शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सक्तीची वीजबिल वसुली ; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:11 IST

-- रांजणगाव सांडस : ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात असे चित्र ...

--

रांजणगाव सांडस : ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात असे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. वीजबिलवसुली करण्यासाठी महावितरणकडून जबरदस्ती केली जात असून वीजबिल न भरणाऱ्या शेतक-र्यांचे विद्युत कनेक्शन खंडित केले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग संतप्त झाला असून शेतामधील उभी पिके जळून जाऊ लागली आहेत.

शिरूर तालुक्यात भीमा नदीवर मांडवगण फराटा बंधारा, पारगाव नागर गाव बंधारा, आलेगाव पागा बंधारा बांधल्याने शेतकरीवर्गाला शेतीसाठी बारमाही पाणी असते. त्यामुळे शेती बागायती झाली आहे पण उन्हाळ्यात नदीला पाणी असून वीजपंप बंद असल्याने पिके शेतात जळत आहे. घोडनदी कोरडीठाक पडली आहे. अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद आहेत. विहिरी, बोअरवेल हे बंद पडलेले असून पाणी पिण्याची समस्या जाणवू लागली आहे. कोरोनामुळे अस्थिर परिस्थिती असून शेतकऱ्यांच्या तरकारी, फळपिके, कांदा, पालेभाज्या यांचे बाजारभाव पूर्णपणे ढासळलेले, शेतमालाला बाजारभाव नाही अशी परिस्थिती आहे.

कडक उन्हाळ्यामुळे शेतातील पिकांना दोन ते तीन दिवसाला पाणी द्यावे लागते. अनेकांची तरकारी पिके हातातोंडाशी आली आहे. कलिंगड, खरबूज आदी फळपिके पाणी वेळेत मिळत नसल्याने सुकून जाऊ लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे जनावरांना ही पाणी कसे द्यायचे असा सवाल पशुपालकांनी केला आहे.

वीजपंपाला मीटर बसविलेला असून मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारणी न होता अनेक शेतकरीवर्गाला अंदाजे रीडिंग आकारणी करून भरमसाठ वीजबिल आल्याने विजेचा धक्का शेतकरीवर्गाला बसला आहे. ज्या शेतकरीवर्गाची विहीर बोअरवेल पाण्याअभावी वीजपंप बंद असूनही बिल आल्याने शेतात पीक नाही पंप बंद, तरी वीजबिल आले आहे. अशा शेतकरीवर्गाचे पंप बंद पाहणी करून बिल आकारणी करावी

पांडुरंग आण्णा लोखंडे शेतकरी

.

--

मार्च एण्डचा भरणा आणी वीजबिलाची लगीनघाई

--

मार्च महिना असल्याने सोसायट्या, सहकारी संस्था, बँकांचे हप्ते यांचा भरणा शेतकऱ्यांना मार्चअखेर पूर्ण करावाच लागतो. त्याशिवाय त्यांना नवीन आर्थिक वर्षात कर्जे घेणे शक्य होत नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असताना भरमसाठ वीजबिले कशी भरायची, हा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वीजबिल एवढे भरा नाही भरले तर तुमचे कनेक्शन कट करू, तुमच्या ट्रान्सफॉर्मर बंद करू असा इशारा महावितरणकडून दिला जात आहे. तसेच काही शेतकऱ्यांची वीजबिले भरून देखील त्यांची कनेक्शन जोडली जात नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांची ही अडवणूक केली जात आहे, असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.