शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

सक्तीची वीजबिल वसुली ; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:11 IST

-- रांजणगाव सांडस : ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात असे चित्र ...

--

रांजणगाव सांडस : ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात असे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. वीजबिलवसुली करण्यासाठी महावितरणकडून जबरदस्ती केली जात असून वीजबिल न भरणाऱ्या शेतक-र्यांचे विद्युत कनेक्शन खंडित केले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग संतप्त झाला असून शेतामधील उभी पिके जळून जाऊ लागली आहेत.

शिरूर तालुक्यात भीमा नदीवर मांडवगण फराटा बंधारा, पारगाव नागर गाव बंधारा, आलेगाव पागा बंधारा बांधल्याने शेतकरीवर्गाला शेतीसाठी बारमाही पाणी असते. त्यामुळे शेती बागायती झाली आहे पण उन्हाळ्यात नदीला पाणी असून वीजपंप बंद असल्याने पिके शेतात जळत आहे. घोडनदी कोरडीठाक पडली आहे. अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद आहेत. विहिरी, बोअरवेल हे बंद पडलेले असून पाणी पिण्याची समस्या जाणवू लागली आहे. कोरोनामुळे अस्थिर परिस्थिती असून शेतकऱ्यांच्या तरकारी, फळपिके, कांदा, पालेभाज्या यांचे बाजारभाव पूर्णपणे ढासळलेले, शेतमालाला बाजारभाव नाही अशी परिस्थिती आहे.

कडक उन्हाळ्यामुळे शेतातील पिकांना दोन ते तीन दिवसाला पाणी द्यावे लागते. अनेकांची तरकारी पिके हातातोंडाशी आली आहे. कलिंगड, खरबूज आदी फळपिके पाणी वेळेत मिळत नसल्याने सुकून जाऊ लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे जनावरांना ही पाणी कसे द्यायचे असा सवाल पशुपालकांनी केला आहे.

वीजपंपाला मीटर बसविलेला असून मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारणी न होता अनेक शेतकरीवर्गाला अंदाजे रीडिंग आकारणी करून भरमसाठ वीजबिल आल्याने विजेचा धक्का शेतकरीवर्गाला बसला आहे. ज्या शेतकरीवर्गाची विहीर बोअरवेल पाण्याअभावी वीजपंप बंद असूनही बिल आल्याने शेतात पीक नाही पंप बंद, तरी वीजबिल आले आहे. अशा शेतकरीवर्गाचे पंप बंद पाहणी करून बिल आकारणी करावी

पांडुरंग आण्णा लोखंडे शेतकरी

.

--

मार्च एण्डचा भरणा आणी वीजबिलाची लगीनघाई

--

मार्च महिना असल्याने सोसायट्या, सहकारी संस्था, बँकांचे हप्ते यांचा भरणा शेतकऱ्यांना मार्चअखेर पूर्ण करावाच लागतो. त्याशिवाय त्यांना नवीन आर्थिक वर्षात कर्जे घेणे शक्य होत नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असताना भरमसाठ वीजबिले कशी भरायची, हा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वीजबिल एवढे भरा नाही भरले तर तुमचे कनेक्शन कट करू, तुमच्या ट्रान्सफॉर्मर बंद करू असा इशारा महावितरणकडून दिला जात आहे. तसेच काही शेतकऱ्यांची वीजबिले भरून देखील त्यांची कनेक्शन जोडली जात नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांची ही अडवणूक केली जात आहे, असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.