शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शास्तीकर माफ करावा

By admin | Updated: May 31, 2017 02:11 IST

महापालिका हद्दीतील सन २००८ पासूनच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका हद्दीतील सन २००८ पासूनच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.महापालिका निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने शास्तीकर माफीची घोषणा केली. या घोषणेचा फायदा भाजपाला झाला. पण, राज्य सरकारचा प्रत्यक्ष अध्यादेश महापालिका प्रशासनाला मिळण्यास उशीर झाला़ राज्य सरकारची खेळीही असू शकते. ११ जानेवारी २०१७ च्या आदेशानुसार ४८ हजार कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात २००८ पासून १० जानेवारी २०१७ पर्यंतच्या बाधकामांना शास्तिकर माफ होऊ शकत नाही. ११ जानेवारी २०१७ पासून पुढे शास्तीकर माफ केला आहे. परंतु हा आदेश चालू वर्षापासून लागू झाल्याने या आदेशामुळे मागील वर्षातील शास्तीकराचे ३०० कोटी रुपये वसूल होणार असून या निर्णयाचा खरा लाभ नागरिकांना कमी व महापालिकेला अधिक होणार आहे, असा आरोप खासदार बारणे यांनी केला आहे़अनधिकृत बांधकाम व शास्तीकर यांच्या विरोधात खासदार बारणे यांनी अनेक आंदोलने केली आहेत. राज्य शासनाचा शास्तीकराच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला याचा काही प्रमाणात लाभ मिळत असून केवळ आकडेवारी करून जनतेची दिशाभूल होत आहे. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे बऱ्याचशा मिळकतधारकांना शास्तीकर भरावा लागणार आहे. या चुकीच्या निर्णयाचा फेर विचार करावा यासाठी बारणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.अनधिक बांधकामधारकांना न्याय मिळावा व शास्तीकर पूर्णत: माफ केला जावा यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने ११ जानेवारी २०१७ रोजी अध्यादेश काढून ६०० चौरस फूट आकाराच्या अनधिकृत घरांना शास्तीकर माफ केला. ६०१ ते १ हजार चौरस फूट आकाराच्या अनधिकृत घरांना ५० टक्के शास्तीकर आकाराला आहे. १ हजार पुढील अनधिकृत घरांना मिळकतकराच्या दुपटीने शास्तीकर आकारण्यात येणार आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी प्रत्यक्ष करण्यात आली असून या अंमलबजावणीनुसार २००८ पासून लागू असलेला शास्तीकराची रकमेची माफी केवळ चालू वर्षासाठी मिळणार असून उर्वरित मागील वर्षाचा शास्तीकर भरावा लागणार आहे, असे बारणे यांनी पत्रकात म्हटले आहे.महापालिका : ३०० कोटींचे उत्पन्न मिळणारशासन निर्णयाच्या या अंमलबजावणीमुळे महापालिकेला ३०० कोटी रुपये उत्पन्न शास्तीकरातून मिळणार असून शास्तीकर माफीचा निर्णय म्हणजे पूर्णत: शास्तीकर माफ झाला नसून केवळ १ वर्षासाठीच शास्तीकर माफ केला गेला आहे. उर्वरित २००८ पासूनची संपूर्ण रक्कम ही नागरिकांना भरावीच लागणार असून त्याची अंमलबजावणी चालू झाली आहे. नागरिक मिळकतकर भरण्यासाठी गेल्यास प्रथम शास्तीकराची संपूर्ण रक्कम भरावी लागणार असल्याने नागरिकांना शास्तीकराचा हा शासन निर्णय फसवा वाटू लागल्याने अनेक नागरिकांनी खासदार बारणे यांना भेटून आपली व्यथा मांडली. खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शास्तीकर २००८ पासून पूर्णत: माफ करावा २००८ पासून शास्तीकर माफ होणार या आशेने नागरिकांनी शास्तीकर भरला नाही़ शहरातील अनधिकृत बांधकाम करणारे सर्वसामान्य नागरिक कामगार असून शास्तीकर रक्कम भरू शकत नसल्याने २००८ पासून शास्तीकर माफ करावा, अशी विनंती केली.