शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

सक्तीची वीजबिल वसुली ; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:11 IST

-- रांजणगाव सांडस : ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात असे चित्र ...

--

रांजणगाव सांडस : ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात असे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. वीजबिलवसुली करण्यासाठी महावितरणकडून जबरदस्ती केली जात असून वीजबिल न भरणाऱ्या शेतक-र्यांचे विद्युत कनेक्शन खंडित केले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग संतप्त झाला असून शेतामधील उभी पिके जळून जाऊ लागली आहेत.

शिरूर तालुक्यात भीमा नदीवर मांडवगण फराटा बंधारा, पारगाव नागर गाव बंधारा, आलेगाव पागा बंधारा बांधल्याने शेतकरीवर्गाला शेतीसाठी बारमाही पाणी असते. त्यामुळे शेती बागायती झाली आहे पण उन्हाळ्यात नदीला पाणी असून वीजपंप बंद असल्याने पिके शेतात जळत आहे. घोडनदी कोरडीठाक पडली आहे. अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद आहेत. विहिरी, बोअरवेल हे बंद पडलेले असून पाणी पिण्याची समस्या जाणवू लागली आहे. कोरोनामुळे अस्थिर परिस्थिती असून शेतकऱ्यांच्या तरकारी, फळपिके, कांदा, पालेभाज्या यांचे बाजारभाव पूर्णपणे ढासळलेले, शेतमालाला बाजारभाव नाही अशी परिस्थिती आहे.

कडक उन्हाळ्यामुळे शेतातील पिकांना दोन ते तीन दिवसाला पाणी द्यावे लागते. अनेकांची तरकारी पिके हातातोंडाशी आली आहे. कलिंगड, खरबूज आदी फळपिके पाणी वेळेत मिळत नसल्याने सुकून जाऊ लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे जनावरांना ही पाणी कसे द्यायचे असा सवाल पशुपालकांनी केला आहे.

वीजपंपाला मीटर बसविलेला असून मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारणी न होता अनेक शेतकरीवर्गाला अंदाजे रीडिंग आकारणी करून भरमसाठ वीजबिल आल्याने विजेचा धक्का शेतकरीवर्गाला बसला आहे. ज्या शेतकरीवर्गाची विहीर बोअरवेल पाण्याअभावी वीजपंप बंद असूनही बिल आल्याने शेतात पीक नाही पंप बंद, तरी वीजबिल आले आहे. अशा शेतकरीवर्गाचे पंप बंद पाहणी करून बिल आकारणी करावी

पांडुरंग आण्णा लोखंडे शेतकरी

.

--

मार्च एण्डचा भरणा आणी वीजबिलाची लगीनघाई

--

मार्च महिना असल्याने सोसायट्या, सहकारी संस्था, बँकांचे हप्ते यांचा भरणा शेतकऱ्यांना मार्चअखेर पूर्ण करावाच लागतो. त्याशिवाय त्यांना नवीन आर्थिक वर्षात कर्जे घेणे शक्य होत नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असताना भरमसाठ वीजबिले कशी भरायची, हा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वीजबिल एवढे भरा नाही भरले तर तुमचे कनेक्शन कट करू, तुमच्या ट्रान्सफॉर्मर बंद करू असा इशारा महावितरणकडून दिला जात आहे. तसेच काही शेतकऱ्यांची वीजबिले भरून देखील त्यांची कनेक्शन जोडली जात नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांची ही अडवणूक केली जात आहे, असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.