शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

किल्ले ऐतिहासिक दागिना

By admin | Updated: February 21, 2015 02:00 IST

किल्ले हे महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. या वास्तू ऐतिहासिक दागिना असून त्यांचे जतन केले पाहिजे, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी केले.

पुणे : किल्ले हे महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. या वास्तू ऐतिहासिक दागिना असून त्यांचे जतन केले पाहिजे, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी केले. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने सिंहगडाच्या पायथ्याशी गप्पांगण येथे आयोजित पाचव्या दुर्ग साहित्य संमेलनात ते बोलत होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देव, प्रा. वीणा देव, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अरविंद जामखेडकर, स्वागताध्यक्ष जयप्रकाश सुराणा, गिर्यारोहक उमेश झिरपे आदी उपस्थित होते. संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा दुर्गसाहित्य पुरस्कार दुर्ग अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांना देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘काही विद्यार्थ्यांनी सिंहगड किल्ल्याची साफसफाई केली; तेव्हा दोन हजार दारूच्या बाटल्या सापडल्या. आपण किल्ल्यांचे किती जतन करतो, त्यांची निगा राखतो, हा प्रश्न यामुळे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. किल्ले आपल्याला इतिहास सांगतात. त्यांची माहिती सर्वसामान्य माणसाला व्हावी यासाठी हे संमेलन आहे. यातून आपल्याला एक समाज निर्माण करायचा आहे.’’डी. एस. कुलकर्णी म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळी किल्ल्याचे व्यवस्थापन आकर्षक होते. सर्व सोयीसुविधा त्या वेळी केल्या होत्या. आता जर असे किल्ले बांधायचे म्हटले तरी तसे व्यवस्थापन आपल्याला जमणार नाही. हे वास्तुशास्त्र म्हणजे गडाचे आकर्षण आहे. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले महाराष्ट्रात उभे केले आहे. आपला इतिहास प्रत्येक मराठी माणसाला कळावा यासाठी हे साहित्य संमेलन आहे.’’विजय देव म्हणाले, ‘‘दुर्गविषय साहित्य वाचले जावे आणि नवीन दुर्गविषय साहित्य कसे निर्माण होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन दुर्ग साहित्याचे जतन संवर्धन जनजागरण करण्याची आवश्कता आहे. यासाठीच संयुक्त महाराष्ट्राचा विकास आधुनिक अंगाने करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)४घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत, तेथील व्यवस्थेबाबत चर्चा होते. जेवण काय आहे, हादेखील चर्चेचा विषय होतो. परंतु, त्यापेक्षा साहित्य संमेलनांचा इतिहास काय आहे? घुमानमध्ये साहित्य संमेलन का होते आहे? त्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, हे पाहणे गरजेचे आहे, असे मत बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. ४भारताने इतर देशांमधून काही आदर्श घ्यायला हवा. ते त्यांच्या संस्कृतीवर प्रेम करतात तसे प्रेम भारतातले नागरिक करताना दिसत नाही. किल्ल्यांचा इतिहास काय आहे यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.४किल्ले आपल्याला इतिहास सांगतात त्यामुळे त्यांच्या संवधर्ननासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी दुर्ग साहित्य संमेलनाच्या माध्यमातून याला प्रोत्साहन मिळते.