शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

पूर्वप्राथमिक धोरणाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:19 IST

बालवाडी, प्ले ग्रुप, नर्सरी, शिशू गट, मोठा गट (पूर्वप्राथमिक) यांच्यासाठी एक धोरण निश्चित करून नियमावली लागू करण्याचे

पुणे : बालवाडी, प्ले ग्रुप, नर्सरी, शिशू गट, मोठा गट (पूर्वप्राथमिक) यांच्यासाठी एक धोरण निश्चित करून नियमावली लागू करण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ ची मुदत न्यायालयाने दिली होती. मात्र ही मुदत उलटून गेली तरी अद्याप पूर्व-प्राथमिकची नियमावली अस्तित्त्वात येऊ शकलेली नाही. यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून प्रवेश देताना मनमानी केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.पूर्वप्राथमिकबाबत निश्चित नियम नसल्याने गल्लीबोळात नर्सरी, प्री प्रायमरी स्कूल, बालवाडी सुरू केल्या जात आहेत. त्याचबरोबर त्यातील अनेक पूर्वप्राथमिक शाळा रात्रीतून अचानक बंद करण्याचेही प्रकारघडत आहेत. यामुळे याबाबतनिश्चित धोरण ठरविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.लातूर शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी पूर्व-प्राथमिकची नियमावली ठरविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र त्याला २ महिने उलटून गेले तरी अद्याप शासनाकडून काहीच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत.पूर्व-प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी कुठलाही नियम नाही, त्यांना वाटेल त्या पद्धतीने ते शुल्क निश्चित करतात. त्यांच्यासाठी कुठलाही अभ्यासक्रम ठरवून देण्यात आलेला नाही, बहुतांश पूर्व-प्राथमिक शाळांमध्ये पात्र शिक्षक नाहीत. त्यामुळे लहानग्या मुलांना शिकविण्याचे त्यांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नसते. अनेकदा ते पूर्वप्राथमिक शाळांमध्ये श्लोक, बाराखड्या शिकवत राहतात. हा प्रकार पूर्णत: अशास्त्रीय आहे.पूर्वप्राथमिकचा अभ्यासक्रम विद्या प्राधिकरण यांनी तयार केलेला आहे. पूर्वप्राथमिक शाळांनी त्याचा अवलंब करणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याबाबतची सुस्पष्ट नियमावली निश्चित होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागांमध्ये अंगणवाड्यांना अधिक सक्षम करून तिथे हे शिक्षण उपलब्ध करून देता येऊ शकेल. ग्रामीण भागात असलेल्या अंगणवाडयांनाच पूर्व प्राथमिकचा दर्जा देण्यात यावा अशी मागणीही केली जात आहे.पिंपरी-चिचवडमध्येही नागरिक बालवाडी प्रवेशासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, ही अपेक्षा आहे. पण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने पालक हवालदील झाले आहेत. तसेच काहींनी महापालिकेतआंदोलनही केले. पाल्याच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठीही पालक प्रयत्न करीत आहेत. परंतु, आरटीई प्रवेशाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे पालकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.अनेक शाळांनी फीमध्येही भरमसाठ वाढ केली आहे. तसेच फीही एकाच हप्त्यामध्ये भरण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे पालकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.शिक्षण हक्क कायद्यातील (२००९) कलम ११ प्रमाणे मुला-मुलींच्या पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी योग्य ती व्यवस्था उभारण्याची जबाबदारी राज्य शासनांवर सोपविण्यात आलेली आहे. शिक्षण हक्क कायदा १ एप्रिल २०१० पासून लागू झाला. मात्र महाराष्टÑ शासनाने अद्याप त्याबाबतची कार्यवाही केलेली नाही. शिक्षण विभागाने काही वर्षांपूर्वी पूर्वप्राथमिक शिक्षणाबाबतच्या कायद्याचा मसुदा तयार करून तो शासनाकडे पाठविला आहे. मात्र त्यावर अद्याप काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही.