शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीची वीजबिल वसुली ; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:11 IST

-- रांजणगाव सांडस : ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात असे चित्र ...

--

रांजणगाव सांडस : ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात असे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. वीजबिलवसुली करण्यासाठी महावितरणकडून जबरदस्ती केली जात असून वीजबिल न भरणाऱ्या शेतक-र्यांचे विद्युत कनेक्शन खंडित केले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग संतप्त झाला असून शेतामधील उभी पिके जळून जाऊ लागली आहेत.

शिरूर तालुक्यात भीमा नदीवर मांडवगण फराटा बंधारा, पारगाव नागर गाव बंधारा, आलेगाव पागा बंधारा बांधल्याने शेतकरीवर्गाला शेतीसाठी बारमाही पाणी असते. त्यामुळे शेती बागायती झाली आहे पण उन्हाळ्यात नदीला पाणी असून वीजपंप बंद असल्याने पिके शेतात जळत आहे. घोडनदी कोरडीठाक पडली आहे. अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद आहेत. विहिरी, बोअरवेल हे बंद पडलेले असून पाणी पिण्याची समस्या जाणवू लागली आहे. कोरोनामुळे अस्थिर परिस्थिती असून शेतकऱ्यांच्या तरकारी, फळपिके, कांदा, पालेभाज्या यांचे बाजारभाव पूर्णपणे ढासळलेले, शेतमालाला बाजारभाव नाही अशी परिस्थिती आहे.

कडक उन्हाळ्यामुळे शेतातील पिकांना दोन ते तीन दिवसाला पाणी द्यावे लागते. अनेकांची तरकारी पिके हातातोंडाशी आली आहे. कलिंगड, खरबूज आदी फळपिके पाणी वेळेत मिळत नसल्याने सुकून जाऊ लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे जनावरांना ही पाणी कसे द्यायचे असा सवाल पशुपालकांनी केला आहे.

वीजपंपाला मीटर बसविलेला असून मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारणी न होता अनेक शेतकरीवर्गाला अंदाजे रीडिंग आकारणी करून भरमसाठ वीजबिल आल्याने विजेचा धक्का शेतकरीवर्गाला बसला आहे. ज्या शेतकरीवर्गाची विहीर बोअरवेल पाण्याअभावी वीजपंप बंद असूनही बिल आल्याने शेतात पीक नाही पंप बंद, तरी वीजबिल आले आहे. अशा शेतकरीवर्गाचे पंप बंद पाहणी करून बिल आकारणी करावी

पांडुरंग आण्णा लोखंडे शेतकरी

.

--

मार्च एण्डचा भरणा आणी वीजबिलाची लगीनघाई

--

मार्च महिना असल्याने सोसायट्या, सहकारी संस्था, बँकांचे हप्ते यांचा भरणा शेतकऱ्यांना मार्चअखेर पूर्ण करावाच लागतो. त्याशिवाय त्यांना नवीन आर्थिक वर्षात कर्जे घेणे शक्य होत नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असताना भरमसाठ वीजबिले कशी भरायची, हा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वीजबिल एवढे भरा नाही भरले तर तुमचे कनेक्शन कट करू, तुमच्या ट्रान्सफॉर्मर बंद करू असा इशारा महावितरणकडून दिला जात आहे. तसेच काही शेतकऱ्यांची वीजबिले भरून देखील त्यांची कनेक्शन जोडली जात नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांची ही अडवणूक केली जात आहे, असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.