शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चाळीस वर्षांपूर्वीचा निवारा क्षणात नष्ट; २२ कुटुंबे रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 01:56 IST

घोरपडी रेल्वे प्रशासन : १९७३ पासूनची होती वस्ती, रेल्वे हद्दीतील बेकायदेशीर घरे पाडली

मनोज गायकवाडमुंढवा : आमची घरं पाडली... आम्हाला निवारा नाही... आम्ही रस्त्यावरंच राहतोया.. कुटुंबात लहान लेकरंबाळं आहेत... बायामाणसं आहेत. या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच्या बिछान्यातच झोपतोया... रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशातच स्वयंपाक अन् पोरं शाळेचा अभ्यास करत्यात... दोन वेळचं जेवणही मिळंनासं झालंया... साहेबा.. आम्हाला या थंडीत कोणी घर देता का घर... अशी आर्त हाक घोरपडी येथील रेल्वे प्रशासनाने रेल्वे हद्दीतील बेकायदेशीर घरे पाडल्यामुळे संसार रस्त्यावर आलेल्या महिला देत आहे.

शनिवार, २२ डिसेंबर २०१८ रोजी घोरपडी येथील रेल्वे हद्दीतील बेकायदेशीर घरांवर रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली. या कारवाईत साधारण २२ घरे जमीनदोस्त करण्यात आली. यातील काही घरे पत्र्याची, तर काही घरे विटांची होती. यात काही जण साधारण १९७३ पासून येथे वास्तव्य करीत होते. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर समोरील रस्त्यावरच या २२ कुटुंबांनी आपले संसाराचे साहित्य मांडून तिथे राहत आहेत. तिथे ना पाणी, ना वीज, ना छप्पर अशा परिस्थितीतही ही कुटुंबे उघड्यावरच राहत आहेत. ही कारवाई झाल्यानंतर काही नगरसेवकांनी तुम्हाला १५ दिवसांत घरे मिळतील, अशी आश्वासने दिली आहेत. याविषयी पुणे महानगरपालिकेत मीटिंगही झाल्या आहेत. येथील नागरिकांनी काही कागदपत्रेही जमा केली आहेत. त्यावर एक महिनाभरात तुमची सोय होईल, असे येथील महिलांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत आहे. अशा वातावरणात ही कुटुंबे कशी राहत असतील. येथील कुटुंबात ६ महिने ते ७ वर्षे वयोगटातील १० मुले आहेत. वयोवृद्ध १०, महिला ४० व पुरुषांची संख्या १८ इतकी आहे. त्यांचे खाणे-पिणे, झोपणे, अंघोळ या सगळ्या गोष्टी रस्त्यावरच करीत आहेत. या कुटुंबांना हवा आहे निवारा तोही स्वसंरक्षणासाठी घरातील महिलांच्या व लहान मुलांच्या. व्यवस्थेने रस्त्यावर आणले. भले ही घरे अनधिकृत होती; पण या कुटुंबातील माणसे ही हाडामासाची आहेत. त्यांनाही भावना आहेत. लहान लेकरे व महिला उघड्यावरच झोपत आहेत. लवकरात लवकर आम्हाला निवारा मिळावा, अशी भावना येथील नागरिकांची आहे. या वेळी येथील रहिवासी रेखा कांबळे म्हणाल्या, ‘गेले १९ दिवस झाले आम्ही रस्त्यावर राहत आहोत. कारवाई झाल्यापासून येथील नगरसेवकांनी दोन वेळचे जेवण दिले. त्यानंतर एक वेळचे जेवण मिळायची भ्रांत पडली. काहींनी तरी घराचे राहिलेले पत्रे विकून स्वयंपाकासाठी किराणा भरला आहे. घरात लहान लेकरंबाळं आहेत. त्यांना उराशी घेऊन रात्र काढत आहे. रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडावर सगळं चाललं आहे.’रूपाली फणसे म्हणाल्या, ‘मला दोन लहान मुले आहेत. एक मुलगी शाळेत जाते. दिवस कसाबसा निघून जातो. पण रात्री व पहाटे थंडीने मुले अक्षरश: गारठतात. येथील हातगाडीचा आडोसा घेऊन आम्ही महिला अंघोळ करतो. रात्रीच्या २-३ च्या सुमारास अज्ञात पुरुष गाडीवर येऊन घुटमळतात. आम्ही महिला अशा परिस्थितीत कशा राहत असतील. आमचे संरक्षण आमचा पाळलेला कुत्राच करत आहे. तो रात्रीचा पहारा देतो. चोरायला आमच्या गरिबांकडे काहीही नाही. पण लहान लेकरंबाळ जर कोणी उचलून नेली तरी त्याचीच जास्त भीती वाटते. आम्ही सर्व कुटुंबे एकमेकांना आधार देत राहत आहोत. आम्हांला लवकरात लवकर निवारा मिळाला तर आमच्या लेकरांची आबाळ होणार नाही. या थंडीने मुले आजारी पडली आहेत.’

काव्या फणसे (वय ७) म्हणाली, ‘मी शाळेत दुसरी इयत्तेत शिकते. मला इथे खूप थंडी वाजते. इथे खूप अंधार असतो. आमच्या घराला भिंत नाही की छप्पर नाही. काका आम्हाला कधी घर मिळणार. काका मला इथे फार भीती वाटते. आम्हाला कोणी घर देईल का हो... शाळेत मला सगळे विचारतात, तू रस्त्यावर का राहते?’आर्त हाक नवाऱ्याची.....कोणी घर देता का घर या डायलॉगने अनेकांचे करिअर घडविले. काहींनी पैसाही कमविला असेल. परंतु इथे मात्र खरंच प्रत्येक माणुस व्याकुळतेने निवा-यासाठी खरच घर मागतोय. परंतु हा खरा खुरा डायलॉग ऐकण्यासाठी कोणताही व्यवस्थेचा माणुस समोर नाही. दाद मिळत आहे ती पोकळ आश्वासनांची. तोपर्यंत या व्याकुळ झालेल्या माणसांनी झुंज द्यायची ती कुठपर्यंत....... 

टॅग्स :Puneपुणे