शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

किल्ले ऐतिहासिक दागिना

By admin | Updated: February 21, 2015 02:00 IST

किल्ले हे महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. या वास्तू ऐतिहासिक दागिना असून त्यांचे जतन केले पाहिजे, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी केले.

पुणे : किल्ले हे महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. या वास्तू ऐतिहासिक दागिना असून त्यांचे जतन केले पाहिजे, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी केले. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने सिंहगडाच्या पायथ्याशी गप्पांगण येथे आयोजित पाचव्या दुर्ग साहित्य संमेलनात ते बोलत होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देव, प्रा. वीणा देव, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अरविंद जामखेडकर, स्वागताध्यक्ष जयप्रकाश सुराणा, गिर्यारोहक उमेश झिरपे आदी उपस्थित होते. संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा दुर्गसाहित्य पुरस्कार दुर्ग अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांना देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘काही विद्यार्थ्यांनी सिंहगड किल्ल्याची साफसफाई केली; तेव्हा दोन हजार दारूच्या बाटल्या सापडल्या. आपण किल्ल्यांचे किती जतन करतो, त्यांची निगा राखतो, हा प्रश्न यामुळे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. किल्ले आपल्याला इतिहास सांगतात. त्यांची माहिती सर्वसामान्य माणसाला व्हावी यासाठी हे संमेलन आहे. यातून आपल्याला एक समाज निर्माण करायचा आहे.’’डी. एस. कुलकर्णी म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळी किल्ल्याचे व्यवस्थापन आकर्षक होते. सर्व सोयीसुविधा त्या वेळी केल्या होत्या. आता जर असे किल्ले बांधायचे म्हटले तरी तसे व्यवस्थापन आपल्याला जमणार नाही. हे वास्तुशास्त्र म्हणजे गडाचे आकर्षण आहे. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले महाराष्ट्रात उभे केले आहे. आपला इतिहास प्रत्येक मराठी माणसाला कळावा यासाठी हे साहित्य संमेलन आहे.’’विजय देव म्हणाले, ‘‘दुर्गविषय साहित्य वाचले जावे आणि नवीन दुर्गविषय साहित्य कसे निर्माण होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन दुर्ग साहित्याचे जतन संवर्धन जनजागरण करण्याची आवश्कता आहे. यासाठीच संयुक्त महाराष्ट्राचा विकास आधुनिक अंगाने करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)४घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत, तेथील व्यवस्थेबाबत चर्चा होते. जेवण काय आहे, हादेखील चर्चेचा विषय होतो. परंतु, त्यापेक्षा साहित्य संमेलनांचा इतिहास काय आहे? घुमानमध्ये साहित्य संमेलन का होते आहे? त्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, हे पाहणे गरजेचे आहे, असे मत बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. ४भारताने इतर देशांमधून काही आदर्श घ्यायला हवा. ते त्यांच्या संस्कृतीवर प्रेम करतात तसे प्रेम भारतातले नागरिक करताना दिसत नाही. किल्ल्यांचा इतिहास काय आहे यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.४किल्ले आपल्याला इतिहास सांगतात त्यामुळे त्यांच्या संवधर्ननासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी दुर्ग साहित्य संमेलनाच्या माध्यमातून याला प्रोत्साहन मिळते.