द्या. थोरात यांच्याकडून त्याने एटीएम कार्ड घेऊन एटीएममध्ये टाकले. नंतर त्याने थोरात यांना पासवर्ड टाकण्यास सांगितला. त्यानुसार त्या तरुणासमोरच थोरात यांनी पासवर्ड टाकला. परंतु तरीही पैसे निघाले नाहीत. त्या वेळी त्या तरुणाने हातचलाखी करून दुसरेच कार्ड थोरात यांच्या हातात दिले. थोरात ते दुसरेच कार्ड खिशात टाकून आठवडे बाजारात निघून गेले. बाजार घेऊन ते आपल्या घरी निघून गेले.त्या नंतर ११ डिसेंबर रोजी बाळासाहेब थोरात सदर बँकेत गेले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या पासबुकमध्ये एंट्री करून घेतल्या. पासबुक तपासल्यावर त्यांच्या लक्षात आले, की आपल्या खात्यातून तब्बल १ लाख २० हजार रुपये काढण्यात आले आहेत. या विषयी त्यांनी बँकेतील कर्मचाºयांकडे चौकशी केली. त्या वेळी संबंधित कर्मचाºयाने अशी माहिती दिली, की तुमच्या एटीएम कार्डद्वारे तुमच्या खात्यातून एकूण एक लाख वीस हजार रुपये वेगवेगळ्या एटीएममधून काढण्यात आले आहेत. लोणी काळभोर येथील एटीएम मधून ९ डिसेंबर रोजी ४० हजार रुपये, कर्जत येथील एटीएममधून १० डिसेंबर रोजी ४० हजार रुपये व तारकपूर (जि. अहमदनगर) येथील एटीएममधून ११ डिसेंबर रोजी ४० हजार रुपये असे एकूण एक लाख वीस हजार रुपये काढण्यात आले आहेत. त्या वेळी बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खिशातील एटीएम कार्ड तपासले असता ते दुसºयाचे कार्ड होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीFarmerशेतकरी