शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रसवंतीगृह चालकाकडून माजी मंत्र्यांच्या भगिनीला परत मिळाला लाखोंचा ऐवज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 20:39 IST

दागिने व पैसे असलेली बॅग स्वत: हुन परत करणाऱ्या व्यक्तीचे नाव शामराव धुमाळ आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. 

ठळक मुद्दे बॅग तपासली असता त्यामध्ये दागिने, एटीएमकार्ड, आधारकार्ड, मोबाईल व पैसे आढळून आले.

नीरा  : माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भगिनी माधुरी सुभाष माने (रा.सांगली) या आपल्या कुटुंबासह पुण्याला निघाल्या होत्या. पुणे - पंढरपूर पालखी मार्गावर नीरा -जेजुरी दरम्यान रस पिण्यासाठी त्या औदुंबर रसवंतीगृहात थांबल्या. रस घेतल्यानंतर त्या दागिने व पैसै असलेली बॅग विसरुन पुण्याला आल्या. मात्र, रसवंतीगृहात विसरलेली मौल्यवान वस्तूंची बॅग रसवंतीगृहांच्या चालकांच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाली. दागिने व पैसे असलेली बॅग स्वत: हुन परत करणाऱ्या व्यक्तीचे नाव शामराव धुमाळ आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. धुमाळ यांच्या सुमारे एक तासानंतर ही गोष्ट लक्षात आली. यानंतर त्यांनी ती बॅग तपासली असता त्यामध्ये दागिने, एटीएमकार्ड, आधारकार्ड, मोबाईल व पैसे आढळून आले. धुमाळ यांनी त्यांच्याशी संपर्क करून आमच्या इथे तुमची बॅग राहिली असल्याचे व ती सुरक्षित असल्याचे माने यांना सांगितले. आज सकाळी १० वाजता सुभाष माने यांनी ती बॅग ताब्यात घेतली. यावेळी पिंपरेचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद थोपटे, नीरा औट पोस्टचे सहाय्यक फौजदार बाळासाहेब बनकर, निरेचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर,आदी उपस्थित होते. सुभाष माने यांनी धुमाळ यांचे आभार मानत त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.   

टॅग्स :Jejuriजेजुरीministerमंत्री