शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

खाद्यपदार्थांच्या गाड्या वाढल्या

By admin | Updated: May 29, 2017 01:46 IST

सासवड शहराचा विस्तार जसा वाढत आहे तशी रहदारी वाढली, रस्ते मोठे होत आहेत. बरोबर रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : सासवड शहराचा विस्तार जसा वाढत आहे तशी रहदारी वाढली, रस्ते मोठे होत आहेत. बरोबर रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या गाड्या वाढल्या आहेत. सासवडमधील सोपाननगरमध्ये तर स्वतंत्र ‘खाऊ गल्ली’ आहे. तेथे हातगाड्या लावून पदार्थ विक्री चालते. यामध्ये वडापाव, भजी, पाणीपुरी, चायनीज याचे प्रमाण लक्षणीय आहे.सासवडकर नागरिक, प्रवासी या पदार्थांचा आस्वाद घेतात. परंतु हे पदार्थ तयार करताना कोणते साहित्य वापरले जाते, त्याचा दर्जा काय? याची तपासणी कोण करते, हे कळत नाही किंवा याची तपासणी कधीच होत नाही. रस्त्याच्या कडेला उभे राहून खाताना हे पदार्थ कोणत्या तेलात तयार झाले? रस्त्याची धूळ त्यावर बसलीय का? पदार्थ दूषित आहेत का, याचा कोणी विचार करताना दिसत नाही. शासनाचे ‘अन्नभेसळ प्रतिबंधक’ खाते आहे. पण त्याचे कार्यालय सासवड येथे नाही, तर पुणे येथे आहे. सासवडमधील बेकरी दुकाने, किराणा माल दुकाने, हॉटेल यांना दरवर्षी या विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. दुकानदार तो पुणे येथे जाऊन आणतात. परंतु खाद्यपदार्थ भेसळयुक्त नाहीत, याची तपासणी होताना दिसत नाही. सासवड परिसरातून अनेक दूधवाले घरोघरी येऊन दुधाचा रतीब घालतात. पण त्यामध्ये पाणी किती, हे कोणीच तपासत नाही. सासवडच्या रस्त्यावर चहा, वडापाव अशा विक्रीच्या अनेक गाड्या आहेत, चायनीजच्या गाड्या आहेत, रहदारी वाढल्याने रात्रीच्या वेळी या गाड्यांवर खाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. उन्हाळा सुरू झाला, की रस्त्याच्या कडेला रसवंतीगृहे उभी राहतात, निरनिराळी सरबते करणाऱ्या गाड्या उभ्या राहतात, ज्यूस गाड्या उभ्या राहतात, उन्हामुळे त्रासलेले लोक त्याचा आस्वादही घेतात, महाविद्यालयीन मुले, मुली, पाणी, चायनीज पदार्थ आवडीने खातात. परंतु हे पदार्थ करताना पाणी कोठून आणले, याचा विचार करीत नाहीत, शासनाचे संबंधित खातेही या पदार्थांची कधी तपासणी करीत नाहीत. सासवड शहर वाढते आहे, शिक्षण, नोकरी, शासकीय कार्यालयात कामे, कोर्टकामे यासाठी हजारो लोक इथे येतात. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. नागरिकांच्या आरोग्यासाठी या पदार्थांची नियमित तपासणी आवश्यक आहे. तसेच परवाना न काढणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.यापूर्वी झाली कारवाई1काही वर्षांपूर्वी अन्नभेसळ विभाग नगरपालिकेच्या अखत्यारित होता. त्या वेळी दुधाचे, चहाचे, खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जात असत, काही कोर्ट केसही झाल्या होत्या. त्यानंतर मात्र हा विभाग नगरपालिकेकडून शासनाकडे वर्ग झाला.2असे असले तरी सर्व खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. हातगाड्यांप्रमाणेच महामार्गावर ढाबे आहेत. तेथील खाद्यपदार्थ कसे आहेत? सांडपाण्याची व्यवस्था नीट होते का, हे कोणी पाहत नाही. अशा प्रकारे तुमचे काही वेळा साथीचे आजार पसरतात.