शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

अन्न-औषध प्रशासन ढिम्मच

By admin | Updated: June 12, 2015 06:07 IST

खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये सर्रासपणे केला जातो. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार शहरात राजरोसपणे सुरू आहे.

संजय माने, पिंपरी खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये सर्रासपणे केला जातो. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार शहरात राजरोसपणे सुरू आहे. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी मात्र त्याकडे डोळेझाक करू लागले असून, माहीत असूनही संबंधितांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले जात नाही. यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दलच नागरिकांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे. हितसंबंध जोपासण्याच्या वृत्तीमुळे अधिकारी कारवाईचे धाडस दाखवू शकले नाहीत.खाण्यायोग्य नसलेला बर्फ लिंबू सरबत, उसाचा रस, तसेच अन्य खाद्यपदार्थांमध्ये सर्रासपणे वापरला जातो. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारा आहे. ही बाब निदर्शनास आणून देण्याचे काम ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून केले. खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा वापर आरोग्यास धोकादायक ठरू शकतो. ही बाब २७ मे रोजी ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिली. दुसऱ्या दिवशी बर्फ पुरवठादारांवर कारवाई करण्याची मोहीम अन्न व औषध प्रशासनातर्फे हाती घेतली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग कार्यालयातील सहायक आयुक्त एस. पी. शिंदे यांनी स्पष्ट केले होते. परंतु, १५ दिवसांत त्यांच्या विभागाकडून अशी कारवाई करण्याचे पाऊल उचलले गेले नाही.खाण्यायोग्य नाही, औद्योगिक वापरासाठीचा बर्फ असे फलक बर्फ उत्पादन करणाऱ्या कंपन्या लावतात. परंतु, या कंपन्यांमधून बर्फ खरेदी करून तो कुल्फीवाले, रसवंतीगृह, लिंबू सरबतवाल्यांना पुरवठा जे लोक पुरवठा करतात, त्या पुरवठादारांवरच कारवाई करण्याची मोहीम अन्न व औषध प्रशासनातर्फे हाती घेतली जाणार आहे, असे शिंदे यांनी नमूद केले होते. मात्र, या विभागाकडून कारवाई होत नाही, हे माहीत असल्याने बर्फ पुरवठादारांना भीती वाटली नाही. त्यांनी बर्फ पुरवठा करण्याचे काम नियमितपणे सुरू ठेवले आहे. औद्योगिक वापराच्या बर्फाचे उत्पादन ज्या ठिकाणी होते, त्या बर्फ उत्पादक कंपन्यांमध्ये सकाळपासूनच बर्फाच्या लाद्या नेण्यासाठी टेम्पो, रिक्षा व अन्य वाहने रांगा लावत असल्याचे दृश्य पाहावयास मिळते. औद्योगिक वापराचा बर्फ खाद्यपदार्थांमध्ये वापरणे अयोग्य आहे. नागरिकांच्या आरोग्यास ते बाधक ठरू शकते, याच्याशी बर्फ उत्पादक, पुरवठादार, तसेच बर्फाचा वापर करून खाद्यपदार्थ तयार करणारे यांना कोणालाही सोयरसुतक नाही. त्याचबरोबर त्यांच्यावर अंकुश ठेवणारे अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन कारवाई करत नाहीत. ज्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे ते अधिकारीच या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करु लागले आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.