शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शास्तीकर माफ करावा

By admin | Updated: May 31, 2017 02:11 IST

महापालिका हद्दीतील सन २००८ पासूनच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका हद्दीतील सन २००८ पासूनच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.महापालिका निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने शास्तीकर माफीची घोषणा केली. या घोषणेचा फायदा भाजपाला झाला. पण, राज्य सरकारचा प्रत्यक्ष अध्यादेश महापालिका प्रशासनाला मिळण्यास उशीर झाला़ राज्य सरकारची खेळीही असू शकते. ११ जानेवारी २०१७ च्या आदेशानुसार ४८ हजार कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात २००८ पासून १० जानेवारी २०१७ पर्यंतच्या बाधकामांना शास्तिकर माफ होऊ शकत नाही. ११ जानेवारी २०१७ पासून पुढे शास्तीकर माफ केला आहे. परंतु हा आदेश चालू वर्षापासून लागू झाल्याने या आदेशामुळे मागील वर्षातील शास्तीकराचे ३०० कोटी रुपये वसूल होणार असून या निर्णयाचा खरा लाभ नागरिकांना कमी व महापालिकेला अधिक होणार आहे, असा आरोप खासदार बारणे यांनी केला आहे़अनधिकृत बांधकाम व शास्तीकर यांच्या विरोधात खासदार बारणे यांनी अनेक आंदोलने केली आहेत. राज्य शासनाचा शास्तीकराच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला याचा काही प्रमाणात लाभ मिळत असून केवळ आकडेवारी करून जनतेची दिशाभूल होत आहे. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे बऱ्याचशा मिळकतधारकांना शास्तीकर भरावा लागणार आहे. या चुकीच्या निर्णयाचा फेर विचार करावा यासाठी बारणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.अनधिक बांधकामधारकांना न्याय मिळावा व शास्तीकर पूर्णत: माफ केला जावा यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने ११ जानेवारी २०१७ रोजी अध्यादेश काढून ६०० चौरस फूट आकाराच्या अनधिकृत घरांना शास्तीकर माफ केला. ६०१ ते १ हजार चौरस फूट आकाराच्या अनधिकृत घरांना ५० टक्के शास्तीकर आकाराला आहे. १ हजार पुढील अनधिकृत घरांना मिळकतकराच्या दुपटीने शास्तीकर आकारण्यात येणार आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी प्रत्यक्ष करण्यात आली असून या अंमलबजावणीनुसार २००८ पासून लागू असलेला शास्तीकराची रकमेची माफी केवळ चालू वर्षासाठी मिळणार असून उर्वरित मागील वर्षाचा शास्तीकर भरावा लागणार आहे, असे बारणे यांनी पत्रकात म्हटले आहे.महापालिका : ३०० कोटींचे उत्पन्न मिळणारशासन निर्णयाच्या या अंमलबजावणीमुळे महापालिकेला ३०० कोटी रुपये उत्पन्न शास्तीकरातून मिळणार असून शास्तीकर माफीचा निर्णय म्हणजे पूर्णत: शास्तीकर माफ झाला नसून केवळ १ वर्षासाठीच शास्तीकर माफ केला गेला आहे. उर्वरित २००८ पासूनची संपूर्ण रक्कम ही नागरिकांना भरावीच लागणार असून त्याची अंमलबजावणी चालू झाली आहे. नागरिक मिळकतकर भरण्यासाठी गेल्यास प्रथम शास्तीकराची संपूर्ण रक्कम भरावी लागणार असल्याने नागरिकांना शास्तीकराचा हा शासन निर्णय फसवा वाटू लागल्याने अनेक नागरिकांनी खासदार बारणे यांना भेटून आपली व्यथा मांडली. खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शास्तीकर २००८ पासून पूर्णत: माफ करावा २००८ पासून शास्तीकर माफ होणार या आशेने नागरिकांनी शास्तीकर भरला नाही़ शहरातील अनधिकृत बांधकाम करणारे सर्वसामान्य नागरिक कामगार असून शास्तीकर रक्कम भरू शकत नसल्याने २००८ पासून शास्तीकर माफ करावा, अशी विनंती केली.