शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थांच्या गाड्या वाढल्या

By admin | Updated: May 29, 2017 01:46 IST

सासवड शहराचा विस्तार जसा वाढत आहे तशी रहदारी वाढली, रस्ते मोठे होत आहेत. बरोबर रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : सासवड शहराचा विस्तार जसा वाढत आहे तशी रहदारी वाढली, रस्ते मोठे होत आहेत. बरोबर रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या गाड्या वाढल्या आहेत. सासवडमधील सोपाननगरमध्ये तर स्वतंत्र ‘खाऊ गल्ली’ आहे. तेथे हातगाड्या लावून पदार्थ विक्री चालते. यामध्ये वडापाव, भजी, पाणीपुरी, चायनीज याचे प्रमाण लक्षणीय आहे.सासवडकर नागरिक, प्रवासी या पदार्थांचा आस्वाद घेतात. परंतु हे पदार्थ तयार करताना कोणते साहित्य वापरले जाते, त्याचा दर्जा काय? याची तपासणी कोण करते, हे कळत नाही किंवा याची तपासणी कधीच होत नाही. रस्त्याच्या कडेला उभे राहून खाताना हे पदार्थ कोणत्या तेलात तयार झाले? रस्त्याची धूळ त्यावर बसलीय का? पदार्थ दूषित आहेत का, याचा कोणी विचार करताना दिसत नाही. शासनाचे ‘अन्नभेसळ प्रतिबंधक’ खाते आहे. पण त्याचे कार्यालय सासवड येथे नाही, तर पुणे येथे आहे. सासवडमधील बेकरी दुकाने, किराणा माल दुकाने, हॉटेल यांना दरवर्षी या विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. दुकानदार तो पुणे येथे जाऊन आणतात. परंतु खाद्यपदार्थ भेसळयुक्त नाहीत, याची तपासणी होताना दिसत नाही. सासवड परिसरातून अनेक दूधवाले घरोघरी येऊन दुधाचा रतीब घालतात. पण त्यामध्ये पाणी किती, हे कोणीच तपासत नाही. सासवडच्या रस्त्यावर चहा, वडापाव अशा विक्रीच्या अनेक गाड्या आहेत, चायनीजच्या गाड्या आहेत, रहदारी वाढल्याने रात्रीच्या वेळी या गाड्यांवर खाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. उन्हाळा सुरू झाला, की रस्त्याच्या कडेला रसवंतीगृहे उभी राहतात, निरनिराळी सरबते करणाऱ्या गाड्या उभ्या राहतात, ज्यूस गाड्या उभ्या राहतात, उन्हामुळे त्रासलेले लोक त्याचा आस्वादही घेतात, महाविद्यालयीन मुले, मुली, पाणी, चायनीज पदार्थ आवडीने खातात. परंतु हे पदार्थ करताना पाणी कोठून आणले, याचा विचार करीत नाहीत, शासनाचे संबंधित खातेही या पदार्थांची कधी तपासणी करीत नाहीत. सासवड शहर वाढते आहे, शिक्षण, नोकरी, शासकीय कार्यालयात कामे, कोर्टकामे यासाठी हजारो लोक इथे येतात. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. नागरिकांच्या आरोग्यासाठी या पदार्थांची नियमित तपासणी आवश्यक आहे. तसेच परवाना न काढणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.यापूर्वी झाली कारवाई1काही वर्षांपूर्वी अन्नभेसळ विभाग नगरपालिकेच्या अखत्यारित होता. त्या वेळी दुधाचे, चहाचे, खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जात असत, काही कोर्ट केसही झाल्या होत्या. त्यानंतर मात्र हा विभाग नगरपालिकेकडून शासनाकडे वर्ग झाला.2असे असले तरी सर्व खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. हातगाड्यांप्रमाणेच महामार्गावर ढाबे आहेत. तेथील खाद्यपदार्थ कसे आहेत? सांडपाण्याची व्यवस्था नीट होते का, हे कोणी पाहत नाही. अशा प्रकारे तुमचे काही वेळा साथीचे आजार पसरतात.