शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

चाळीस वर्षांपूर्वीचा निवारा क्षणात नष्ट; २२ कुटुंबे रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 01:56 IST

घोरपडी रेल्वे प्रशासन : १९७३ पासूनची होती वस्ती, रेल्वे हद्दीतील बेकायदेशीर घरे पाडली

मनोज गायकवाडमुंढवा : आमची घरं पाडली... आम्हाला निवारा नाही... आम्ही रस्त्यावरंच राहतोया.. कुटुंबात लहान लेकरंबाळं आहेत... बायामाणसं आहेत. या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच्या बिछान्यातच झोपतोया... रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशातच स्वयंपाक अन् पोरं शाळेचा अभ्यास करत्यात... दोन वेळचं जेवणही मिळंनासं झालंया... साहेबा.. आम्हाला या थंडीत कोणी घर देता का घर... अशी आर्त हाक घोरपडी येथील रेल्वे प्रशासनाने रेल्वे हद्दीतील बेकायदेशीर घरे पाडल्यामुळे संसार रस्त्यावर आलेल्या महिला देत आहे.

शनिवार, २२ डिसेंबर २०१८ रोजी घोरपडी येथील रेल्वे हद्दीतील बेकायदेशीर घरांवर रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली. या कारवाईत साधारण २२ घरे जमीनदोस्त करण्यात आली. यातील काही घरे पत्र्याची, तर काही घरे विटांची होती. यात काही जण साधारण १९७३ पासून येथे वास्तव्य करीत होते. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर समोरील रस्त्यावरच या २२ कुटुंबांनी आपले संसाराचे साहित्य मांडून तिथे राहत आहेत. तिथे ना पाणी, ना वीज, ना छप्पर अशा परिस्थितीतही ही कुटुंबे उघड्यावरच राहत आहेत. ही कारवाई झाल्यानंतर काही नगरसेवकांनी तुम्हाला १५ दिवसांत घरे मिळतील, अशी आश्वासने दिली आहेत. याविषयी पुणे महानगरपालिकेत मीटिंगही झाल्या आहेत. येथील नागरिकांनी काही कागदपत्रेही जमा केली आहेत. त्यावर एक महिनाभरात तुमची सोय होईल, असे येथील महिलांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत आहे. अशा वातावरणात ही कुटुंबे कशी राहत असतील. येथील कुटुंबात ६ महिने ते ७ वर्षे वयोगटातील १० मुले आहेत. वयोवृद्ध १०, महिला ४० व पुरुषांची संख्या १८ इतकी आहे. त्यांचे खाणे-पिणे, झोपणे, अंघोळ या सगळ्या गोष्टी रस्त्यावरच करीत आहेत. या कुटुंबांना हवा आहे निवारा तोही स्वसंरक्षणासाठी घरातील महिलांच्या व लहान मुलांच्या. व्यवस्थेने रस्त्यावर आणले. भले ही घरे अनधिकृत होती; पण या कुटुंबातील माणसे ही हाडामासाची आहेत. त्यांनाही भावना आहेत. लहान लेकरे व महिला उघड्यावरच झोपत आहेत. लवकरात लवकर आम्हाला निवारा मिळावा, अशी भावना येथील नागरिकांची आहे. या वेळी येथील रहिवासी रेखा कांबळे म्हणाल्या, ‘गेले १९ दिवस झाले आम्ही रस्त्यावर राहत आहोत. कारवाई झाल्यापासून येथील नगरसेवकांनी दोन वेळचे जेवण दिले. त्यानंतर एक वेळचे जेवण मिळायची भ्रांत पडली. काहींनी तरी घराचे राहिलेले पत्रे विकून स्वयंपाकासाठी किराणा भरला आहे. घरात लहान लेकरंबाळं आहेत. त्यांना उराशी घेऊन रात्र काढत आहे. रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडावर सगळं चाललं आहे.’रूपाली फणसे म्हणाल्या, ‘मला दोन लहान मुले आहेत. एक मुलगी शाळेत जाते. दिवस कसाबसा निघून जातो. पण रात्री व पहाटे थंडीने मुले अक्षरश: गारठतात. येथील हातगाडीचा आडोसा घेऊन आम्ही महिला अंघोळ करतो. रात्रीच्या २-३ च्या सुमारास अज्ञात पुरुष गाडीवर येऊन घुटमळतात. आम्ही महिला अशा परिस्थितीत कशा राहत असतील. आमचे संरक्षण आमचा पाळलेला कुत्राच करत आहे. तो रात्रीचा पहारा देतो. चोरायला आमच्या गरिबांकडे काहीही नाही. पण लहान लेकरंबाळ जर कोणी उचलून नेली तरी त्याचीच जास्त भीती वाटते. आम्ही सर्व कुटुंबे एकमेकांना आधार देत राहत आहोत. आम्हांला लवकरात लवकर निवारा मिळाला तर आमच्या लेकरांची आबाळ होणार नाही. या थंडीने मुले आजारी पडली आहेत.’

काव्या फणसे (वय ७) म्हणाली, ‘मी शाळेत दुसरी इयत्तेत शिकते. मला इथे खूप थंडी वाजते. इथे खूप अंधार असतो. आमच्या घराला भिंत नाही की छप्पर नाही. काका आम्हाला कधी घर मिळणार. काका मला इथे फार भीती वाटते. आम्हाला कोणी घर देईल का हो... शाळेत मला सगळे विचारतात, तू रस्त्यावर का राहते?’आर्त हाक नवाऱ्याची.....कोणी घर देता का घर या डायलॉगने अनेकांचे करिअर घडविले. काहींनी पैसाही कमविला असेल. परंतु इथे मात्र खरंच प्रत्येक माणुस व्याकुळतेने निवा-यासाठी खरच घर मागतोय. परंतु हा खरा खुरा डायलॉग ऐकण्यासाठी कोणताही व्यवस्थेचा माणुस समोर नाही. दाद मिळत आहे ती पोकळ आश्वासनांची. तोपर्यंत या व्याकुळ झालेल्या माणसांनी झुंज द्यायची ती कुठपर्यंत....... 

टॅग्स :Puneपुणे