शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

चतुर्थ वार्षिकीचे काम अर्धवट; बिले मात्र अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:13 IST

इंदापूर नगर परिषदेच्या सन २०१७-१८च्या चतुर्थ वार्षिकीचे काम अर्धवट असून, त्याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने त्या बाबीची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सोमवारी नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते व नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली.

इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या सन २०१७-१८च्या चतुर्थ वार्षिकीचे काम अर्धवट असून, त्याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने त्या बाबीची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सोमवारी नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते व नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात सर्व १० नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आले आहे.आज दुपारी नगर परिषदेतील विरोधी गटाचे नेते गजानन गवळी, पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली, की अमरावतीच्या कोअर कंपनीकडे इंदापूर नगर परिषदेने सन २०१७-१८ या वर्षाचा चतुर्थ वार्षिकी तयार करण्याचा ठेका दिला आहे. ६३ लाख रुपयांना दिलेल्या या ठेक्याचे ४४ लाख रुपये यापूर्वीच दिले आहेत. मात्र, दि. ३१ डिसेंबरच्या आत हे काम पूर्ण झाले नाही.मालमत्ता चतुर्थ वार्षिकी आकारणीनंतरची अंतिम बिले देणे बाकी आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चतुर्थ वार्षिकीचे राहिलेले बिल देण्यासाठीचा ठराव प्रशासनाने सभागृहासमोर ठेवला होता. त्याला आम्ही सर्वांनी विरोध केला, असे सांगून ते म्हणाले, की हे काम पूर्ण नाही. त्याबाबत सभागृहाला अंधारात ठेवण्यात आले आहे. याबाबत विचारणा केली असता, समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. ठेकेदाराचे बिल देण्यासाठी संबंधित अधिकारी घाई का करीत आहेत, हे समजू शकत नाही. सदर बाबीची चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.चतुर्थ वार्षिकीचे काम पूर्ण झाल्याशिवाय नगर परिषदेला घरपट्टी व पाणीपट्टीची आकारणी होणार नाही. बिले मिळाली नाहीत, तर ती नागरिकापर्यंत पोहोचणार कधी? मार्चअखेरपर्यंत वसुली होणार कशी? असे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. नंतरचा बोजा नागरिकांवर पडणार असल्याने आपण या संदर्भात जिल्हाधिकाºयांकडे निवेदन पाठविले आहे. या निवेदनावर गजानन गवळी, पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस, अनिकेत वाघ, अमर गाडे, राजश्री मखरे, मधुरा ढवळे-पवार, उषा स्वामी, हेमलता माळुंजकर, नाना राऊत आदींच्या सह्या आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.>...ते काम पूर्ण झालेले आहेनगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की बिल देण्यासाठी घाई करण्याचा काही विषय नाही. जुलै २०१७मध्ये संबंधित ठेकेदाराला ४१ लाख रुपयांचे बिल देण्यात आले होते. आपण मुख्याधिकारीपद स्वीकारल्यापासून त्या ठेकेदाराला कसलेही बिल दिलेले नाही. आत्ता ते काम पूर्ण झालेले आहे.याबाबत ठरावदेखील झाला आहे. हा निधी शासनाचा आहे. तो विहीत वेळेत खर्च होणे महत्त्वाचे आहे. त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्तांची भेट झाली. त्या वेळी हे बिल का दिले गेले नाही, याबाबत आपणास विचारणा झाली होती.